शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात डाळिंबावर ‘बिब्ब्या’चे संकट तीन हजार एकर क्षेत्र बाधित : कोट्यवधीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 22:00 IST

कृषी विभागाचे दुर्लक्ष, ढगाळ हवामान, वातावरणातील बदल, तुरळक पाऊस, कडक ऊन, माहितीचा अभाव यामुळे जत तालुक्यातील डाळिंब बागांवर बिब्ब्या रोगाचा सुमारे तीन हजार एकर क्षेत्रावर प्रादुर्भाव झाला आहे. या रोगाने

ठळक मुद्देनैसर्गिक संकटाने बागायतदार लागले देशोधडीला

गजानन पाटील ।संख : कृषी विभागाचे दुर्लक्ष, ढगाळ हवामान, वातावरणातील बदल, तुरळक पाऊस, कडक ऊन, माहितीचा अभाव यामुळे जत तालुक्यातील डाळिंब बागांवर बिब्ब्या रोगाचा सुमारे तीन हजार एकर क्षेत्रावर प्रादुर्भाव झाला आहे. या रोगाने शेतकऱ्यांच्या संपूर्ण बागाच गेल्या आहेत. कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे. अगोदरच दुष्काळाने हैराण झालेल्या बागायतदारांवर बिब्ब्या रोगाचे नैसर्गिक संकट आल्याने बागायतदार देशोधडीला लागला आहे. शेतकºयांनी फळे तोडून टाकली आहेत.

दरवर्षी फुलोºयात असणाºया व सुपारीच्या आकाराच्या फळांवर बिब्ब्याचे आक्रमण होत होते. मात्र यावर्षी मोठ्या फळांवरही बिब्ब्याने आक्रमण केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. बॅँका, विकास सोसायट्या, सावकारांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार, हा प्रश्न गावा-गावातून उभा आहे. यामुळे गावातील विकास सोसायट्या अडचणीत आल्या आहेत.

कायम दुष्काळी जत तालुक्यामध्ये डाळिंबाच्या मोठ्या प्रमाणात बागा आहेत. शेतकºयांनी १०० टक्के फळबागा अनुदान योजना, एमआरजीसी, ठिंबक सिंचनाच्या साहाय्याने उजाड माळरानावर फुलविल्या आहेत. खडकाळ जमीन, अनुकूल हवामान, कमी पाणी, कमी खर्च, कमी कष्टामध्ये बागा येत असल्याने शेतकºयांनी द्राक्षबागा काढून डाळिंबाची लागण केली आहे. गणेश, भगवा केशर या जातीच्या बागा आहेत. तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र १३ हजार ३४४.५९ हेक्टर इतके आहे. दरीबडची, काशिलिंगवाडी, शेगाव, जाडरबोबलाद, सोन्याळ, जालिहाळ खुर्द, वाळेखिंडी, बेवनूर, दरीकोणूर या परिसरातील शेतकºयांनी चांगल्या दर्जाच्या डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे.

इतर फळबागांपेक्षा कमी मशागतीच्या खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये उत्पादन येत असल्यामुळे शेतकºयांनी अशा बागा फुलविल्या. बिब्ब्या बॅक्टोरिया या विषाणूपासून हा रोग होतो. बिब्ब्या रोग पाने, फळावर पडतो. गोलाकार पाणीदार डाग पडतो, काही तासातच तो गडद तपकिरी किंवा काळपट होतो. डागाच्या ठिकाणी उंचवटा तयार होऊन फळाला छिंद्र पडते. ही सर्व प्रक्रिया अत्यंत कमी काळात घडते. हा संसर्गजन्य रोग आहे. बिब्ब्या पडलेली कित्येक टन डाळिंबे तोडून खड्ड्यात पुरून त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. सध्या दुपारपर्यंत ऊन, दुपारनंतर ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस, जोराचा वारा, धुके असे वातावरणातील बदल ही सर्व परिस्थिती बिब्ब्या रोगाला पोषक होत आहे. यावर्षी पेरूचा आकार असलेल्या, परिपक्व बागांवरही बिब्ब्याने आक्रमण केले आहे.स्ट्रेप्लोसायक्लीनचा घोळमहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व कृषी विद्यालय डिग्रज येथील पथकाने दरीबडची येथील बिब्ब्याग्रस्त बागांना २०१६ मध्ये भेट दिली होती. बिब्ब्या रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्लोसायक्लीन ०.९ टक्के औषधाची फवारणी करावी, असे सांगण्यात आले होते. परंतु तालुक्यातील सेवा केंद्रामध्ये स्ट्रेप्लोसायक्लीन ०.६ टक्के या घटकाचे औषध मिळते. स्ट्रेप्लोसायक्लीन ०.९ टक्के औषध मिळत नाही. सध्या तर स्ट्रेप्लोसायक्लीनऐवजी टेंगमायसीन ९०:१० टक्के हे औषध मिळत आहे. त्यामध्ये स्ट्रेप्लोसायक्लीन सल्फेट + ट्रेटॉसायक्लीन हायड्रोकार्बाईड हे घटक आहेत. परंतु ते बिब्ब्यावर गुणकारी व प्रभावी ठरत नाहीत. शेतकºयांनी बोनेट, बॅक्टेरियानाशक औषधाची फवारणी घेतली आहे, पण ही औषधेही निष्प्रभ ठरलेली आहेत.सोसायट्या अडचणीतशेतकºयांना बागांसाठी दरीबडची, सिद्धनाथ, सोरडी, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर, आसंगी येथील विकास सोसायट्यांनी कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. बागा बिब्ब्या रोगाने वाया गेल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकºयांकडून कोट्यवधी रुपयांची येणेबाकी असल्याने विकास सोसायट्या अडचणीत आल्या आहेत.

कृषी विभागाचे दुर्लक्ष तालुक्यामध्ये बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव होऊनसुद्धा अद्याप कृषी विभागाने कोणत्याही प्लॉटला भेट दिलेली नाही. शेतकºयांना रोगासंबंधीची, औषधांची योग्य माहिती न झाल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरीबडची येथे सुमारे १५० एकर क्षेत्रावर बिब्ब्याचा प्रादुर्भाव झाला आहे. कृषी आयुक्तांनी डाळिंब बागांचा सर्व्हे करण्याचा आदेश दिला होता. अजूनही सर्व्हेला सुरुवात झालेली नाही. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.या उपायांची गरज...बिब्ब्याग्रस्त फळे तोडून खड्डा काढून पुरावीत किंवा जाळावीत सर्व शेतकºयांनी एकाचवेळी फळधारणा करावीबिब्ब्यावर संशोधन करावे डाळिंबाच्या सामूहिक शेतीचा प्रयोग करावा सेंद्रीय खताचा जास्त प्रमाणात वापर करावाबागायतदार शेतकºयांनी झिरो बजेट शेतीचा प्रयोग करावा. बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव बागांवर मोठ्या प्रमाणात झाल्याने फळे तोडून टाकली आहेत. महागडी औषधे, खतावर मोठा खर्च झाला आहे. शेती तोट्यात आली आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे. - बंडू जेऊर, दरीबडची, डाळिंब बागायतदार

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी