शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या परिस्थितीला भाजप जबाबदार

By admin | Updated: September 18, 2016 00:04 IST

जयंत पाटील : बोरगावमध्ये विकास कामांचे उद्घाटन, शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत नाही

कवठेमहांकाळ : भाजपचे सरकार हे उद्योगपतींना धार्जिण असून, गोरगरीब, शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे. सर्वसामान्य माणसांचा विकास हे या भाजपचे ध्येय नसून, केवळ सत्तेचा स्वत:साठी फायदा घेणे एवढेच त्यांना माहीत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली. आज राज्यातील या परिस्थितीला पूर्णपणे भाजप सरकार जबाबदार आहे. या शासनाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचीही टीका यावेळी पाटील यांनी केली.बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे जयंत पाटील यांच्याहस्ते २५ लाखाच्या विकास कामांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. तसेच युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गणेश पाटील यांचाही सत्कार जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. आमदार सुमनताई पाटील अध्यक्षस्थानी होत्या.पाटील म्हणाले, तालुक्यात युवक राष्ट्रवादीचे काम अध्यक्ष गणेश पाटील यांनी जोरात सुरु केले आहे. पक्ष बळकटीसाठी हे गरजेचे असून पाटील यांनी तालुक्यात युवकांची मोठी फळी निर्माण करावी व राष्ट्रवादी पक्ष तालुक्यात मजबूत करावा, त्यांना सर्व प्रकारची मदत करू, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.यावेळी आ. सुमनताई पाटील यांनी, भविष्यात मतदारसंघातील आबांची अपुरी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करून, सर्वसामान्य जनतेला न्याय देणार असल्याचे सांगितले. तालुकाध्यक्ष गणेश पाटील यांनी, तालुक्यात युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून चांगले काम केले असून, त्यांना पूर्ण ताकद देण्याचे आश्वासन दिले. यावेळी गणेश पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना तालुकाध्यक्ष गणेश पाटील म्हणाले, भविष्यात आपण युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून आबांच्या विचाराने पक्षवाढीसाठी काम करू, तसेच आ. सुमनतार्इंना तालुक्यातून युवकांच्या माध्यमातून मोठी ताकद देऊ. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहल पाटील, विजयराव सगरे, नामदेवराव करगणे, भाऊसाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. बोरगाव येथील आबांच्या प्रयत्नातून मंजूर झालेली दोन सामाजिक सभागृहे, एक पिकअप् शेड यांचे उद्घाटन जयंत पाटील, आ. सुमनताई पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच युवक राष्ट्रवादीच्या शाखेचेही उद्घाटन करण्यात आले. महिला बचत गटातील महिलांना माऊली संस्थेमार्फत मोफत प्रवासी बॅगांचे वाटप करण्यात आले.यावेळी ताजुद्दीन तांबोळी, जि. प. उपाध्यक्ष रणजित पाटील, सुरेश पाटील, गजानन कोठावळे, गणपती सगरे, सुरेखा कोळेकर, कुसूमताई मोठे, दत्ताजीराव पाटील, नारायण पवार, स्वाती लांडगे, शिवाजीराव पाटील, अविनाश पाटील, हणमंत देसाई, खंडू पवार उपस्थित होते. बाळासाहेब पाटील यांनी स्वागत केले, तर मोहन खोत यांनी आभार मानले.(वार्ताहर)शेतकरी कर्जबाजारी : राज्य भांडवलदारांचेराज्यात शेतकरी कर्जबाजारी आहे, कांद्याला, उसाला, शेतीमालाला योग्य तो भाव दिला जात नाही. साधी आधारभूत किंमतसुद्धा मिळत नाही. मग या शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा सवालही त्यांनी केला. या भाजप शासनाचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. त्यांना शेतकरी व शेती व्यवस्था मोडून भांडवलदारांचे राज्य प्रस्थापित करायचे असून, राष्ट्रवादी कदापी हे होऊ देणार नाही. भाजपचा हा डाव हाणून पाडणार असल्याचा इशारा जयंत पाटील यांनी दिला.