शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

राज्यातील भाजपचे मराठी प्रेम बेगडीच!

By admin | Updated: May 25, 2016 00:19 IST

नितीन बानुगडे-पाटील : मराठी शाळांसाठी दहा दिवसांचा अल्टिमेटम

सांगली : कर्नाटक सीमेलगत जत तालुक्यात असलेल्या ४२ शाळांमध्ये मराठीतून शिक्षण मिळावे, यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर झाला आहे. शिक्षणमंत्र्यांनी ३१ मार्चपर्यंत याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले नाही. त्यामुळे त्यांचे मराठी प्रेम बेगडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या दहा दिवसात या प्रस्तावावर निर्णय न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, जत तालुक्यातील सीमाभागात मराठी शाळांची कमतरता आहे. येथील पालकांना त्यांच्या मुलांसाठी मराठी शाळा सुरू व्हावी, असे वाटत असतानाही, त्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. ४२ गावांमध्ये मराठी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून शासनाकडे सादर झाला आहे. यासाठी छाननीतून ६० संस्थांची निवडही केली होती. याप्रश्नी शिवसेना नेत्या आ. नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी शिक्षणमंत्र्यांनी ३१ मार्चपर्यंत मराठी शाळांच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मे महिना संपत आला, तरी निर्णय झालेला नाही. त्यामुळे यावर्षीही येथील मुलांना कन्नड भाषेतूनच शिक्षण घ्यावे लागणार आहे. कर्नाटक सरकारने कन्नड भाषा संवर्धनासाठी महाराष्ट्रातील शाळांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर या सीमाभागातील महाराष्ट्र शासनाच्या शाळांच्या कार्यक्रमांना कर्नाटकचे मंत्री उपस्थित राहत आहेत. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे हे दुर्दैव म्हणावे लागेल. प्रस्तावित शाळांना तातडीने दहा दिवसात मान्यता द्यावी, अन्यथा आम्ही या सर्व गावांमध्ये आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. राज्यातील दुष्काळाकडेही सरकार डोळेझाक करीत आहे. संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय अद्याप झालेला नाही. पणनमंत्र्यांनी जर थेट शेतीमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची योजना हाती घेतली असेल, तर आम्ही त्या गोष्टीला पाठिंबा देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)महात्मा फुलेंचा आदर्श सांगणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकींना शिक्षणाची दारे केवळ गुंडांच्या दहशतीमुळे बंद करावी लागत असतील, तर ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने या मुलींना संपूर्ण संरक्षण दिले नाही, तर शिवसेना त्यांना संरक्षण देईल, असे बानुगडे-पाटील यांनी सांगितले. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकारजमा नाही. भाजपमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच अनेक प्रश्नांसाठी आता आम्हालाच आंदोलन करावे लागत आहे, असे बानुगडे-पाटील म्हणाले.