सांगली : दुचाकीवरून ‘ट्रिपल सीट’ जाणाऱ्या २१६ वाहनधारकांवर पोलिसांनी आज, सोमवारी कारवाईचा बडगा उगारला. जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २१ हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल केला आहे. कारवाईची ही मोहीम सुरु ठेवली जाणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी सांगितले.वाहतूक नियमांचे पालन न करणे, निष्काळजीपणे वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, ट्रिपल सीट प्रवास करणे या कारणांमुळे अपघात होत आहेत. याला आळा घालण्यासाठी पोलीसप्रमुख सावंत यांनी जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना दररोज कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज दिवसभरात केवळ ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. सायंकाळपर्यंत कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून १८, विटा २६, इस्लामपूर १६, विश्रामबाग १४, मिरज वाहतूक शाखा २१ व मिरज शहर पोलिसांकडून १०, अशा एकूण २१६ वाहनधारकांना पकडले आहे. त्यांच्याकडून २१ हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल केला. (प्रतिनिधी)प्रस्ताव सादरदरम्यान, २०१४ मध्ये अपघात करुन लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) निलंबित करण्याचा प्रस्ताव तयार करुन तो मंजुरीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) दशरथ वाघुले यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. येत्या आठवड्यात निलंबनाची ही कारवाई होण्याची शक्यता आहे.
‘ट्रिपल सीट’ जाणाऱ्या २१६ वाहनधारकांवर कारवाइ
By admin | Updated: February 2, 2015 23:46 IST