शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

अनिलभाऊ, कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे उंबरठे अंधारात का झिजवताय?

By admin | Updated: June 24, 2016 00:49 IST

वैभव पाटील : आमदारांवर टीका; आम्ही जनतेला न्याय देतो

विटा : खानापूर मतदारसंघात विद्यमान आमदारांकडून न्याय मिळत नसल्याने लोक आमच्याकडे येत आहेत. आम्ही पक्ष न पाहता खासदारांच्या माध्यमातून शासनदरबारी जाऊन न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुम्ही एवढे कार्यतत्पर असल्याचे ऊर बडवून सांगताय, मग तालुक्यात लोक आमच्याकडे का येतात? तुम्ही कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या घराचे उंबरठे अंधारात का झिजवताय, असा प्रतिटोला नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना गुरुवारी पत्रकार परिषदेत लगावला. नगराध्यक्ष पाटील म्हणाले की, आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून आमदार विट्यात फंड खर्च करीत आहेत. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी बहुतांशी आमदार फंड दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये खर्च केला होता. मात्र दोन्ही तालुक्यांना न्याय देण्याऐवजी सध्याचे आमदार नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विटा शहरात फंड खर्च करतात. टेंभूसाठी शासनाकडून कोणी किती निधी मिळविला, हे जनतेला माहिती आहे. आतापर्यंत टेंभूसाठी विद्यमान आमदारांनी बारा वर्षांत तीनशे कोटी, तर सदाशिवराव पाटील यांनी दहा वर्षात अकराशे एक कोटीचा निधी मिळविला आहे. विटा पारिसरातील शेतकऱ्यांचा कळवळा आताच का तुम्हाला आला आहे? एवढा कळवळा होता, तर कालच्या दुष्काळी परिस्थितीत तुम्ही काय केले ते जनतेला सांगावे. मतदारसंघात जनावरांसाठी एकही चारा छावणी तुम्ही सुरू करू शकला नाही. दहशत व धमक्यांची विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जुनी व गुळगुळीत झालेली टेप बंद करावी. लोक एकदा फसतात, वारंवार फसतील एवढे लोकांना दूधखुळे समजू नका. गुंडगिरी कोण करते, हे समजण्यासाठी तुम्ही कोणत्या पक्षाचा आधार घेतला आहे, एवढे बघितले तरी पुरे आहे, अशी टीका नगराध्यक्ष पाटील यांनी केली. (वार्ताहर)कामाचा निधी वळवणे हा खुजेपणाच...विटा नगरपालिकेला ८ मार्च रोजी दीड कोटींचे रस्ते अनुदान मिळाले होते. त्यापैकी एक कोटींचे विशेष रस्ते अनुदान होते. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. खासदार संजय पाटील यांनी शिफारस केली होती. त्यानंतर २८ मार्चला हा एक कोटीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्याचा आदेश आला. कॉँग्रेसच्या नेत्यांना निधी देताय, असे सांगून आमदारांनी निधी वळवण्यास सांगितले. त्यानंतर मी आणि खासदार पाटील मुख्यमंत्र्यांना भेटलो. १६ मे रोजी विट्याची कार्यान्वित यंत्रणा बदलून नगरपालिका ही कामे करणार असल्याबाबतचा आदेश निघाला. त्यानुसार प्रस्ताव दाखल करण्यात आले. मात्र आमदारांनी उध्दव ठाकरे यांना भेटून मुख्यमंत्र्यांना फोन करण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा कार्यान्वित यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग करण्यात आल्याने हा निधी तिकडे वर्ग झाला. आम्ही प्रयत्न केलेल्या कामाचा निधी यंत्रणा बदलून वळवणे हा खुजेपणा आहे, अशी टीका पाटील यांनी केली.