शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

पराभव दिसल्याने भाजपवर आरोप

By admin | Updated: January 17, 2017 00:45 IST

रवी अनासपुरे : सांगलीतील कार्यकर्ता बैठकीत भाजप नेत्यांकडून स्वबळाचा नारा

सांगली : पराभव दिसू लागल्याने राष्ट्रवादी नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच ते आता भाजपवर गुंडगिरीचा आरोप करीत आहेत, असा टोला भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी सोमवारी भाजपच्या बैठकीत लगावला. भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा सांगलीतील टिळक स्मारक मंदिरात पार पडला. या मेळाव्यास पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, आमदार शिवाजीराव नाईक, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, पक्षाचे समन्वयक मकरंद देशपांडे, बंडोपंत देशमुख, प्रकाशतात्या बिरजे आदी उपस्थित होते. अनासपुरे म्हणाले की, भाजपवर आता कोणत्याही प्रकारचे आरोप होऊ लागल्याने तो एक चांगला संकेत समजला पाहिजे. विरोधकांना आता भाजपवर काय टीका करायची, याचेही भान राहिलेले नाही. भाजप हा गुंडांचा पक्ष असल्याचे सांगून राष्ट्रवादी नेत्यांनी त्यांच्या खच्चीकरणाचा दाखला दिला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी ताकदीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गड सर करावेत. आमदार विलासराव जगताप म्हणाले, जत तालुक्यातील भाजपसह सर्वच घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती, शेतकरी संघटना, रासप, सेना यासह भाजपच्या घटक पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रण दिले होते; मात्र या बैठकीला घटक पक्षाचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. आमची तयारी झाल्यानंतर आता घटक पक्षाचे पदाधिकारी आमच्याशी चर्चा करू लागले आहेत. आमचा चांगला उमेदवार काढायचा आणि घटक पक्षातील कमकुवत उमेदवार द्यायचा, हे बरोबर नाही. आमच्याकडे इच्छुक अनेकजण आहेत. सत्तेतील घटकपक्षातील लोकांना सामावून घेताना आमच्या मेरीटच्या उमेदवारांना डावलले तर चालणार नाही. मेरीट असणाऱ्या कुणालाही उमेदवारी द्या, पण चिन्हावरच लढवा. शिवाजीराव नाईक म्हणाले, आतापर्यंत आमच्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केले. पक्षासाठी, सामान्यांसाठी राबणाऱ्यांना संधी देणे गरजेचे आहे. अशांना डावलले तर कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होईल. पक्षश्रेष्ठींनी याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी. कासेगाव मतदारसंघात वाळवा तालुक्यातील सर्व नेते येतात, त्यांच्याशी आम्ही झुंज देत आहोत. अशावेळी घटक पक्षाला त्याठिकाणी संधी दिला, तर आम्ही काय करायचे? मर्यादित स्वरुपात मेरीटवर चर्चेस हरकत नाही. दोन्ही काँग्रेस आमचा उमेदवार पाडायचा प्रयत्न करणार आहेत, याची खबरदारी घ्यावी. मकरंद देशपांडे म्हणाले, ग्रामीण भागातील निवडणुका आजपर्यंत भाजपने फारशा गंभीर घेतलेल्या नाहीत. यावेळी भाजपचे चार आमदार, एक खासदार आणि कार्यकर्ते या बळावर जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्याची मोठी संधी आहे. पृथ्वीराजबाबा देशमुख म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भाजप ताकदीने लढविणार असून, याची तयारी झाली आहे. लवकरच उमेदवार निश्चित केले जातील. (प्रतिनिधी)‘प्रसाद’ कुणी घेतला ?आमदार नाईक म्हणाले, दोन्ही काँग्रेसचे नेते, विधानपरिषद निवडणुकीतील ‘प्रसाद’ कुणी घेतला, यावरुन आवाज उठवत आहेत. विधानपरिषदेची निवडणूक ही गैरमार्गाने लढवली, हे दोघेही काँग्रेस नेते उघडपणे सांगत आहेत. जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता बदलले आहे. यामुळे काही फरक पडणार नाही.ं