शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

कोविड कुटुंबांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी प्रशासनाची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:25 IST

इस्लामपूर : कोरोनाच्या आपत्तीमुळे सुरू झालेला शारीरिक व्याधी कुटुंबातील, नात्यातील व्यक्तींचे आकस्मित मृत्यू, आर्थिक व्यावसायिक ताण यामुळे चिंता आणि ...

इस्लामपूर : कोरोनाच्या आपत्तीमुळे सुरू झालेला शारीरिक व्याधी कुटुंबातील, नात्यातील व्यक्तींचे आकस्मित मृत्यू, आर्थिक व्यावसायिक ताण यामुळे चिंता आणि नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी ‘चला मनोमित्र होऊ या’ हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती शुश्रुषा सल्ला व मार्गदर्शन केंद्राचे मानसतज्ज्ञ कालिदास पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, मनाला सावरण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा राज्यातील पहिलाच उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात कोल्हापूरच्या सायबरमधील समाजविज्ञान विभागातील ८५ विद्यार्थी व प्राध्यापक मनोमित्र म्हणून सहभाग घेत आहेत. राज्यातील १२० मानसतज्ज्ञांनी जिल्ह्यातील कोविड कुटुंबांच्या मानसिक स्वास्थ्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

ते म्हणाले, कोविडमुळे चिंता, काळजी आणि नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. नातेसंबंध बिघडले आहेत. आत्महत्येच्या विचारांना थोपविण्यासाठी मानसशास्त्रीय पद्धतीने या उपक्रमातून समुपदेशन केले जाणार आहे. सध्या दररोज ५०० कुटुंबांना मानसिक आधार देण्याचे काम सुरू आहे. मानसशास्त्रज्ञ डॉ. भारत देसाई, प्राचार्य डॉ. आर. के. आडसुळ, प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, डॉ. संज्योत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित मानसतज्ज्ञ ही सेवा देत आहेत.