शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

कासेगाव परिसरात क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प : देवराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:20 IST

कासेगाव : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातील कासेगावसह येवलेवाडी, तांबवे व नेर्ले या गावांतील क्षारपड जमीन सुधारणा ...

कासेगाव : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातील कासेगावसह येवलेवाडी, तांबवे व नेर्ले या गावांतील क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प राबविणार आहोत. या गावातील क्षारपड जमिनीचा सर्व्हे लवकरच सुरू करीत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक देवराज पाटील यांनी दिली.

कासेगाव ग्रामपंचायत सभागृहात देवराज पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रिया लांजेकर, उपअभियंता आर.बी. गाजी, बाजार समितीचे उपसभापती सुरेश गावडे, सरपंच किरण पाटील, सोमेश्वर पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील उपस्थित होते. देवराज पाटील म्हणाले, आपल्या परिसरात क्षारपड जमिनीचे प्रमाण मोठे असल्याने जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ६-७ वर्षांपूर्वी कासेगाव, उरूण इस्लामपूर, साखराळे, बोरगाव या गावांतील २ हजार ५०० एकर क्षारपड जमिनीची शासनाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात आली आहे. यातून कासेगावातील २५० एकर जमिनीची सुधारणा करण्यात आली असून, या क्षेत्रात चांगले उत्पादन घेतले जात आहे. जयंत पाटील यांनी ४० वर्षांपूर्वीचा शासन निर्णय बदलल्याने शेतकऱ्यांच्या क्षारपड जमिनी सुधारण्याचे प्रकल्प राबविले जात आहेत. पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण करून त्या- त्या गावातील क्षेत्र व खर्च निश्चित केले जाणार आहे. यातून हजारो एकर क्षारपड जमिनीची सुधारणा होऊन शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. या प्रकल्पातून कासेगावतील ७०० एकर जमिनीची सुधारणा केली जाणार आहे.

यावेळी राजारामबापू साखर कारखान्याचे इरिगेशन ऑफिसर डी.एम. पाटील, जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता प्रवीण वसगडेकर, सेवा सोसायटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी उपसरपंच शशिकांत डबाणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील व शेतकरी उपस्थित होते.