शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील भाजपचे मराठी प्रेम बेगडीच!

By admin | Updated: May 25, 2016 00:19 IST

नितीन बानुगडे-पाटील : मराठी शाळांसाठी दहा दिवसांचा अल्टिमेटम

सांगली : कर्नाटक सीमेलगत जत तालुक्यात असलेल्या ४२ शाळांमध्ये मराठीतून शिक्षण मिळावे, यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर झाला आहे. शिक्षणमंत्र्यांनी ३१ मार्चपर्यंत याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले नाही. त्यामुळे त्यांचे मराठी प्रेम बेगडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या दहा दिवसात या प्रस्तावावर निर्णय न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, जत तालुक्यातील सीमाभागात मराठी शाळांची कमतरता आहे. येथील पालकांना त्यांच्या मुलांसाठी मराठी शाळा सुरू व्हावी, असे वाटत असतानाही, त्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. ४२ गावांमध्ये मराठी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून शासनाकडे सादर झाला आहे. यासाठी छाननीतून ६० संस्थांची निवडही केली होती. याप्रश्नी शिवसेना नेत्या आ. नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी शिक्षणमंत्र्यांनी ३१ मार्चपर्यंत मराठी शाळांच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मे महिना संपत आला, तरी निर्णय झालेला नाही. त्यामुळे यावर्षीही येथील मुलांना कन्नड भाषेतूनच शिक्षण घ्यावे लागणार आहे. कर्नाटक सरकारने कन्नड भाषा संवर्धनासाठी महाराष्ट्रातील शाळांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर या सीमाभागातील महाराष्ट्र शासनाच्या शाळांच्या कार्यक्रमांना कर्नाटकचे मंत्री उपस्थित राहत आहेत. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे हे दुर्दैव म्हणावे लागेल. प्रस्तावित शाळांना तातडीने दहा दिवसात मान्यता द्यावी, अन्यथा आम्ही या सर्व गावांमध्ये आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. राज्यातील दुष्काळाकडेही सरकार डोळेझाक करीत आहे. संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय अद्याप झालेला नाही. पणनमंत्र्यांनी जर थेट शेतीमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची योजना हाती घेतली असेल, तर आम्ही त्या गोष्टीला पाठिंबा देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)महात्मा फुलेंचा आदर्श सांगणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकींना शिक्षणाची दारे केवळ गुंडांच्या दहशतीमुळे बंद करावी लागत असतील, तर ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने या मुलींना संपूर्ण संरक्षण दिले नाही, तर शिवसेना त्यांना संरक्षण देईल, असे बानुगडे-पाटील यांनी सांगितले. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकारजमा नाही. भाजपमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच अनेक प्रश्नांसाठी आता आम्हालाच आंदोलन करावे लागत आहे, असे बानुगडे-पाटील म्हणाले.