शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

राज्यातील भाजपचे मराठी प्रेम बेगडीच!

By admin | Updated: May 25, 2016 00:19 IST

नितीन बानुगडे-पाटील : मराठी शाळांसाठी दहा दिवसांचा अल्टिमेटम

सांगली : कर्नाटक सीमेलगत जत तालुक्यात असलेल्या ४२ शाळांमध्ये मराठीतून शिक्षण मिळावे, यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर झाला आहे. शिक्षणमंत्र्यांनी ३१ मार्चपर्यंत याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले नाही. त्यामुळे त्यांचे मराठी प्रेम बेगडी असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या दहा दिवसात या प्रस्तावावर निर्णय न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, जत तालुक्यातील सीमाभागात मराठी शाळांची कमतरता आहे. येथील पालकांना त्यांच्या मुलांसाठी मराठी शाळा सुरू व्हावी, असे वाटत असतानाही, त्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. ४२ गावांमध्ये मराठी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून शासनाकडे सादर झाला आहे. यासाठी छाननीतून ६० संस्थांची निवडही केली होती. याप्रश्नी शिवसेना नेत्या आ. नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी शिक्षणमंत्र्यांनी ३१ मार्चपर्यंत मराठी शाळांच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मे महिना संपत आला, तरी निर्णय झालेला नाही. त्यामुळे यावर्षीही येथील मुलांना कन्नड भाषेतूनच शिक्षण घ्यावे लागणार आहे. कर्नाटक सरकारने कन्नड भाषा संवर्धनासाठी महाराष्ट्रातील शाळांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर या सीमाभागातील महाराष्ट्र शासनाच्या शाळांच्या कार्यक्रमांना कर्नाटकचे मंत्री उपस्थित राहत आहेत. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे हे दुर्दैव म्हणावे लागेल. प्रस्तावित शाळांना तातडीने दहा दिवसात मान्यता द्यावी, अन्यथा आम्ही या सर्व गावांमध्ये आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. राज्यातील दुष्काळाकडेही सरकार डोळेझाक करीत आहे. संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय अद्याप झालेला नाही. पणनमंत्र्यांनी जर थेट शेतीमाल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची योजना हाती घेतली असेल, तर आम्ही त्या गोष्टीला पाठिंबा देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)महात्मा फुलेंचा आदर्श सांगणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकींना शिक्षणाची दारे केवळ गुंडांच्या दहशतीमुळे बंद करावी लागत असतील, तर ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारने या मुलींना संपूर्ण संरक्षण दिले नाही, तर शिवसेना त्यांना संरक्षण देईल, असे बानुगडे-पाटील यांनी सांगितले. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकारजमा नाही. भाजपमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच अनेक प्रश्नांसाठी आता आम्हालाच आंदोलन करावे लागत आहे, असे बानुगडे-पाटील म्हणाले.