शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

रक्तपेढ्यांत रक्ताची टंचाई

By admin | Updated: October 26, 2014 23:27 IST

रक्तदानाचे आवाहन : सुट्ट्यांमुळे संकलनात झाली घट

मिरज : रक्तदान शिबिरांच्या घटत्या संख्येमुळे मिरजेतील रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णास रक्त पुरवठ्यासाठी रक्तपेढ्यांची व रुग्णांच्या नातेवाईकांची रक्तासाठी धावपळ होत आहे. दिवाळी सुट्टीच्या हंगामात वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता, रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन रक्तपेढ्या व सामाजिक संस्थांनी केले आहे. मिरजेत रुग्णालयांची संख्या मोठी आहे. शासकीय रुग्णालये, वॉन्लेस हॉस्पिटलसह शहरातील इतर खासगी रुग्णालयात अपघातातील जखमी, कर्करोगाचे रुग्ण व प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. हिमोफेलिया व थॅलेसिमिया अशा विविध आजारांवर आधुनिक शस्त्रक्रिया उपचारांची सुविधा उपलब्ध असल्याने मोठ्यासंख्येने रुग्ण उपचारासाठी मिरजेला येतात. येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यासाठी वसंतदादा पाटील रक्तपेढी, वॉन्लेस हॉस्पिटल, सिध्दिविनायक कर्करोग रुग्णालय, मिरज सिरॉलॉजिकल इन्स्टीट्यूट यासह रक्तपेढ्या आहोरात्र सुरू असतात. सर्व रक्तपेढ्यांतून दररोज सुमारे २५० ते ३०० बाटल्या रक्ताची मागणी आहे. रक्त बिंदिका, पेशी यांचाही यात समावेश आहे. रक्तातून रक्तबिंदिका व पेशी वेगळ्या करण्याची सुविधा केवळ मिरजेतील रक्तपेढ्यातच उपलब्ध असल्याने शेजारील जिल्ह्यातून व कर्नाटकातील रुग्णालयांकडूनही वेळोवेळी रक्ताची मागणी होते. ऐच्छिक रकतदाते, विविध ठिकाणी होणारी रक्तदान शिबिरे व रक्तासाठी बदली रक्त देणाऱ्या दात्यांवर या रक्तपेढ्या अवलंबून आहेत. रक्ताची मागणी मोठी असताना सध्या रक्तपेढ्यांत रक्ताचा साठा मात्र मर्यादित आहे. बहुतेक सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रुग्णांच्या मागणीपेक्षा कमी केवळ २५ ते ३० बाटल्या एवढाच रक्तसाठा उपलब्ध होत आहे.मिरजेतील पेढ्यांची रक्तासाठी कसरतअपघातातील जखमी व अत्यवस्थ रुग्णांना प्राधान्याने रक्तपुरवठा केला जात आहे. इतर आजारांच्या रुग्णांना मात्र रक्तासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. रक्तपेढ्यात ए, बी, एबी, ओ निगेटीव्ह अशा सर्वच रक्तगटांचा तुटवडा असल्याने मागणी आल्यास रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी त्या-त्या रक्तगटाच्या दात्यांशी संपर्क करुन रक्तपुरवठा करण्याचा प्रयत्न रक्तपेढी चालक करीत आहेत. गेली दोन महिने विधानसभा निवडणुकीमुळे रक्तदान शिबिरांमध्ये झालेली घट, महाविद्यालयांच्या सुट्टया, शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची वाढलेली संख्या यासह अनेक कारणांमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.