शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

सांगलीत भाजपचे आंदोलन भाजपविरोधातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:28 IST

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीतील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. सत्ता गेल्याने भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. गेल्या ...

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीतील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. सत्ता गेल्याने भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आंदोलनांचा सपाटा लावला आहे. त्यातील ‘आयर्विन’चा समांतर पूल व जिल्हा नियोजनच्या सात कोटींच्या निधीवरून वातावरण तापले आहे. पण हे दोन्ही विषय भाजपशी निगडीत असून, भाजपचे आंदोलन भाजपविरोधातच होते की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.

अडीच वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपची सत्ता आली. महापालिकेच्या स्थापनेपासून सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांतही उत्साह संचारला होता. पण त्यांना सत्तेचा काटेरी मुकुट सांभाळता आला नाही. नुकत्याच झालेल्या महापौर, उपमहापौर निवडीवेळी सात नगरसेवक फुटले. तसा हा आकडा १४च्या घरात होता, तर नाराजांची संख्या २२पर्यंत होती. सातजणांनी भाजपला कात्रजचा घाट दाखवत काँग्रेस-राष्ट्रवादीशी संधान साधले. त्यामुळे महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही भाजपला महापौर व उपमहापौर निवडीत पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव जिव्हारी लागल्याने महापालिकेतील भाजपचे आजी-माजी पदाधिकारी आक्रमक झाले आहेतच शिवाय नगरसेवकांनीही रस्त्यावर उतरून आंदोलन हाती घेतले आहे. त्यातच मुंबई-दिल्लीतून येणाऱ्या आदेशांचे पालन करताना स्थानिक प्रश्नांवर लढा देण्याचीही वेळ आली आहे. त्यातील आयर्विनचा पर्यायी पूल व जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपचा वाद सध्या चांगलाच गाजतो आहे.

महापालिकेला जिल्हा नियोजन समितीकडून सात कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पण निधीचे असमान वाटप झाल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले. पण हा ठराव भाजप सत्तेत असतानाच झाला होता. तेव्हा भाजपकडेच महापौरपद होते, याचा विसर मात्र त्यांना पडला. त्यातून या ठरावाचे खापर प्रशासन व नगर सचिवांवर फोडत त्यांनी पडती बाजू सांभाळण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

त्यानंतर आयर्विनच्या पर्यायी पुलाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या या पुलाला भाजपच्या नेत्यांनी विरोध करत काम बंद पाडले होते. आताही त्यांची भूमिका फारशी बदललेली नाही. या पुलाचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी आमदारांपासून नगरसेवकांपर्यंत सर्वजण आंदोलन करत आहेत. पण या पुलाला भाजपच्या नेत्यांचाच विरोध आहे, यावर मात्र ते फारसे बोलत नाहीत. त्यामुळे भाजप सध्यातरी भाजपविरोधातच संघर्ष करत असल्याचे चित्र आहे.

चौकट

दोन वर्षानंतर जाग

आयर्विनच्या पर्यायी पुलाला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. या कामाचे कार्यादेश देण्यात आले. परंतु, भाजपच्या नेत्यांनी व काही व्यापारी संघटनांनी पुलाविरोधात भूमिका घेतली व पुलाचे काम बंद पाडले. त्यानंतर आता भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व पदाधिकाऱ्यांना जाग आली आहे. हा पूल झाला पाहिजे, यासाठी ते आंदोलन करत आहेत, इशारे देत आहेत. मग दोन वर्षे ते गप्प का होते, तोंडावर विधानसभा निवडणूक होती म्हणून आमदारांनी त्याविरोधात एक शब्दही काढला नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता युवा नगरसेवकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची धडपड सुरू असल्याची चर्चा होत आहे.