शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ नये

By admin | Updated: October 30, 2014 01:14 IST

राजू शेट्टी : नव्या सरकारच्या मंत्रिमंडळातील सहभागाबाबत संघटना आग्रही

सांगली : भाजप व सेनेत पुन्हा युती व्हावी, यासाठी मी कोणत्याही प्रकारची मध्यस्थी केलेली नाही. त्या भानगडीत मी पडणार नाही. सरकार स्थापन करताना कोणाचा पाठिंबा घ्यायचा, याचे अधिकार भाजपलाच आहेत. तरीही त्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ नये, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. राज्यातील नव्या मंत्रिमंडळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सहभागी करून घ्यावे, यासाठी आम्ही आग्रही आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. जनतेचा हा कौल आम्हाला मान्य आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून फूट पडलेली नाही. काहींनी पक्ष सोडला असला तरी, निष्ठावंत कार्यकर्ते अजूनही आमच्याकडे आहेत. उल्हास पाटील यांनी सुरू केलेल्या स्वतंत्र ऊस परिषदेबाबत शेट्टी म्हणाले की, आधीच शेतकऱ्यांच्या तीन संघटना आहेत. त्यात आणखी एकाची भर पडली तर, चांगली गोष्ट आहे. जेवढी स्पर्धा होईल, तेवढे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. कोणाच्या जाण्याने संघटनेला फरक पडणार नाही. आक्रमक कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही संघटनबांधणी केली होती. अशा लोकांना अन्य पक्षांनी आमिष दाखवून फोडले, तरीही संघटना अजूनही मजबूत आहे. आम्ही त्या जोरावर पुढील वाटचाल करू. निष्ठावंतांना तिकीट वाटपात डावलल्याचा आरोप चुकीचा आहे. वीस-वीस वर्षे काम करणाऱ्यांनाही आम्ही उमेदवारी दिली आहे. शिरोळमधील उमेदवारीबाबत पाच वर्षांपूर्वीच आम्ही शब्द दिला होता. त्यामुळे उल्हास पाटील यांना उमेदवारी देऊ शकलो नाही. इस्लामपूर मतदारसंघात पक्षविरहीत एकास एक लढतीचा निर्णय झाला होता. केवळ कॉँग्रेसमुळे हा बेत फसला. ऐनवेळी त्यांनी पक्षाचा उमेदवार उभा केला. अन्य ठिकाणच्या उमेदवारीबाबत संघटनेच्या कार्यकारिणीने निर्णय घेतले आहेत. सर्वांचेच समाधान होऊ शकले नाही, ही गोष्ट खरी असली तरी, यातून संघटनेत फूट पडली, असा अर्थ कुणीही घेऊ नये. ...तर शांतपणे बाजूला होईन लोकांना ज्यावेळी वाटेल की शेट्टींचे नेतृत्व आता कामाचे नाही, त्यावेळी मी स्वत:हून शांतपणे राजकारणातून, चळवळीतून बाजूला होईन. माझ्या मुलाला, नातेवाईकांना संघटनेचे नेतृत्व द्यावे, अशी मागणी कधीच करणार नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. संघटनेत माझ्यानंतर सर्वात ज्येष्ठ म्हणून सदाभाऊ खोत यांचा नंबर लागतो. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळाले तर, त्यांनाच प्राधान्य दिले जाईल. किती व कोणते खाते मिळेल, यावर या गोष्टी अवलंबून आहेत. आताच काही सांगता येत नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)