शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला वाकुल्या दाखवत सहा हजार लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:25 IST

सांगली : कोरोनाला ठेंगा दाखवित जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सुमारे दोन हजार लग्नांचा बार जिल्ह्यात उडाला. महापालिका क्षेत्रातील सुमारे दोन ...

सांगली : कोरोनाला ठेंगा दाखवित जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सुमारे दोन हजार लग्नांचा बार जिल्ह्यात उडाला. महापालिका क्षेत्रातील सुमारे दोन हजार लग्नांचा यात समावेश. नोंदणी पद्धतीने लग्न करणाऱ्यांचे प्रमाण केवळ १५ टक्के इतकेच आहे. जिल्ह्यातील कार्यालयांमध्ये सुमारे ४५ टक्के, तर ४० टक्के विवाह हे वधु-वराच्या दारात, मंदिरात किंवा शेतात लावले गेले आहेत.

जिल्ह्यात सध्या सुमारे ३५० मंगल कार्यालये आहेत. दरवर्षी सरासरी प्रत्येक मोठ्या मंगल कार्यालयात ३० ते ४० विवाह होतात. कोरोनामुळे ही संख्या निम्म्यावर आली आहे. मार्च २०१९ पासून कोरोनामुळे विवाह कार्यांना विघ्न आले. एप्रिलपासून सप्टेेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाल्याने जाहीर विवाहांना ब्रेक लागला. तरीही या काळातही नियमांना बांधिल राहुल मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे पार पडले. पास घेऊन वऱ्हाडी येत होते. ऑक्टोबर २०१९ पासून जेव्हा कोरोनाचा कहर कमी होत गेल्या तेव्हापासून लांबणीवर टाकलेली सर्व लग्ने धुमधडाक्यात मंगल कार्यालयांमध्ये होऊ लागली. कधी मुहूर्तावर तर कधी केवळ शुभ दिवस पाहून लग्नसोहळे पार पडले. मार्च २०२१ पर्यंत म्हणजेच गेल्या वर्षभरात सहा हजार लग्नांचा बार जिल्ह्यात उडाला. काेरोनापूर्वी दरवर्षी जिल्ह्यात सरासरी ८ ते ९ हजार लग्नसोहळे पार पडतात.

चौकट

गेल्या वर्षभरात मंगल कार्यालयांमध्ये फार कमी सोहळे पार पडले. कोरोना पूर्वीच्या वर्षाची तुलना केल्यास ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत लग्न सोहळ्यांचे प्रमाण घटले. मंगल कार्यालयांमध्ये नियम पाळले जात असल्याने शेतात, दारात किंवा मंदिरात लग्न करण्याचे प्रमाण या काळात वाढले. त्यामुळे मंगल कार्यालयांचे नुकसान झाले.

- संतोष भट, मंगल कार्यालयचालक

चाैकट

वर्षभरात ४९ मुहूर्त

गेल्या वर्षभरात हिंदू पंचागाप्रमाणे एकूण ४९ मुहूर्त होते. या मुहूर्ताांवर लग्नसोहळे पार पडले. याशिवाय जी लग्ने रद्द झाली, लांबणीवर गेली ती नंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर शुभमुहूर्त पाहून लग्नसोहळे पार पडले.

चौकट

एप्रिल महिनाही असाच जाणार

यंदा एप्रिल महिन्यात आता २४, २५, २६, २८,२९ व ३० तारखेला विवाह मुहूर्त आहेत. मे महिन्यात एकूण १६ विवाह मुहूर्त आहेत. तरीही सध्या सांगली जिल्ह्यातील निर्बंध कडक असून जिल्हाबंदी झाली आहे. त्यामुळे हे मुहूर्तही विवाहाविना निघून जाणार आहेत. या काळात मोजकीच लग्ने होण्याची शक्यता आहे. नियमानुसार विवाह करण्याचे सध्या बंधन आहे.