शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

पराभव दिसल्याने भाजपवर आरोप

By admin | Updated: January 17, 2017 00:45 IST

रवी अनासपुरे : सांगलीतील कार्यकर्ता बैठकीत भाजप नेत्यांकडून स्वबळाचा नारा

सांगली : पराभव दिसू लागल्याने राष्ट्रवादी नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच ते आता भाजपवर गुंडगिरीचा आरोप करीत आहेत, असा टोला भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी सोमवारी भाजपच्या बैठकीत लगावला. भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा सांगलीतील टिळक स्मारक मंदिरात पार पडला. या मेळाव्यास पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, आमदार शिवाजीराव नाईक, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, पक्षाचे समन्वयक मकरंद देशपांडे, बंडोपंत देशमुख, प्रकाशतात्या बिरजे आदी उपस्थित होते. अनासपुरे म्हणाले की, भाजपवर आता कोणत्याही प्रकारचे आरोप होऊ लागल्याने तो एक चांगला संकेत समजला पाहिजे. विरोधकांना आता भाजपवर काय टीका करायची, याचेही भान राहिलेले नाही. भाजप हा गुंडांचा पक्ष असल्याचे सांगून राष्ट्रवादी नेत्यांनी त्यांच्या खच्चीकरणाचा दाखला दिला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी ताकदीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गड सर करावेत. आमदार विलासराव जगताप म्हणाले, जत तालुक्यातील भाजपसह सर्वच घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती, शेतकरी संघटना, रासप, सेना यासह भाजपच्या घटक पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रण दिले होते; मात्र या बैठकीला घटक पक्षाचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. आमची तयारी झाल्यानंतर आता घटक पक्षाचे पदाधिकारी आमच्याशी चर्चा करू लागले आहेत. आमचा चांगला उमेदवार काढायचा आणि घटक पक्षातील कमकुवत उमेदवार द्यायचा, हे बरोबर नाही. आमच्याकडे इच्छुक अनेकजण आहेत. सत्तेतील घटकपक्षातील लोकांना सामावून घेताना आमच्या मेरीटच्या उमेदवारांना डावलले तर चालणार नाही. मेरीट असणाऱ्या कुणालाही उमेदवारी द्या, पण चिन्हावरच लढवा. शिवाजीराव नाईक म्हणाले, आतापर्यंत आमच्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केले. पक्षासाठी, सामान्यांसाठी राबणाऱ्यांना संधी देणे गरजेचे आहे. अशांना डावलले तर कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होईल. पक्षश्रेष्ठींनी याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी. कासेगाव मतदारसंघात वाळवा तालुक्यातील सर्व नेते येतात, त्यांच्याशी आम्ही झुंज देत आहोत. अशावेळी घटक पक्षाला त्याठिकाणी संधी दिला, तर आम्ही काय करायचे? मर्यादित स्वरुपात मेरीटवर चर्चेस हरकत नाही. दोन्ही काँग्रेस आमचा उमेदवार पाडायचा प्रयत्न करणार आहेत, याची खबरदारी घ्यावी. मकरंद देशपांडे म्हणाले, ग्रामीण भागातील निवडणुका आजपर्यंत भाजपने फारशा गंभीर घेतलेल्या नाहीत. यावेळी भाजपचे चार आमदार, एक खासदार आणि कार्यकर्ते या बळावर जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्याची मोठी संधी आहे. पृथ्वीराजबाबा देशमुख म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भाजप ताकदीने लढविणार असून, याची तयारी झाली आहे. लवकरच उमेदवार निश्चित केले जातील. (प्रतिनिधी)‘प्रसाद’ कुणी घेतला ?आमदार नाईक म्हणाले, दोन्ही काँग्रेसचे नेते, विधानपरिषद निवडणुकीतील ‘प्रसाद’ कुणी घेतला, यावरुन आवाज उठवत आहेत. विधानपरिषदेची निवडणूक ही गैरमार्गाने लढवली, हे दोघेही काँग्रेस नेते उघडपणे सांगत आहेत. जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता बदलले आहे. यामुळे काही फरक पडणार नाही.ं