शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

विधानसभेनंतर जयंत पाटीलच ‘रेंज’मध्ये

By admin | Updated: January 3, 2015 00:13 IST

मिरज पश्चिम भागातील चित्र : बाकीचे ‘आऊट आॅफ कव्हरेज एरिया’

सोमनाथ डवरी : कसबे डिग्रज :नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विरोधकांनी घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेमुळे माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी एकतर्फी विजय मिळवला. त्यामध्ये त्यांच्या दांडग्या लोकसंपर्काचाही वाटा आहे. आता विजयानंतरही त्यांचा सतत जनसंपर्क आहे, दुसरीकडे मात्र पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी अद्यापही या भागात फिरकलेले नाहीत, तर यंदा निवडणूक लढविणारे, सर्व विरोधकांनी पाठिंबा दिलेले अभिजित पाटील, काँग्रेसचे जितेंद्र पाटील, बी. जी. पाटील ही मंडळीही गायब झाली आहेत.विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ग्रामविकासमंत्री म्हणून मिरज पश्चिम भागातील आठ गावांत जयंत पाटील यांनी संपर्कात सातत्य ठेवले. परिसरातील रस्ते, गटारी, कूपनलिका या कामांबरोबरच विविध शासकीय योजना आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे राजारामबापू समूहातील साखर कारखाना, दूध संघ, बँक या संस्थांच्या माध्यमातून विविध कामे करण्यासाठी नियमित प्रयत्नशील राहिले. तथापि परिसरातील पाच गावांसाठीची ‘पुरा’ योजना अद्यापही सुरू नाही. या योजनेच्या प्रक्रियेत बाकी विकासकामे खोळंबल्याचे चित्र आहे. शिवाय सांगली-पेठ राज्यमार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. कसबे डिग्रज-मौजे डिग्रज पुलाच्या कामाचीही प्रतीक्षा आहे.असे असले तरी दु:खद घटनेवेळी संबंधितांची भेट घेणे, लग्नसमारंभास हजेरी लावणे आदी जनसंपर्काची कामे जयंत पाटील आवर्जून करतात. विधानसभेच्या निवडणुकीनंतर तुंग, सावळवाडी, दुधगाव, कसबे डिग्रज येथे कार्यक्रम घेण्यात आले. कवठेपिरानमधील हिंदकेसरी मारुती माने यांच्या स्मारकाच्या कामास प्रारंभ झाला. यातून जयंत पाटील कायम लोकसंपर्कात असल्याचे दिसते.दुसरीकडे मात्र गत विधानसभेनंतर वैभव नायकवडी या भागात फिरकले नसल्याचे चित्र आहे. हुतात्मा साखर कारखान्यास सर्वसामान्यांचा किती ऊस नेला जातो?, असा प्रश्न विचारला जात आहे.‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी कोठे आहेत?’, असा ‘मेसेज’ व्हॉटस् अपवर फिरत आहे. सोबतीला ‘सदाभाऊंचा बंगला किती मोठा झाला?’ अशीही चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे अभिजित पाटील या भागातील काँग्रेस मतदारांची भेट घेण्यासाठीही आले नाहीत. शिवाय जितेंद्र पाटील आणि बी. जी. पाटील कोठे गायब झाले?, असा सवाल केला जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्नही जैसे थेच आहेत.