शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मोदींनी कौतुक केले तरी वास्तव वेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले असले तरी वास्तव वेगळेच आहे. या सरकारने काय केले हे ...

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले असले तरी वास्तव वेगळेच आहे. या सरकारने काय केले हे सर्वांना माहीत आहे, अशी टीका भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

पडळकर म्हणाले की, कोरोनाकाळातील उपाययोजनांबाबत आम्ही वेळोवेळी आमचे मत मांडत आहोत. सरकारने काय केले, हे जनतेला माहीत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना सरकारने गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळेच आरक्षण रद्दचा निर्णय झाला. राज्याच्याच अखत्यारीत हा विषय आहे. त्यामुळे राज्य शासनानेच तो सोडविला पाहिजे. फडणवीस यांचे सरकार असताना त्यांनी हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात मार्गी लावला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचीच ही चूक आहे. समाजाचे जे नुकसान झाले आहे, त्यालाही उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत.

ते म्हणाले की, युती सरकारने २०१८ मध्ये ४१३ अधिकाऱ्यांची मेगा भरती जाहीर केली. जुलै २०१९ मध्ये परीक्षा पार पडल्या. त्याचा निकाल जून २०२० मध्ये लागला. निकाल लागून आता दीड वर्ष झाले तरी उत्तीर्ण युवकांना नियुक्तीपत्रे दिली नाहीत. यातील खुल्या प्रवर्गातून उत्तीर्ण झालेल्या ७८ पैकी एसईबीसी प्रवर्गातून उत्तीर्ण झालेल्या ४८ जागांचे काय करायचे? यात बहुतांश मराठा समाजातील युवक आहेत. या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात, अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.

चौकट

धनगर आरक्षणाचा विषय राज्याचाच

पडळकर म्हणाले की, धनगर आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न हा केवळ राज्य सरकारशी संबंधित आहे. केंद्र सरकारची यात कोणतीही भूमिका नाही. त्यामुळे राज्यानेच हा प्रश्न सोडवावा.

चौकट

बाकीच्या भरतीचा नंतर पाठपुरावा

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या भरतीबाबत भूमिका काय, असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर पडळकर म्हणाले, तूर्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भरतीचा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. महावितरणसह अन्य खात्यांतील रखडलेल्या भरतीबाबतही योग्यवेळी पाठपुरावा करू.