शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

शेतीपूरक उद्याेग, कृषिसेवा केंद्रे बंदमुळे शेतकऱ्यांची नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:25 IST

मातीत खत घातल्याशिवाय पीक येत नाही. जनावरांना भरड घातल्याशिवाय दूध निघत नाही. सामान्य जनता नुसत्या मेडिकलच्या गोळ्या खाऊन जगू ...

मातीत खत घातल्याशिवाय पीक येत नाही. जनावरांना भरड घातल्याशिवाय दूध निघत नाही. सामान्य जनता नुसत्या मेडिकलच्या गोळ्या खाऊन जगू शकत नाही. त्यांनाही किराणा तेल मीठ लागतेच, पंधरा दिवस पुरेल इतका किराणा साठा करून ठेवण्याची सामान्य अनेकांची आर्थिक कुवतही नाही, पण मायबाप सरकारला हे सांगणार काेण, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

रोजंदारी नसल्याने रुपया-दोन रुपयांनाही सामान्य माणसं महाग झाली आहेत. आधी गरिबाच्या पोटाचा प्रश्न मिटवा. मग लाॅकडाऊन वाढवा, अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे.

लाॅकडाऊनमुळे लाखो रुपयांचा माल व्यापाऱ्यांजवळ पडून आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने कोणाचीही कदर न करता, लाॅकडाऊन वाढविण्याचा सपाटा लावला आहे. सोनहिरा परिसरात जिल्हा लाॅकडाऊनच्या आधीच पाच दिवसांपासून लाॅकडाऊन चालू आहे. त्यामुळे गाेरगरीब जनता मेटाकुटीला आली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस शेती आहे. पावसाळ्यापूर्वी लागवडी घालून ऊस कुळवायचा असतो. मात्र, कृषी दुकाने बंद असल्याने शेतकऱ्याची कामे खोळंबली आहेत, तसेच शेती पुरक दुकाने हार्डवेअर, पशुखाद्य विक्री, अवजारांची दुकाने बंद असल्याने शेती व शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. शेतीची मेहनत घात बघून करावी लागते. यामुळे शेतीपूरक व्यवसायांची दुकाने खुली करणे गरजेचे आहे.