शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पळशी परिसरात ‘टेंभू’च्या पाण्याचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:20 IST

खानापूर : गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षा असणाऱ्या खानापूर पूर्वभागातील पळशी परिसरात गुरुवारी टेंभूच्या पाण्याचे आगमन झाले. दुर्गम तसेच ...

खानापूर : गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षा असणाऱ्या खानापूर पूर्वभागातील पळशी परिसरात गुरुवारी टेंभूच्या पाण्याचे आगमन झाले. दुर्गम तसेच शंभर टक्के निर्यातक्षम द्राक्षशेती पिकवणाऱ्या ठिकाणी कृष्णामाईचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

दोन वर्षांपूर्वी टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्याच्या माध्यमातून खानापूर घाटमाथ्यावर कृष्णेचे पाणी आले. हे पाणी अग्रणी नदीत सोडल्याने अनेक वर्षे कोरडी वाहणारी अग्रणी नदी वाहती झाली. त्याचप्रमाणे खानापूर तसेच सुलतानगादे साठवण तलावात पाणी सोडण्यात आल्याने घाटमाथ्यावरील टंचाई दूर झाली.

मात्र टेंभूच्या पाण्यापासून पळशी, हिवरे, बाणूरगड हा खानापूर तालुक्यातील पूर्व टोकाचा परिसर वंचित होता.

या परिसरात निर्यातक्षम द्राक्षशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तेथे पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. अनेक कूपनलिका खोदल्या, बागांना टँकरने पाणी दिले. लाखो रुपये खर्चून पाच, दहा किलो मीटरवरून पाणी योजना केल्या.

या परिस्थितीमुळे टेंभू योजनेच्या पाण्याची मोठी प्रतीक्षा होती. आमदार अनिल बाबर यांच्या पाठपुराव्यामुळे अखेरीस पळशी परिसरात कृष्णामाईचे टेंभू योजनेच्या माध्यमातून आगमन झाले.

चौकट

पाण्याचे पूजन

बलवडी (खा) येथील वितरण विहिरीतून बंदिस्त पाइपलाइनद्वारे टेंभूचे पाणी पळशी परिसरात गुरुवारी सायंकाळी सव्वापाच वाजता अवतरले. पळशी येथील गावचा ओढा, शिंधीचा ओढा येथे सर्वप्रथम पाणी पोहोचले. पाण्याचे पूजन सरपंच संगीता जाधव, सुनिता जाधव, संभाजी जाधव, अरविंद पाटील, काकासाहेब जाधव, बबन जाधव, शहाजी इंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.