शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

‘बिब्ब्या’ने जत तालुक्यातील डाळिंब उत्पादक हवालदिल

By admin | Updated: November 11, 2014 23:17 IST

लाखोंच्या नुकसानीची शक्यता : शासकीय मदतीची मागणी

उमदी : उमदी परिसरातील डाळिंबाच्या बागांवर वेगाने पसरत असलेला बिब्ब्या रोग आटोक्यात येत नसल्याने, दुष्काळासह दुहेरी संकटात सापडलेला डाळिंब बागायतदार शेतकरी हतबल झाला आहे. डाळिंब बागा दुष्काळातही कमी पाण्यावर जगविल्या आहेत. मात्र हाता-तोंडाला आलेल्या या बागा बिब्ब्या रोगाने पूर्णपणे काढून टाकण्याची वेळ आली आहे. लाखो रुपये खर्च करूनही शेवटी निराशाच शेतकऱ्यांच्या पदरी आलेली आहे. तरी उमदी व परिसरातील डाळिंब बागायतदार शेतकरी शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करीत आहेत.जत तालुक्यात डाळिंब पीक चांगले आले. त्यामुळे यंदाच्या वर्षी हजारो हेक्टरवर डाळिंबाची लागण झाली. मात्र अस्मानी संकटाने तर कहर माजविलाच, त्यातच बिब्ब्या रोगाने बागांवर आक्रमण केले. डाळिंब पिकावर तेल्या (बिब्ब्याचा) वेगाने प्रादुर्भाव होत आहे. हजारो हेक्टर बागा रोगाने काढून टाकाव्या लागत आहेत. काही ठिकाणी बागा काढूनही टाकल्या आहेत. तेल्या बिब्ब्या हा रोग कोणत्याच औषधाला दाद देत नसल्याने हा रोग डाळिंब बागांचा कर्दळकाळ ठरला आहे.बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या डाळिंबाच्या बागा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. यामुळे बागायतदार मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणाच्या चिंतेने बागायतदार हवालदिल झाले आहेत.अवेळी झालेला पाऊस, दमट हवामान यामुळे डाळिंबाच्या पानांवर, फळांवर या रोगाचा शिरकाव झाला. फळावर तेलकट पडून फळे गळून जात आहेत, डाळिंब फुटून खराब होत आहे. अशा रोगाने वैतागलेला शेतकरी बागाच मुळापासून काढून टाकत आहे. उमदी परिसरात हजारावर हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. परंतु या रोगाने ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने बिब्ब्या रोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक औषध उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सध्या किोणतेही प्रतिबंधात्मक औषध उपलब्ध नाही. औषध विक्रेते मात्र बिब्ब्यावरील औषध म्हणून चुकीचे औषध देऊन फसवणूक करीत आहेत.अनेकांच्या डाळिंब बागा बिब्ब्याने उद्ध्वस्त झाल्या आहेत. जिवापाड जपलेल्या बागांवर बिब्ब्या रोगाचा फैलाव झाल्याने शेतकरी बेजार झाला आहे. दहा वर्षांपासून दुष्काळाशी येथील शेतकरी सामना करीत आला आहे. शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. शासनाने उद्ध्वस्त बागांचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)