शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

मोदींनी कौतुक केले तरी वास्तव वेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले असले तरी वास्तव वेगळेच आहे. या सरकारने काय केले हे ...

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले असले तरी वास्तव वेगळेच आहे. या सरकारने काय केले हे सर्वांना माहीत आहे, अशी टीका भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

पडळकर म्हणाले की, कोरोनाकाळातील उपाययोजनांबाबत आम्ही वेळोवेळी आमचे मत मांडत आहोत. सरकारने काय केले, हे जनतेला माहीत आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना सरकारने गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळेच आरक्षण रद्दचा निर्णय झाला. राज्याच्याच अखत्यारीत हा विषय आहे. त्यामुळे राज्य शासनानेच तो सोडविला पाहिजे. फडणवीस यांचे सरकार असताना त्यांनी हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात मार्गी लावला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचीच ही चूक आहे. समाजाचे जे नुकसान झाले आहे, त्यालाही उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत.

ते म्हणाले की, युती सरकारने २०१८ मध्ये ४१३ अधिकाऱ्यांची मेगा भरती जाहीर केली. जुलै २०१९ मध्ये परीक्षा पार पडल्या. त्याचा निकाल जून २०२० मध्ये लागला. निकाल लागून आता दीड वर्ष झाले तरी उत्तीर्ण युवकांना नियुक्तीपत्रे दिली नाहीत. यातील खुल्या प्रवर्गातून उत्तीर्ण झालेल्या ७८ पैकी एसईबीसी प्रवर्गातून उत्तीर्ण झालेल्या ४८ जागांचे काय करायचे? यात बहुतांश मराठा समाजातील युवक आहेत. या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात, अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.

चौकट

धनगर आरक्षणाचा विषय राज्याचाच

पडळकर म्हणाले की, धनगर आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न हा केवळ राज्य सरकारशी संबंधित आहे. केंद्र सरकारची यात कोणतीही भूमिका नाही. त्यामुळे राज्यानेच हा प्रश्न सोडवावा.

चौकट

बाकीच्या भरतीचा नंतर पाठपुरावा

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या भरतीबाबत भूमिका काय, असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर पडळकर म्हणाले, तूर्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भरतीचा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. महावितरणसह अन्य खात्यांतील रखडलेल्या भरतीबाबतही योग्यवेळी पाठपुरावा करू.