शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

सावधान, ११० गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील एक हजार ५४० पाण्याच्या नमुन्यांपैकी ११० गावांमधील १५५ नमुने दूषित आढळले आहेत. दूषित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील एक हजार ५४० पाण्याच्या नमुन्यांपैकी ११० गावांमधील १५५ नमुने दूषित आढळले आहेत. दूषित पाण्याबाबत ग्रामपंचायती गंभीर नसल्यामुळे वारंवार त्याच त्या गावांमधील पाण्याचे नमुने दूषित येत आहेत, ही गंभीर बाबत असल्याचे आरोग्य विभागाचे मत आहे. दूषित पाण्यामुळेच बहुतांशी आजाराशी लोकांना सामना करावा लागत असल्याचेही आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.

दूषित पाण्यापासून पाच ते सहा प्रकारचे आजार होतात. त्यात गॅस्ट्रो हा पहिला आजार. गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासांत ही लक्षणं दिसू लागतात. पावसाळ्यात ही लक्षणं साथीच्या आजारासारखी पसरतात. उलटी, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. रुग्णाला दूषित पाणी झाल्याने गॅस्ट्रो होतो. शरीरातील पाणी कमी झाल्याने अखेर रुग्णाला सलाइन लावण्याची वेळ येते. दूषित पाण्याच्या माध्यमातून शरीरात विषाणूंचा प्रवेश होतो. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात. टायफाइड हा आणखी एक आजार दूषित पाण्यामुळे होतो. चार ते पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात ताप येतो. पोटात खूप दुखतं. उपचार न घेतल्यास टायफॉइडचे जंतू रक्तात मिसळतात. यामध्ये काही रुग्ण दगाविण्याची भीती असते. दूषित पाण्यामुळे एवढे गंभीर आजार होत असूनही ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनही फारसे गंभीर दिसत नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे.

तालुकानिहाय आढावा

तालुका पाण्याचे घेतलेले नमुने दूषित नमुने

आटपाडी १,२३ ७

जत २२३ २०

क.महांकाळ ९६ ५

मिरज २२० ४२

तासगाव १३५ २२

पलूस ३४ २

वाळवा १९४ १४

शिराळा १७१ १२

खानापूर २१३ १२

कडेगाव १३० १९

एकूण १५४० १५५

चौकट

शहरातील २४० पैकी ५८ नमुने दूषित

सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील पाण्याचे रोज आठ नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. जून महिन्यात २४० पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, त्यापैकी ५८ पाण्याचे नमुने दूषित आढळून आले होते. या ठिकाणी महापालिका आरोग्य विभागाने पाणी शुद्धकरणासह दूषित पाण्याबाबत खबरदारी घेण्याच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना दिल्या आहेत.

चौकट

कोरोनामुळे तीन महिन्यांत नमुने घटले

जिल्ह्यात मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती. या कालावधीत शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांपेक्षा कमी ठेवली होती. यामुळे जिल्ह्यातील विविध गावांमधून पाण्याचे नमुने घेण्याची संख्याही ५० टक्क्यांनी घटली होती. जून महिन्यात मात्र एक हजार ५४० पाण्याचे नमुने घेतले आहेत. यापैकी चक्क ११० गावांमधील १५५ गावांमधील पाणी नमुने दूषित आढळले आहेत.

चौकट

शहरातील ५८ नमुने दूषित

- किती ठिकाणीचे नमुने घेतले : २४०

- नमुने दूषित आढळले : ५८

- चांगले आढळलेले नमुने : १८२

कोट

दूषित पाण्यामुळे अनेक आजारांना आपण निमंत्रण देतो, म्हणून नागरिकांनी पावसाळ्यात पाणी उखळून थंड करून पिणेच योग्य आहे, तसेच दूषित पाणी होणार नाही, याकडे पाणीपुरवठा विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. पूरग्रस्त भागामधील ग्रामपंचायतीने टीसीएल, त्रुटीचा वापर करणे गरजेचे आहे.

-डॉ.मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.