शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

पीक विम्याच्या प्रक्रियेतून सर्वच बँकांना डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शासनाने पुन्हा एकदा जिल्हा बॅँकांसह सर्वच बँकांवर अविश्वास दाखवित, पीक विम्याचे अर्ज व पैसे स्वीकारण्याचे अधिकार ई-सुविधा केंद्रांनाच दिले आहेत. त्याचबरोबरच नवीन आदेशात अर्ज करण्यासाठीची वाढीव पाच दिवसांची मुदत आता चार दिवसांवर आणली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकºयांची धावपळ सुरू झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून पीक विम्याचा गोंधळ ...

ठळक मुद्देपीक विम्याचा गोंधळ संपूर्ण राज्यभरात सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शासनाने पुन्हा एकदा जिल्हा बॅँकांसह सर्वच बँकांवर अविश्वास दाखवित, पीक विम्याचे अर्ज व पैसे स्वीकारण्याचे अधिकार ई-सुविधा केंद्रांनाच दिले आहेत. त्याचबरोबरच नवीन आदेशात अर्ज करण्यासाठीची वाढीव पाच दिवसांची मुदत आता चार दिवसांवर आणली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकºयांची धावपळ सुरू झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून पीक विम्याचा गोंधळ संपूर्ण राज्यभरात सुरू आहे. सुरुवातीची पीक विमा अर्जाची मुदत ३१ जुलैपर्यंतच होती. राष्टÑीयीकृत व जिल्हा बॅँकांमार्फतही अर्ज स्वीकारले जात होते. या कालावधित मोठ्या प्रमाणावर बॅँकांकडे अर्ज व पैसे दाखल झाले होते. सोमवारी पाच दिवसांची मुदतवाढ दिल्याचे आदेश शासनाने बॅँकांना पाठविले. त्यानंतर सोमवारी १ आॅगस्ट रोजीही बॅँकांनी अर्ज स्वीकारले होते. रात्री उशिरा पुन्हा कृषी विभागाने आदेश काढून ४ आॅगस्टपर्यंतचीच मुदतवाढ दिली आहे. शेतकºयांनी त्यांचे अर्ज केवळ ई-सुविधा केंद्रांवरच किंवा स्वत: आॅनलाईन दाखल करावेत, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात व ई-सुविधा केंद्रापासून दूर असलेल्या गावांमधील शेतकºयांची पळापळ सुरू झाली आहे. आदेशात वारंवार होत असलेल्या बदलामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा पीक विम्याच्या अर्जांची संख्या घटली आहे.एक आॅगस्टपर्यंत सांगली जिल्हा बँकेकडे ७७ हजार शेतकºयांचे पीक विम्याचे अर्ज दाखल झाले होते. गतवर्षी १ लाख ८0 हजार शेतकºयांनी पीक विम्यासाठी अर्ज दाखल केले होते. यावर्षी तुलनेने अत्यंत कमी अर्ज दाखल झाले आहेत. पीक विम्यासाठी केंद्र सरकारने यंदा आॅनलाईन प्रणाली सुरु केली आहे. यात अनेक त्रुटी असल्याने शेतकºयांना अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागला. बॅँक कर्मचाºयांनाही याचा त्रास झाला.पीक विम्यासाठी केवळ पाच कागदपत्रांची गरज आहे. यात शेतकºयांचा विहीत नमुन्यातील अर्ज, त्याच्यासोबत पीक पेरणी उतारा, ८ अ चा उतारा, बॅँक पासबुक व आधार कार्डची छायांकित प्रत या पाच कागदपत्रांचा समावेश आहे. हे कागद घेऊन शेतकºयांनी जिल्हा बॅँक, विकास सोसायट्यांच्या शाखेत जाऊन पीक विमा भरायचा होता. आता हीच प्रक्रिया ई-सुविधा केंद्रांवर चालणार आहे. जिल्हा बँकांमधील ही प्रक्रिया बंद केली आहे.वारंवार आदेशात बदलमंगळवारी जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये पीक विम्याचा भरणा करण्यासाठी आलेल्या शेतकºयांना नव्या शासन आदेशामुळे परतावे लागले. त्यांना आता ई-सुविधा केंद्रांमध्ये गर्दी करून अर्ज भरावे लागणार आहेत. जिल्हा बँकांनी आॅफलाईन अर्ज स्वीकारून रात्री उशिरापर्यंत त्यांची आॅनलाईन नोंदणी केली होती. असा प्रतिसाद आता ई-सुविधा केंद्रांवर मिळणे कठीण दिसत आहे.