शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

समाज परिवर्तनात ‘अंनिस’ची भूमिका महत्त्वाची

By admin | Updated: May 12, 2016 00:14 IST

प. रा. आर्डे : अंधश्रध्दा निर्मूलन साहित्य संमेलनातून विवेकनिष्ठ भूमिका मांडण्यात येणार

बुध्दिवादी विचारांची मांडणी करत कृतीतून समाजात परिवर्तन घडविणारे कमीच, मात्र, गेल्या पंचवीस वर्षांपासून ‘अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्रा’च्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रुढी-परंपरा आणि चाली-रितीविरोधात आपले मत मांडणाऱ्या या मासिकाला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने येत्या शनिवार, दि. १४ व १५ मे रोजी सांगलीत दुसऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. संपूर्ण देशातील पुरोगामी विचारांच्या विचारवंतांना एका व्यासपीठावर आणण्यात संयोजक यशस्वी झाले आहेत. विवेकवादी विचारातून समाजात परिवर्तन करु पाहणाऱ्या या संमेलनाच्या पाश्वभूमीवर ‘अंनिवा’मासिकाचे संपादक प्रा. प. रा. आर्डे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...प्रश्न : सध्या चळवळीसमोर कोणत्या अडचणी आहेत, असे वाटते?उत्तर : हो, निश्चितच आहेत. सध्या राज्यात ३५० केंद्रांच्या माध्यमातून अखंडपणे काम सुरु आहे. मात्र, सध्या समिती ज्या विचारांचा, तत्त्वज्ञानाचा, विवेकाचा प्रचार करत आहे, त्यास विरोध करणाऱ्या शक्तींकडून चळवळीबाबत अपप्रचार सुरु आहे. या विवेकवादी चळवळीतून सत्याकडे नेणारा प्रवास होत असताना त्याचे भय या शक्तींना असल्याने त्यांचा विरोध होत आहे. सध्या काही संघटनेकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरुच आहे. मात्र, आमचे कार्यकर्ते या विरोधाला खंबीरपणे तोंड देत आहेत. संघटनात्मक पातळीवर बांधिलकी जपत असताना त्यात थोडाफार विस्कळीतपणा जाणवतो. यामुळे स्वयंस्फूर्तीने सहभागी कार्यकर्त्यांचा उत्साह मावळतो. या काही अडचणी मांडता येतील. प्रश्न : अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीचे आजपर्यंतचे फलित काय?उत्तर : समाजाचे शोषण करणाऱ्या अंधश्रध्दांचे निर्मूलन व्हावे, यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी सादर केलेला कायदा मंजूर झाला. हे संघटनेचे सर्वात मोठे यश आहे. ‘जादूटोणा आणि नरबळी प्रतिबंधक कायद्या’मुळे दोन वर्षात शंभरावर खटले दाखल झाले व जनतेची होणारी फसवणूक रोखली गेली, हे चळवळीचे फलितच म्हणावे लागेल. जनमानसाचे प्रबोधन करण्यात हा कायदा यशस्वी ठरला. लोक स्वत: पुढे येत असल्याने अघोरी प्रथांना चाप बसला आहे. जातपंचायतीच्या विरोधात केलेला कायदाही ‘अंनिस’च्या पाठपुराव्यामुळेच संमत झाला आहे. सध्या महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलने होत असली तरी, १९९५ ला डॉ. दाभोलकरांसह डॉ. श्रीराम लागू, एन. डी. पाटील, पुष्पा भावे आदींनी शनिशिंगणापूरला पहिला सत्याग्रह केला होता. हाच लढा आता प्रबळ ठरल्याने परिवर्तन होऊ शकले, हे चळवळीचे फलितच मानावे लागेल. प्रश्न : डॉ. दाभोलकर यांच्यानंतरची ‘अंनिस’ची चळवळ कशी आहे? उत्तर : या विवेकवादी चळवळीत सहभागी होणारे कार्यकर्ते हे स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आले आहेत. समाजातील काही विशिष्ट घटकांकडून विरोध होत असला, तरी त्याचा खंबीरपणे सामना करत आपले कार्य नि:स्पृहपणे करत आले आहेत. डॉ. दाभोलकरांनी चळवळीतील कार्यकर्त्यांना विचाराने पक्के केले आहे. चळवळ पुढे गेली पाहिजे, हे सांगायचीही गरज कोणाला भासली नाही. उलट त्वेषाने कार्यकर्त्यांनी सहभाग वाढवत चळवळ वाढविण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच जात पंचायतीचा कायदा संमत होऊ शकला. डॉ. दाभोलकरांची उणीव असली तरी, त्याच तडफेने काम सध्या सुरु आहे. प्रश्न : साहित्य संमेलनाच्या माध्यमातून परिवर्तनाचे कोणते कार्य साध्य होईल, असे तुम्हाला वाटते?उत्तर : समितीचे कार्यकर्ते आजवर आपली विवेकनिष्ठ भूमिका मांडत आले आहेत. त्यामुळे या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समितीचे तत्त्वज्ञान व प्रबोधनाचे माध्यम म्हणून या संमेलनाकडे पाहण्यात येते. समितीकडून वर्षातून एकदा अधिवेशन घेत समाजात अंधश्रध्दा निर्मूलनाचे प्रचाराचे काम सुरु आहे. प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी चळवळीला नवे रुप देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या समाजात सुरु असलेल्या फसव्या विज्ञानाचा अतिरेक मोडून काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी संमेलन महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास वाटतो. प्रश्न : प्रशासकीय पातळीवर चळवळीला सहकार्य मिळते का ? उत्तर : प्रामाणिकपणे सांगावयाचे झाल्यास शासनाकडून व प्रशासनाकडून चळवळीला सहकार्यच मिळत आले आहे. या सरकारने पारित केलेला जात पंचायतीचा कायदा याचे उत्तम उदाहरण आहे. मात्र, या सरकारकडून डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाकडे आणि खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात अपयश येत आहे. सरकारची ही भूमिका वेदनादायी आहे.- शरद जाधव, सांगली