शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

कोविड कुटुंबांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी प्रशासनाची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:25 IST

इस्लामपूर : कोरोनाच्या आपत्तीमुळे सुरू झालेला शारीरिक व्याधी कुटुंबातील, नात्यातील व्यक्तींचे आकस्मित मृत्यू, आर्थिक व्यावसायिक ताण यामुळे चिंता आणि ...

इस्लामपूर : कोरोनाच्या आपत्तीमुळे सुरू झालेला शारीरिक व्याधी कुटुंबातील, नात्यातील व्यक्तींचे आकस्मित मृत्यू, आर्थिक व्यावसायिक ताण यामुळे चिंता आणि नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी ‘चला मनोमित्र होऊ या’ हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती शुश्रुषा सल्ला व मार्गदर्शन केंद्राचे मानसतज्ज्ञ कालिदास पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, मनाला सावरण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा राज्यातील पहिलाच उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात कोल्हापूरच्या सायबरमधील समाजविज्ञान विभागातील ८५ विद्यार्थी व प्राध्यापक मनोमित्र म्हणून सहभाग घेत आहेत. राज्यातील १२० मानसतज्ज्ञांनी जिल्ह्यातील कोविड कुटुंबांच्या मानसिक स्वास्थ्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

ते म्हणाले, कोविडमुळे चिंता, काळजी आणि नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. नातेसंबंध बिघडले आहेत. आत्महत्येच्या विचारांना थोपविण्यासाठी मानसशास्त्रीय पद्धतीने या उपक्रमातून समुपदेशन केले जाणार आहे. सध्या दररोज ५०० कुटुंबांना मानसिक आधार देण्याचे काम सुरू आहे. मानसशास्त्रज्ञ डॉ. भारत देसाई, प्राचार्य डॉ. आर. के. आडसुळ, प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, डॉ. संज्योत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित मानसतज्ज्ञ ही सेवा देत आहेत.