शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

इस्लामपूरच्या स्मशानभुमीत कोरोना मृतदेहांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:27 IST

इस्लामपूर : कोरोनाच्या महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूदरही वाढत आहे. रोज सरासरी दहा मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पालिका ...

इस्लामपूर : कोरोनाच्या महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूदरही वाढत आहे. रोज सरासरी दहा मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाकडे आहे. परंतु मृतदेह दहन करताना निष्काळजीपणा होत असल्याने अर्धवट जळालेला अवयव या परिसरात अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आल्याने या परिसरातील नगरसेविका सुुप्रिया पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

याबाबत स्मशानभूमीतील पालिकेचे प्रमुख दिलीप कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता अर्धजळीत मानवाचे अवयव आहेत का, याबाबत डॉक्टर तज्ज्ञांकडून शहानिशा केली जात आहे. स्मशानभूमीच्या पलीकडे मेलेल्या जनावरांचे मृतदेह टाकले जातात. रात्रीच्या वेळी अर्धवट जळालेले मानवी अवयव भटक्या कुत्र्यांकडून पळविले जात असल्याचा संशय पालिका कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. सध्या कोरोना पॉझिटिव्ह मृत रुग्णांचे दहन करण्यासाठी एकूण पाच कर्मचारी आहेत. परगावातील मृतांसाठी सात हजार रुपये आणि इस्लामपुरातील मृतांसाठी २१०० रुपये घेतले जातात.

सध्या मृत्यूची संख्या पाहता मृतदेह दहन करण्यासाठी विलंब लागत आहे. या परिसरात घरकुल योजनेतील लोकवस्ती आहे. येथील नागरिकांना निर्माण होणारा धुराचा त्रास सहन करावा लागत असल्याने कोरोनाबाधित मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी इतरत्र जागा बघावी, अशी मागणी यापूर्वी नगरसेविका मनीषा पाटील यांनी केली होती. यावेळेची परिस्थिती अशीच असल्याने पालिका प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी नगरसेविका सुप्रिया पाटील यांनी केली आहे.