शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री रोजगार योजनेला बँकांचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST

सांगली : युवक-युवतींना स्वयंपूर्ण बनविण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री रोजगार योजने’ला बँकांच्या अडेलतट्टू भूमिकेने खो बसला आहे. वर्षभरात दाखल ...

सांगली : युवक-युवतींना स्वयंपूर्ण बनविण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री रोजगार योजने’ला बँकांच्या अडेलतट्टू भूमिकेने खो बसला आहे. वर्षभरात दाखल झालेल्या एकूण प्रस्तावांपैकी केवळ आठ टक्के प्रस्तावांना बँकांनी मंजुरी दिल्याने हेलपाटे मारून ९२ टक्के अर्जदार थकले आहेत.

सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांबाबत सर्वाधिक तक्रारी येत आहेत. कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी हजारो युवक-युवती धडपडत आहेत. उद्योजक बनण्यासाठी त्यांनी केलेली सर्व तयारी आता बँकांच्या अडवणुकीमुळे धुळीस मिळताना दिसत आहे. १८ ते ४५ वयोगटातील शिक्षित व अर्धशिक्षित लोकांना या योजनेतून प्रस्ताव दाखल करता येतो. यासाठी शासनाने विविध रोजगारांची यादी दिली आहे. पाच ते दहा टक्के भांडवलावर बँकांकडून ६० ते ८० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्याची ही योजना असून शासनाचे अनुदानही मिळते.

योजनेची चांगली वैशिष्ट्ये असली तरी बँकांच्या चुकीच्या धोरणाने योजनेची आणि त्याअंतर्गत दाखल होणाऱ्या प्रस्तावांची वाट बिकट झाली आहे. युवकांच्या मनात फुललेले उद्योजकांचे स्वप्न आता बँकांच्या धोरणांनी कोमेजत आहे. त्यामुळे योजनेबाबत बँकांची भूमिका बदलणे गरजेचे बनले आहे.

चौकट

जिल्ह्यातील स्थिती : २०२०-२१

एकूण दाखल प्रस्ताव : १३२६

मंजूर प्रस्ताव : ११०

बँकांकडून काय दिली जातात कारणे

बहुतांश वेळा अर्जदारांकडून निवडलेला रोजगार बँकांना चुकीचा वाटतो. तो चालणार नाही, असे अधिकारी सांगतात. ठरावीक मर्यादेपर्यंत तारण न घेण्याची बँकांना सूचना असली तरी तारणाबाबत बँका आग्रही राहतात. कागदपत्रांची एकाच वेळी यादी न देता वारंवार नवी कागदपत्रे सांगितली जातात. त्यामुळे हेलपाटे मारून अर्जदार बँकांच्या कर्जापासून दूर होतो. व्यवसायाचा अनुभव नसणे, अर्जदाराकडे पूर्वीच्या कर्जाचा अनुभव नसणे या गोष्टीसुद्धा बँकांना खटकतात. त्यातून प्रस्ताव नामंजूर केले जातात. यातील ३० टक्के बँकांची कारणे योग्य असली तरी ७० टक्के अर्जदारांना केवळ बँकांच्या अडेलतट्टूपणाचा फटका बसत असल्याचा अनुभव बेरोजगार संघटनेचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितला.

कोट

उद्योग करू पाहणाऱ्यांनी योग्य प्रस्ताव दाखल करावेत. बँकांनीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अर्जदारांचा उद्योग उभा करण्याच्या दृष्टीने मदत करावी. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत आम्ही योग्य ते सहकार्य करीत आहोत.

- विद्या कुलकर्णी, व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र