शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

‘बिब्ब्या’ने जत तालुक्यातील डाळिंब उत्पादक हवालदिल

By admin | Updated: November 11, 2014 23:17 IST

लाखोंच्या नुकसानीची शक्यता : शासकीय मदतीची मागणी

उमदी : उमदी परिसरातील डाळिंबाच्या बागांवर वेगाने पसरत असलेला बिब्ब्या रोग आटोक्यात येत नसल्याने, दुष्काळासह दुहेरी संकटात सापडलेला डाळिंब बागायतदार शेतकरी हतबल झाला आहे. डाळिंब बागा दुष्काळातही कमी पाण्यावर जगविल्या आहेत. मात्र हाता-तोंडाला आलेल्या या बागा बिब्ब्या रोगाने पूर्णपणे काढून टाकण्याची वेळ आली आहे. लाखो रुपये खर्च करूनही शेवटी निराशाच शेतकऱ्यांच्या पदरी आलेली आहे. तरी उमदी व परिसरातील डाळिंब बागायतदार शेतकरी शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करीत आहेत.जत तालुक्यात डाळिंब पीक चांगले आले. त्यामुळे यंदाच्या वर्षी हजारो हेक्टरवर डाळिंबाची लागण झाली. मात्र अस्मानी संकटाने तर कहर माजविलाच, त्यातच बिब्ब्या रोगाने बागांवर आक्रमण केले. डाळिंब पिकावर तेल्या (बिब्ब्याचा) वेगाने प्रादुर्भाव होत आहे. हजारो हेक्टर बागा रोगाने काढून टाकाव्या लागत आहेत. काही ठिकाणी बागा काढूनही टाकल्या आहेत. तेल्या बिब्ब्या हा रोग कोणत्याच औषधाला दाद देत नसल्याने हा रोग डाळिंब बागांचा कर्दळकाळ ठरला आहे.बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या डाळिंबाच्या बागा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. यामुळे बागायतदार मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणाच्या चिंतेने बागायतदार हवालदिल झाले आहेत.अवेळी झालेला पाऊस, दमट हवामान यामुळे डाळिंबाच्या पानांवर, फळांवर या रोगाचा शिरकाव झाला. फळावर तेलकट पडून फळे गळून जात आहेत, डाळिंब फुटून खराब होत आहे. अशा रोगाने वैतागलेला शेतकरी बागाच मुळापासून काढून टाकत आहे. उमदी परिसरात हजारावर हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. परंतु या रोगाने ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने बिब्ब्या रोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक औषध उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सध्या किोणतेही प्रतिबंधात्मक औषध उपलब्ध नाही. औषध विक्रेते मात्र बिब्ब्यावरील औषध म्हणून चुकीचे औषध देऊन फसवणूक करीत आहेत.अनेकांच्या डाळिंब बागा बिब्ब्याने उद्ध्वस्त झाल्या आहेत. जिवापाड जपलेल्या बागांवर बिब्ब्या रोगाचा फैलाव झाल्याने शेतकरी बेजार झाला आहे. दहा वर्षांपासून दुष्काळाशी येथील शेतकरी सामना करीत आला आहे. शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. शासनाने उद्ध्वस्त बागांचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)