शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून थक्क व्हाल
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
4
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
5
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
7
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
8
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
9
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
10
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
11
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
12
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
13
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
14
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?
15
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टी २५ हजारांच्या वर; Cipla, Zomato, Dr Reddy's मध्ये खरेदी
17
IND W vs SA W ICC Women's ODI World Cup Live Streaming : टीम इंडियाला हॅटट्रिकसह टेबल टॉपर होण्याची संधी, पण..
18
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
19
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
20
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका

पीक विम्याच्या प्रक्रियेतून सर्वच बँकांना डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शासनाने पुन्हा एकदा जिल्हा बॅँकांसह सर्वच बँकांवर अविश्वास दाखवित, पीक विम्याचे अर्ज व पैसे स्वीकारण्याचे अधिकार ई-सुविधा केंद्रांनाच दिले आहेत. त्याचबरोबरच नवीन आदेशात अर्ज करण्यासाठीची वाढीव पाच दिवसांची मुदत आता चार दिवसांवर आणली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकºयांची धावपळ सुरू झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून पीक विम्याचा गोंधळ ...

ठळक मुद्देपीक विम्याचा गोंधळ संपूर्ण राज्यभरात सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शासनाने पुन्हा एकदा जिल्हा बॅँकांसह सर्वच बँकांवर अविश्वास दाखवित, पीक विम्याचे अर्ज व पैसे स्वीकारण्याचे अधिकार ई-सुविधा केंद्रांनाच दिले आहेत. त्याचबरोबरच नवीन आदेशात अर्ज करण्यासाठीची वाढीव पाच दिवसांची मुदत आता चार दिवसांवर आणली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकºयांची धावपळ सुरू झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून पीक विम्याचा गोंधळ संपूर्ण राज्यभरात सुरू आहे. सुरुवातीची पीक विमा अर्जाची मुदत ३१ जुलैपर्यंतच होती. राष्टÑीयीकृत व जिल्हा बॅँकांमार्फतही अर्ज स्वीकारले जात होते. या कालावधित मोठ्या प्रमाणावर बॅँकांकडे अर्ज व पैसे दाखल झाले होते. सोमवारी पाच दिवसांची मुदतवाढ दिल्याचे आदेश शासनाने बॅँकांना पाठविले. त्यानंतर सोमवारी १ आॅगस्ट रोजीही बॅँकांनी अर्ज स्वीकारले होते. रात्री उशिरा पुन्हा कृषी विभागाने आदेश काढून ४ आॅगस्टपर्यंतचीच मुदतवाढ दिली आहे. शेतकºयांनी त्यांचे अर्ज केवळ ई-सुविधा केंद्रांवरच किंवा स्वत: आॅनलाईन दाखल करावेत, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात व ई-सुविधा केंद्रापासून दूर असलेल्या गावांमधील शेतकºयांची पळापळ सुरू झाली आहे. आदेशात वारंवार होत असलेल्या बदलामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा पीक विम्याच्या अर्जांची संख्या घटली आहे.एक आॅगस्टपर्यंत सांगली जिल्हा बँकेकडे ७७ हजार शेतकºयांचे पीक विम्याचे अर्ज दाखल झाले होते. गतवर्षी १ लाख ८0 हजार शेतकºयांनी पीक विम्यासाठी अर्ज दाखल केले होते. यावर्षी तुलनेने अत्यंत कमी अर्ज दाखल झाले आहेत. पीक विम्यासाठी केंद्र सरकारने यंदा आॅनलाईन प्रणाली सुरु केली आहे. यात अनेक त्रुटी असल्याने शेतकºयांना अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागला. बॅँक कर्मचाºयांनाही याचा त्रास झाला.पीक विम्यासाठी केवळ पाच कागदपत्रांची गरज आहे. यात शेतकºयांचा विहीत नमुन्यातील अर्ज, त्याच्यासोबत पीक पेरणी उतारा, ८ अ चा उतारा, बॅँक पासबुक व आधार कार्डची छायांकित प्रत या पाच कागदपत्रांचा समावेश आहे. हे कागद घेऊन शेतकºयांनी जिल्हा बॅँक, विकास सोसायट्यांच्या शाखेत जाऊन पीक विमा भरायचा होता. आता हीच प्रक्रिया ई-सुविधा केंद्रांवर चालणार आहे. जिल्हा बँकांमधील ही प्रक्रिया बंद केली आहे.वारंवार आदेशात बदलमंगळवारी जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये पीक विम्याचा भरणा करण्यासाठी आलेल्या शेतकºयांना नव्या शासन आदेशामुळे परतावे लागले. त्यांना आता ई-सुविधा केंद्रांमध्ये गर्दी करून अर्ज भरावे लागणार आहेत. जिल्हा बँकांनी आॅफलाईन अर्ज स्वीकारून रात्री उशिरापर्यंत त्यांची आॅनलाईन नोंदणी केली होती. असा प्रतिसाद आता ई-सुविधा केंद्रांवर मिळणे कठीण दिसत आहे.