शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

अनिलभाऊ, कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे उंबरठे अंधारात का झिजवताय?

By admin | Updated: June 24, 2016 00:49 IST

वैभव पाटील : आमदारांवर टीका; आम्ही जनतेला न्याय देतो

विटा : खानापूर मतदारसंघात विद्यमान आमदारांकडून न्याय मिळत नसल्याने लोक आमच्याकडे येत आहेत. आम्ही पक्ष न पाहता खासदारांच्या माध्यमातून शासनदरबारी जाऊन न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तुम्ही एवढे कार्यतत्पर असल्याचे ऊर बडवून सांगताय, मग तालुक्यात लोक आमच्याकडे का येतात? तुम्ही कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या घराचे उंबरठे अंधारात का झिजवताय, असा प्रतिटोला नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना गुरुवारी पत्रकार परिषदेत लगावला. नगराध्यक्ष पाटील म्हणाले की, आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून आमदार विट्यात फंड खर्च करीत आहेत. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी बहुतांशी आमदार फंड दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये खर्च केला होता. मात्र दोन्ही तालुक्यांना न्याय देण्याऐवजी सध्याचे आमदार नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विटा शहरात फंड खर्च करतात. टेंभूसाठी शासनाकडून कोणी किती निधी मिळविला, हे जनतेला माहिती आहे. आतापर्यंत टेंभूसाठी विद्यमान आमदारांनी बारा वर्षांत तीनशे कोटी, तर सदाशिवराव पाटील यांनी दहा वर्षात अकराशे एक कोटीचा निधी मिळविला आहे. विटा पारिसरातील शेतकऱ्यांचा कळवळा आताच का तुम्हाला आला आहे? एवढा कळवळा होता, तर कालच्या दुष्काळी परिस्थितीत तुम्ही काय केले ते जनतेला सांगावे. मतदारसंघात जनावरांसाठी एकही चारा छावणी तुम्ही सुरू करू शकला नाही. दहशत व धमक्यांची विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जुनी व गुळगुळीत झालेली टेप बंद करावी. लोक एकदा फसतात, वारंवार फसतील एवढे लोकांना दूधखुळे समजू नका. गुंडगिरी कोण करते, हे समजण्यासाठी तुम्ही कोणत्या पक्षाचा आधार घेतला आहे, एवढे बघितले तरी पुरे आहे, अशी टीका नगराध्यक्ष पाटील यांनी केली. (वार्ताहर)कामाचा निधी वळवणे हा खुजेपणाच...विटा नगरपालिकेला ८ मार्च रोजी दीड कोटींचे रस्ते अनुदान मिळाले होते. त्यापैकी एक कोटींचे विशेष रस्ते अनुदान होते. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. खासदार संजय पाटील यांनी शिफारस केली होती. त्यानंतर २८ मार्चला हा एक कोटीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्याचा आदेश आला. कॉँग्रेसच्या नेत्यांना निधी देताय, असे सांगून आमदारांनी निधी वळवण्यास सांगितले. त्यानंतर मी आणि खासदार पाटील मुख्यमंत्र्यांना भेटलो. १६ मे रोजी विट्याची कार्यान्वित यंत्रणा बदलून नगरपालिका ही कामे करणार असल्याबाबतचा आदेश निघाला. त्यानुसार प्रस्ताव दाखल करण्यात आले. मात्र आमदारांनी उध्दव ठाकरे यांना भेटून मुख्यमंत्र्यांना फोन करण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा कार्यान्वित यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग करण्यात आल्याने हा निधी तिकडे वर्ग झाला. आम्ही प्रयत्न केलेल्या कामाचा निधी यंत्रणा बदलून वळवणे हा खुजेपणा आहे, अशी टीका पाटील यांनी केली.