शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भिडे यांचे विधान तपासून कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:24 IST

सांगली : आंबा खाल्ल्याने मुले होतात असे विधान करणाऱ्या संभाजीराव भिडे यांच्याविषयी काय बाेलणार परंतु कोरोनाविषयक त्यांनी केलेले वक्तव्य ...

सांगली : आंबा खाल्ल्याने मुले होतात असे विधान करणाऱ्या संभाजीराव भिडे यांच्याविषयी काय बाेलणार परंतु कोरोनाविषयक त्यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. समाजातील प्रत्येक घटक व राज्य सरकार कोरोना संकट टाळण्यासाठी प्रयत्न करताना असताना असे बोलणे बाधा आणणारे असून त्या विधानाची तपासणी करून भिडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केले.

शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना कोरोना हा आजार नसून मानसिक रोग आहे. कोरोनाने मेलेल्या व्यक्ती जगण्याच्या लायकीच्या नव्हत्या, असे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून प्रत्येकजण कोरोनाविषयक खबरदारीच्या सूचना देत आहेत, तर आरएसएसचे सरसंघचालक, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांना कोरोना झाला आहे. त्यावेळी कोरोनाविषयी असा शब्द ते वापरणार आहेत का? तरीही भिडे यांच्याकडून अशाप्रकारे विधान निषेधार्हच आहे.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने समाज आणि राज्य सरकारकडून कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी हाेत असलेल्या प्रयत्नांना बाधा आणणारे त्यांचे वक्तव्य आहे. आंबा खाल्ल्याने मुले होतात असे बोलणाऱ्यांबाबत आपण काय बोलायचे? पण कोरोनाविषयक त्यांचे विधान चुकीचे आहे.

अशा स्वरूपाचे बोलून कोरोना संकट टाळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना बाधा आणत आहे. त्यामुळे संभाजीराव भिडे यांच्या विधानाची योग्य ती यंत्रणा तपासणी करून मगच कारवाई करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.