शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

मोदींनी कौतुक केले तरी वास्तव वेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले असले तरी वास्तव वेगळेच आहे. या सरकारने काय केले हे ...

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले असले तरी वास्तव वेगळेच आहे. या सरकारने काय केले हे सर्वांना माहीत आहे, अशी टीका भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

पडळकर म्हणाले की, कोरोनाकाळातील उपाययोजनांबाबत आम्ही वेळोवेळी आमचे मत मांडत आहोत. सरकारने काय केले, हे जनतेला माहीत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना सरकारने गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळेच आरक्षण रद्दचा निर्णय झाला. राज्याच्याच अखत्यारीत हा विषय आहे. त्यामुळे राज्य शासनानेच तो सोडविला पाहिजे. फडणवीस यांचे सरकार असताना त्यांनी हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात मार्गी लावला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचीच ही चूक आहे. समाजाचे जे नुकसान झाले आहे, त्यालाही उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत.

ते म्हणाले की, युती सरकारने २०१८ मध्ये ४१३ अधिकाऱ्यांची मेगा भरती जाहीर केली. जुलै २०१९ मध्ये परीक्षा पार पडल्या. त्याचा निकाल जून २०२० मध्ये लागला. निकाल लागून आता दीड वर्ष झाले तरी उत्तीर्ण युवकांना नियुक्तीपत्रे दिली नाहीत. यातील खुल्या प्रवर्गातून उत्तीर्ण झालेल्या ७८ पैकी एसईबीसी प्रवर्गातून उत्तीर्ण झालेल्या ४८ जागांचे काय करायचे? यात बहुतांश मराठा समाजातील युवक आहेत. या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात, अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.

चौकट

धनगर आरक्षणाचा विषय राज्याचाच

पडळकर म्हणाले की, धनगर आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न हा केवळ राज्य सरकारशी संबंधित आहे. केंद्र सरकारची यात कोणतीही भूमिका नाही. त्यामुळे राज्यानेच हा प्रश्न सोडवावा.

चौकट

बाकीच्या भरतीचा नंतर पाठपुरावा

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या भरतीबाबत भूमिका काय, असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर पडळकर म्हणाले, तूर्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भरतीचा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. महावितरणसह अन्य खात्यांतील रखडलेल्या भरतीबाबतही योग्यवेळी पाठपुरावा करू.