शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

कोरोनाला वाकुल्या दाखवत सहा हजार लग्नांचा बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:25 IST

सांगली : कोरोनाला ठेंगा दाखवित जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सुमारे दोन हजार लग्नांचा बार जिल्ह्यात उडाला. महापालिका क्षेत्रातील सुमारे दोन ...

सांगली : कोरोनाला ठेंगा दाखवित जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सुमारे दोन हजार लग्नांचा बार जिल्ह्यात उडाला. महापालिका क्षेत्रातील सुमारे दोन हजार लग्नांचा यात समावेश. नोंदणी पद्धतीने लग्न करणाऱ्यांचे प्रमाण केवळ १५ टक्के इतकेच आहे. जिल्ह्यातील कार्यालयांमध्ये सुमारे ४५ टक्के, तर ४० टक्के विवाह हे वधु-वराच्या दारात, मंदिरात किंवा शेतात लावले गेले आहेत.

जिल्ह्यात सध्या सुमारे ३५० मंगल कार्यालये आहेत. दरवर्षी सरासरी प्रत्येक मोठ्या मंगल कार्यालयात ३० ते ४० विवाह होतात. कोरोनामुळे ही संख्या निम्म्यावर आली आहे. मार्च २०१९ पासून कोरोनामुळे विवाह कार्यांना विघ्न आले. एप्रिलपासून सप्टेेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाल्याने जाहीर विवाहांना ब्रेक लागला. तरीही या काळातही नियमांना बांधिल राहुल मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळे पार पडले. पास घेऊन वऱ्हाडी येत होते. ऑक्टोबर २०१९ पासून जेव्हा कोरोनाचा कहर कमी होत गेल्या तेव्हापासून लांबणीवर टाकलेली सर्व लग्ने धुमधडाक्यात मंगल कार्यालयांमध्ये होऊ लागली. कधी मुहूर्तावर तर कधी केवळ शुभ दिवस पाहून लग्नसोहळे पार पडले. मार्च २०२१ पर्यंत म्हणजेच गेल्या वर्षभरात सहा हजार लग्नांचा बार जिल्ह्यात उडाला. काेरोनापूर्वी दरवर्षी जिल्ह्यात सरासरी ८ ते ९ हजार लग्नसोहळे पार पडतात.

चौकट

गेल्या वर्षभरात मंगल कार्यालयांमध्ये फार कमी सोहळे पार पडले. कोरोना पूर्वीच्या वर्षाची तुलना केल्यास ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत लग्न सोहळ्यांचे प्रमाण घटले. मंगल कार्यालयांमध्ये नियम पाळले जात असल्याने शेतात, दारात किंवा मंदिरात लग्न करण्याचे प्रमाण या काळात वाढले. त्यामुळे मंगल कार्यालयांचे नुकसान झाले.

- संतोष भट, मंगल कार्यालयचालक

चाैकट

वर्षभरात ४९ मुहूर्त

गेल्या वर्षभरात हिंदू पंचागाप्रमाणे एकूण ४९ मुहूर्त होते. या मुहूर्ताांवर लग्नसोहळे पार पडले. याशिवाय जी लग्ने रद्द झाली, लांबणीवर गेली ती नंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर शुभमुहूर्त पाहून लग्नसोहळे पार पडले.

चौकट

एप्रिल महिनाही असाच जाणार

यंदा एप्रिल महिन्यात आता २४, २५, २६, २८,२९ व ३० तारखेला विवाह मुहूर्त आहेत. मे महिन्यात एकूण १६ विवाह मुहूर्त आहेत. तरीही सध्या सांगली जिल्ह्यातील निर्बंध कडक असून जिल्हाबंदी झाली आहे. त्यामुळे हे मुहूर्तही विवाहाविना निघून जाणार आहेत. या काळात मोजकीच लग्ने होण्याची शक्यता आहे. नियमानुसार विवाह करण्याचे सध्या बंधन आहे.