ऐतवडे बु. : बाजीराव बाळाजी पाटील यांनी सहकार सामान्यातील सामान्य माणसापर्यंत पोहोचवला. सहकाराच्या माध्यमातून सामान्यांचा विकास होऊ शकतो हा आग्रह त्यांनी अखंड आयुष्यभर जपला, असे मत पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकार संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांनी व्यक्त केले. बाजीराव बाळाजी पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त ते बोलत होते.
ऐतवडे खुर्द (ता. वाळवा )येथील बा. बा. पाटील विकास सेवा सोसायटी येथे साहित्यप्राज्ञ सहकार महर्षी स्व. बाजीराव बाळाजी पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करताना डॉ. पाटील म्हणाले, ग्रामीण भागामध्ये सहकारी संस्थेचा कारभार आणि व्यवस्थापनाकडे व्यावसायिक व्यवस्थापनाची तत्त्व स्वीकारून आणि सहकार मूल्याचा आधार घेऊन सहकारी संस्था कार्यक्षम व अर्थक्षम पद्धतीने कार्य करू शकतात.
या कार्यक्रमासाठी सोसायटीचे अध्यक्ष गोविंद बाळा पाटील, माजी उपसरपंच ऐतवडे खुर्द बाबासाहेब निवृत्ती चव्हाण, बाजीराव बाळाजी पाटील विकास सोसायटी माजी सचिव पांडुरंग नायकू पवार, वारणा शिक्षण संस्था विश्वस्त नामदेव दगडू परीट, सोसायटीचे सचिव चंद्रकांत सपकाळ, नामदेव उपासे, विवेक बर्गे, सयाजी पाटील, कृष्णात कुंभार, शंकर पाटील, बाबासाहेब चौगुले, दिनकर वडकर उपस्थित होते.