शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आषाढ-श्रावणातील आनंदघन लुप्त

By admin | Updated: August 26, 2015 23:07 IST

निसर्गसंपन्न शिराळा तालुका कोरडाच : वारणा डावा कालवाही पाण्याविना

सहदेव खोत -पुनवत  सांगली जिल्ह्यातील पावसाचे आगर म्हणजे शिराळा तालुका. आषाढ, श्रावणात कधी तुफानी, तर कधी श्रावणसरींनी बरसणाऱ्या वरुणराजाने सध्या तालुक्याकडे पाठ फिरवली आहे. दिवसभर अधूनमधून कडक ऊन, तर कधी पावसाची रिमझिम आणि रात्री पाऊलवाटा स्पष्ट दिसाव्या असे लख्ख चांदणे... गेल्या महिन्याभरापासून निसर्गाचे असे विचित्र रूप पाहण्याचा योग तालुकावासीयांच्या वाट्याला आला आहे.शिराळा तालुका म्हणजे जिल्ह्यात निसर्गाचे वरदान लाभलेला तालुका. येथील डोंगर-दऱ्या, चांदोली धरण परिसर, वारणा नदीची ठिकठिकाणांहून दिसणारे विलोभनीय दृश्य अशा विविध गोष्टींमुळे तालुका जणू नजरेतच भरत असतो.पावसाळ्यात तर येथे दिसणारे मोहक दृश्य सर्वांनाच सुखावणारे असते. मात्र यंदाच्या पावसाळ्यात मात्र आषाढ - श्रावणातील आनंददायी रूप लुप्त झाल्याचे जाणवत आहे. फक्त चांदोली धरण परिसरात जेमतेम पाऊस असल्याने वारणेला समाधानकारक पाणी आहे. आषाढ संपला, श्रावण सरत चालला तरी पाऊसच झाला नाही. त्यातच पावसाची तरणा, म्हातारा ही नक्षत्रेही कोरडीच गेली आहेत.वारणा नदी सोडली तर ओढे, नाले, तलाव, तळी, कालवे यात समाधानकारक पाणी नाही. पावसाळ्यात तुडुंब असणारे पाण्याचे हे स्रोत कोरडेच आहेत. दिवसभर ऊन, अधूनमधून केव्हातरी फक्त रिमझिम व रात्री पाऊलवाटा स्पष्ट दिसाव्या असे लख्ख चांदणे असे विचित्र वातावरण तालुक्यात दिसत आहे. पावसाळ्यात तुडुंब असणारा वारणा डावा कालवा कोरडा ठप्प पडला आहे.तालुक्यात शेतीपिके कशीतरी तग धरून आहेत. विचित्र वातावरणामुळे नागरिकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला आदी आजारांनीही पछाडलेले आहे. ऐन पावसाळ्यात पावसाचे आगरच पावसापासून वंचित असल्याने, नागरिक, पर्यावरणप्रेमी, पर्यटक, शेतकरी यांचा आनंद हरवला आहे. पर्जन्याचे ढग हटून चिंतचे ढग तालुक्यातील शेतकरी, नागरिकांच्या डोईवर आले आहेत. पाणपक्ष्यांचे स्थलांतर?तालुक्यात नदी, तलाव, कालवा यामध्ये समाधानकारक पाणी नसल्याने प्रतिवर्षी पावसाळ्यात पाण्याजवळ आढळणारे पाणकावळा (करढोक), खंड्या (किंगफिशर), काळे-पांढरे पाणबदक, लहान-मोठे बगळे, पाणकोंबड्या यासारखे पाणपक्षी नजरेस पडेनासे झाले आहेत. पाऊस नसल्याने त्यांनी स्थलांतर केल्याचे जाणवत आहे.