शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

वारणा पाणी योजनेला केंद्राकडून ‘अमृत’

By admin | Updated: July 15, 2016 23:56 IST

महापालिका : पाणी पुरवठ्यासाठी ७५ कोटी मंजुरीमुळे आशा पल्लवित

शीतल पाटील-- सांगली -बारमाही वाहणारी कृष्णा नदी ऐन उन्हाळ्यात कोरडी पडू लागली आहे. यंदा दोनदा सांगली व कुपवाड शहराला पाणीबाणीला सामोरे जावे लागले. त्यातून पुन्हा वारणा पाणी योजनेची चर्चा रंगली. आता वारणेच्या पाण्याचे स्वप्न सत्यात उतरू शकते. केंद्र शासनाने अमृत योजनेतून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासाठी ७५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून वारणा योजना मार्गी लागू शकते. त्यामुळे आता महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, आयुक्तांसह आमदार, खासदारांनीही भूमिका घेण्याची गरज आहे. काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांच्या सत्ताकाळात वारणा नदीतून सांगली व कुपवाड या दोन शहरांना पाणी पुरवठा करणारी योजना आखण्यात आली. केंद्र शासनाने युआयडीएसएसएमटीच्या अंतर्गत शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा बळकटीसाठी ७९.०२ कोटीच्या योजनेला मंजुरी दिली. पण पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली अन् मदन पाटील यांची सत्ताही गेली. त्यामुळे वारणा योजनेचे काम रखडले. नव्याने सत्तेवर आलेल्या विकास महाआघाडीने योजनेची कामे हाती घेतली. वारणा उद्भव वगळून शहरातील वितरण व्यवस्था बळकटीकरणावर त्यांनी भर दिला. पहिल्या टप्प्यातील निधीतून जीवन प्राधिकरणाच्या साहाय्याने कुपवाड झोनमधील तीन उंच टाक्या, सहा हजार ५०० मीटरच्या वितरण व्यवस्थेची कामे झाली. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेकडील थकबाकीचे साडेचार कोटी, तर तिसऱ्या टप्प्यात केंद्राचे २०.६२ कोटी पालिकेला प्राप्त झाले. यातून जॅकवेल ते माळबंगल्यापर्यंतची दाबनलिका, पाच उंच टाक्या, गुरुत्वनलिका, १०२ किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था, वानलेसवाडी व वाघमोडेनगर येथे पाण्याची टाकी अशी कामे हाती घेण्यात आली आहेत. केंद्राने चौथा टप्पा म्हणून ३५ कोटींचा निधी पालिकेला दिला आहे. महाआघाडीने मूळ वारणा योजनेला बगल देऊन, कृष्णेतूनच पाणी उचलण्याचा निर्णय घेतला होता. पण आता पालिकेतील सत्तांतरानंतर पुन्हा एकदा वारणेच्या पाण्याचा विषय ऐरणीवर आला.मदन पाटील यांनी पुन्हा वारणा योजनेचा आग्रह धरला. त्यात यंदा दोनदा सांगलीतील कृष्णा नदी कोरडी पडली. फेब्रुवारी महिन्यातच नदीपात्रातील पाणी कमी झाले होते, तर मे महिन्यात सांगलीकरांवर पाणीबाणीचे संकट आले होते. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कसेबसे हे आव्हान पेलत नागरिकांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा केला. कमी झालेले पर्जन्यमान, कोयनेतील अपुरा पाणीसाठा, टेंभू व ताकारीतून होणारा पाणी उपसा यामुळे सांगलीतील पाणी संकट अजूनही कायम आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेचा समावेश होऊ शकला नाही. पण अमृत योजनेत पालिकेचा समावेश झाला होता. या योजनेत पालिकेने ४५९ कोटी रुपयांचे प्रस्ताव पाठविले होते. त्यात पाणीपुरवठा विभागाच्या सांगली, मिरज शहरातील वितरण व पाण्याच्या टाक्यासाठी १३०.८६ कोटी, वारणा योजनेसाठी ७० कोटी अशा २००.८६ कोटी रुपयांचा समावेश होता. त्याशिवाय कुपवाड ड्रेनेज योजनेसाठी १४३ कोटी, सांगली ड्रेनेजसाठी ५५.७३ कोटी व मिरज ड्रेनेजसाठी ५९.९९ कोटी असे २५८.७२ कोटीचे प्रस्ताव दिले होते. त्यापैकी पाणीपुरवठा विभागासाठी अमृत योजनेतून ७५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून वारणा पाणी योजना मार्गी लागू शकते. केंद्राकडून हा प्रश्न निकाली निघू शकतो. समडोळी की हरिपूर, नवा वादकाँग्रेसच्या सत्ताकाळात समडोळी येथून वारणा नदीतून पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याची योजना आखण्यात आली होती. त्यासाठी समडोळी येथे जॅकवेल, पंपगृह उभारण्यात येणार होते. समडोळीतून ११ किलोमीटर पाईपलाईन टाकावी लागणार आहे. त्याशिवाय कृष्णा नदीत थोडा पूल बांधून त्यावरून पाईपलाईन सांगलीतील जॅकवेलजवळ जोडण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. आता काही लोकप्रतिनिधींनी हरिपूर येथून वारणा नदीतून पाणी उपसा करावा, असा प्रस्ताव दिला आहे. हरिपूर ते कोथळी या नवीन पुलाचे काम सुरू होणार आहे. या पुलावरून नदी क्रॉस करता येईल, असा दावा आहे. पण सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरून पाईपलाईन करण्यास प्रतिबंध केला आहे. पुलाची क्षमता पाण्याच्या पाईपलाईनचा दबाव पेलण्याइतपत सक्षम नाही. त्यासाठी पुलाची बांधकाम क्षमता वाढवावी लागेल. पण तत्पूर्वीच नाबार्डने पुलाच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. क्षमता वाढविण्यासाठी जादा निधीची गरज आहे. त्याला नाबार्ड मंजुरी देणार नाही. त्यामुळे सध्या तरी समडोळीचाच पर्याय योग्य आणि रास्त असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. वारणा की जलशुद्धीकरण केंद्र?केंद्राने अमृत योजनेतून ७५ कोटीचा निधी मंजूर केला असला तरी, त्यातून कोणती कामे करायची, याबाबत संभ्रम आहे. वारणा योजनेसोबतच ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे कामही महत्त्वाचे आहे. त्यासाठी ३० कोटीची गरज आहे. त्यामुळे आता वारणेचे काम हाती घेणार, की जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण करणार, याचा निर्णय पदाधिकारी व प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.