शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
3
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
4
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
5
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
6
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
7
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
8
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
9
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
10
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
11
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
12
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
13
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
14
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
15
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
16
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
17
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
18
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
19
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
20
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."

दीड वर्षानंतर वाजली शाळांची घंटा, पहिल्याच दिवशी २० शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST

सांगली : शासनाच्या आदेशानुसार व ग्रामपंचायतींच्या ना हरकतीनुसार जिल्ह्यात पहिल्याच दिवशी २० शाळा सुरू झाल्या. आठवी ते बारावीचे वर्ग ...

सांगली : शासनाच्या आदेशानुसार व ग्रामपंचायतींच्या ना हरकतीनुसार जिल्ह्यात पहिल्याच दिवशी २० शाळा सुरू झाल्या. आठवी ते बारावीचे वर्ग भरले.

संबंधित गावांतील कोरोनाची स्थिती पाहून १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यासाठी काही बंधनेही घातली होती. शिक्षकांची आरटी-पीसीआर चाचणी, गावात नवे रुग्ण नसणे, अशा अटी घातल्या होत्या. ग्रामपंचायत व पालकांची ना हरकत पत्रेदेखील सक्तीची होती. या अटींची पूर्तता करत गुरुवारी (दि.१५) वीस शाळांची घंटा वाजली. आठवी ते बारावीदरम्यान एकूण विद्यार्थी संख्या १ लाख ४९ हजार २० इतकी आहे. २० शाळांत पहिल्या दिवशी १ हजार ५८९ शाळांनी हजेरी लावली. उर्वरित शाळादेखील टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची अपेक्षा आहे.

आज सुरू झालेल्या शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र बेंचवर सोशल डिस्टन्स राखून बसवण्यात आले. मास्क सक्तीचा होता. शिक्षकांचीही चाचणी करून व मास्कसह परवानगी देण्यात आली होती. विद्यार्थ्यांना मैदानावर खेळण्यास निर्बंध घालण्यात आले.

चौकट

तालुकानिहाय सुरू झालेल्या शाळा अशा...

तासगाव ३, खानापूर ६, कवठेमहांकाळ ६, जत ५. महापालिका क्षेत्रात एकही शाळा सुरू झाली नाही. रुग्णसंख्या जास्त असलेल्या वाळवा, मिरज, कडेगाव या तालुक्यांतही शाळा बंंदच राहिल्या. जिल्हाभरात एकूण ८८८ शाळा बंद राहिल्या.