पेठ (ता. वाळवा) येथे विठ्ठल मंदिर ते गोळेवाडी चौकापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा प्रारंभ युवा नेते विराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अतुल पाटील, विजय पाटील, संदीप पाटील, हंबीरराव पाटील, प्रदीप पाटील, हेमंत पाटील, डॉ. अरुण पवार, संतोष देशमाने आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : पेठ (ता. वाळवा) येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि आ. मानसिंगराव नाईक यांच्या माध्यमातून व युवा नेते अतुल पाटील यांच्या प्रयत्नातून विठ्ठल मंदिर ते गोळेवाडी चौकापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा प्रारंभ युवा नेते विराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विराज नाईक म्हणाले, मानसिंगराव नाईक यांनी अनेक गावांमध्ये ग्रामस्थांनी केलेली मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न करत आहेत. यावेळी युवा नेते अतुल पाटील, कृषी बाजार समिती माजी सभापती विजय पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य संदीप पाटील, हंबीरराव पाटील, प्रदीप पाटील, माजी सरपंच हेमंत पाटील, डॉ अरुण पवार, संतोष देशमाने, बजरंग सिद , अंबादास पेठकर, डॉ. सुभाष भांबुरे, शिवाजी पाटील, रवींद्र पाटील, अरुण कदम, तुळशीदास पिसे, अशोक पाटील, जयंत पाटील, संग्राम कदम, दीपक जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.