शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

पराभव दिसल्याने भाजपवर आरोप

By admin | Updated: January 17, 2017 00:45 IST

रवी अनासपुरे : सांगलीतील कार्यकर्ता बैठकीत भाजप नेत्यांकडून स्वबळाचा नारा

सांगली : पराभव दिसू लागल्याने राष्ट्रवादी नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच ते आता भाजपवर गुंडगिरीचा आरोप करीत आहेत, असा टोला भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी सोमवारी भाजपच्या बैठकीत लगावला. भारतीय जनता पक्षाचा जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा सांगलीतील टिळक स्मारक मंदिरात पार पडला. या मेळाव्यास पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, आमदार शिवाजीराव नाईक, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, पक्षाचे समन्वयक मकरंद देशपांडे, बंडोपंत देशमुख, प्रकाशतात्या बिरजे आदी उपस्थित होते. अनासपुरे म्हणाले की, भाजपवर आता कोणत्याही प्रकारचे आरोप होऊ लागल्याने तो एक चांगला संकेत समजला पाहिजे. विरोधकांना आता भाजपवर काय टीका करायची, याचेही भान राहिलेले नाही. भाजप हा गुंडांचा पक्ष असल्याचे सांगून राष्ट्रवादी नेत्यांनी त्यांच्या खच्चीकरणाचा दाखला दिला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी ताकदीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गड सर करावेत. आमदार विलासराव जगताप म्हणाले, जत तालुक्यातील भाजपसह सर्वच घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती, शेतकरी संघटना, रासप, सेना यासह भाजपच्या घटक पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रण दिले होते; मात्र या बैठकीला घटक पक्षाचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. आमची तयारी झाल्यानंतर आता घटक पक्षाचे पदाधिकारी आमच्याशी चर्चा करू लागले आहेत. आमचा चांगला उमेदवार काढायचा आणि घटक पक्षातील कमकुवत उमेदवार द्यायचा, हे बरोबर नाही. आमच्याकडे इच्छुक अनेकजण आहेत. सत्तेतील घटकपक्षातील लोकांना सामावून घेताना आमच्या मेरीटच्या उमेदवारांना डावलले तर चालणार नाही. मेरीट असणाऱ्या कुणालाही उमेदवारी द्या, पण चिन्हावरच लढवा. शिवाजीराव नाईक म्हणाले, आतापर्यंत आमच्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केले. पक्षासाठी, सामान्यांसाठी राबणाऱ्यांना संधी देणे गरजेचे आहे. अशांना डावलले तर कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होईल. पक्षश्रेष्ठींनी याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी. कासेगाव मतदारसंघात वाळवा तालुक्यातील सर्व नेते येतात, त्यांच्याशी आम्ही झुंज देत आहोत. अशावेळी घटक पक्षाला त्याठिकाणी संधी दिला, तर आम्ही काय करायचे? मर्यादित स्वरुपात मेरीटवर चर्चेस हरकत नाही. दोन्ही काँग्रेस आमचा उमेदवार पाडायचा प्रयत्न करणार आहेत, याची खबरदारी घ्यावी. मकरंद देशपांडे म्हणाले, ग्रामीण भागातील निवडणुका आजपर्यंत भाजपने फारशा गंभीर घेतलेल्या नाहीत. यावेळी भाजपचे चार आमदार, एक खासदार आणि कार्यकर्ते या बळावर जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्याची मोठी संधी आहे. पृथ्वीराजबाबा देशमुख म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भाजप ताकदीने लढविणार असून, याची तयारी झाली आहे. लवकरच उमेदवार निश्चित केले जातील. (प्रतिनिधी)‘प्रसाद’ कुणी घेतला ?आमदार नाईक म्हणाले, दोन्ही काँग्रेसचे नेते, विधानपरिषद निवडणुकीतील ‘प्रसाद’ कुणी घेतला, यावरुन आवाज उठवत आहेत. विधानपरिषदेची निवडणूक ही गैरमार्गाने लढवली, हे दोघेही काँग्रेस नेते उघडपणे सांगत आहेत. जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता बदलले आहे. यामुळे काही फरक पडणार नाही.ं