शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला वाकुल्या दाखवत सहा हजार लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:25 IST

सांगली : कोरोनाला ठेंगा दाखवित जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सुमारे दोन हजार लग्नांचा बार जिल्ह्यात उडाला. महापालिका क्षेत्रातील सुमारे दोन ...

सांगली : कोरोनाला ठेंगा दाखवित जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सुमारे दोन हजार लग्नांचा बार जिल्ह्यात उडाला. महापालिका क्षेत्रातील सुमारे दोन हजार लग्नांचा यात समावेश. नोंदणी पद्धतीने लग्न करणाऱ्यांचे प्रमाण केवळ १५ टक्के इतकेच आहे. जिल्ह्यातील कार्यालयांमध्ये सुमारे ४५ टक्के, तर ४० टक्के विवाह हे वधु-वराच्या दारात, मंदिरात किंवा शेतात लावले गेले आहेत.

जिल्ह्यात सध्या सुमारे ३५० मंगल कार्यालये आहेत. दरवर्षी सरासरी प्रत्येक मोठ्या मंगल कार्यालयात ३० ते ४० विवाह होतात. कोरोनामुळे ही संख्या निम्म्यावर आली आहे. मार्च २०१९ पासून कोरोनामुळे विवाह कार्यांना विघ्न आले. एप्रिलपासून सप्टेेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाल्याने जाहीर विवाहांना ब्रेक लागला. तरीही या काळातही नियमांना बांधिल राहुल मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे पार पडले. पास घेऊन वऱ्हाडी येत होते. ऑक्टोबर २०१९ पासून जेव्हा कोरोनाचा कहर कमी होत गेल्या तेव्हापासून लांबणीवर टाकलेली सर्व लग्ने धुमधडाक्यात मंगल कार्यालयांमध्ये होऊ लागली. कधी मुहूर्तावर तर कधी केवळ शुभ दिवस पाहून लग्नसोहळे पार पडले. मार्च २०२१ पर्यंत म्हणजेच गेल्या वर्षभरात सहा हजार लग्नांचा बार जिल्ह्यात उडाला. काेरोनापूर्वी दरवर्षी जिल्ह्यात सरासरी ८ ते ९ हजार लग्नसोहळे पार पडतात.

चौकट

गेल्या वर्षभरात मंगल कार्यालयांमध्ये फार कमी सोहळे पार पडले. कोरोना पूर्वीच्या वर्षाची तुलना केल्यास ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत लग्न सोहळ्यांचे प्रमाण घटले. मंगल कार्यालयांमध्ये नियम पाळले जात असल्याने शेतात, दारात किंवा मंदिरात लग्न करण्याचे प्रमाण या काळात वाढले. त्यामुळे मंगल कार्यालयांचे नुकसान झाले.

- संतोष भट, मंगल कार्यालयचालक

चाैकट

वर्षभरात ४९ मुहूर्त

गेल्या वर्षभरात हिंदू पंचागाप्रमाणे एकूण ४९ मुहूर्त होते. या मुहूर्ताांवर लग्नसोहळे पार पडले. याशिवाय जी लग्ने रद्द झाली, लांबणीवर गेली ती नंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर शुभमुहूर्त पाहून लग्नसोहळे पार पडले.

चौकट

एप्रिल महिनाही असाच जाणार

यंदा एप्रिल महिन्यात आता २४, २५, २६, २८,२९ व ३० तारखेला विवाह मुहूर्त आहेत. मे महिन्यात एकूण १६ विवाह मुहूर्त आहेत. तरीही सध्या सांगली जिल्ह्यातील निर्बंध कडक असून जिल्हाबंदी झाली आहे. त्यामुळे हे मुहूर्तही विवाहाविना निघून जाणार आहेत. या काळात मोजकीच लग्ने होण्याची शक्यता आहे. नियमानुसार विवाह करण्याचे सध्या बंधन आहे.