शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दररोज एकाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: January 15, 2017 23:34 IST

प्रमाण चिंताजनक : वर्षभरात ८०३ अपघात, ४०३ जणांचा बळी; तीन वर्षात दीडशे घटना वाढल्या

सचिन लाड ल्ल सांगलीजिल्ह्यात दररोज एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०१६ मध्ये ८०३ अपघात झाले आहेत. यामध्ये ४०३ जणांचा मृत्यू झाला, तर ८४१ जखमी झाले आहेत. अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. गेल्या तीन वर्षांत अपघातांमध्ये बळी गेलेल्यांच्या संख्येत दीडशेने वाढ झाली आहे. आरटीओ व पोलिसांकडून अपघातांना आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याचेच चित्र आहे.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्यातील कणेगाव ते कासेगाव ही २८ किलोमीटरची हद्द येते. मिरज-पंढरपूर असे दोन राष्ट्रीय, तर सांगली ते तासगाव, मिरज-विजापूर, वसगडेमार्गे कऱ्हाड, सांगली ते पेठ, सांगली ते कोल्हापूर असे पाच राज्य महामार्ग आहेत. या प्रत्येक महामार्गावर नेहमी अपघात होतात. घरापासून हाकेच्या अंतरावर बाजारात खरेदीसाठी जातानाही आता वाहनांचा वापर होऊ लागला आहे. रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. वाहने वापरण्याकडे कल वाढला असला तरी, वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे वाहनचालकांचा फारसा कल दिसत नाही. जिल्ह्यात दरवर्षी सहाशेहून अधिक अपघात होत आहेत. यामध्ये तीनशे ते सव्वातीनशे लोकांचा बळी जात आहे. कासेगाव-कणेगाव, सांगली-इस्लामपूर, सांगली-तासगाव, विटा-पलूस-कऱ्हाड, अंकली-मिरज, मिरज- पंढरपूर या मार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. रस्ता खराब असल्याने अपघात होण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. पोलिसांची संख्या अपुरीजिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. ७०५ गावे आणि २८ लाख २0 हजार ५७५ इतकी लोकसंख्या आहे. आज प्रत्येक घरात दुचाकी आहे. वाहनांची संख्या वाढत असताना, रस्त्यांची लांबी-रुंदी मात्र अपवाद वगळता तेवढीच राहिली आहे. सांगली, मिरज, कुपवाड ही तीन प्रमुख शहरे वगळली, तर दहा तालुक्यांच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवताना या विभागाची कसरत सुरू असते. वाहनधारकांना स्वयंशिस्त असणे महत्त्वाचे असले तरी, ती लागत नसल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांची संख्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून वाढविण्याची गरजही आता निर्माण झाली आहे. अपघाताला मानवी चुकाच अधिक कारणीभूतगेल्या तीन वर्षांत साधारणपणे अडीचशे ते तीनशे लोकांचा अपघातात बळी गेल्याची सरासरी आकडेवारी आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक अपघात हे मानवी चुकांमुळे झालेले आहेत. पोलिस व आरटीओंनी कारवाईची मोहीम उघडली, अपघाताला आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या; पण तरीही २०१६ मध्ये तीन वर्षाच्या तुलनेत अपघातांची संख्या वाढल्याचेच आकडेवारीवरून दिसून येते. हे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करूनही, मानवी चुकांमुळे त्यात वाढच झाली आहे. पुढे धोका आहे... सावकाश...सांगली-कोल्हापूर, मिरज-पंढरपूर, सांगली-पुणे यासह पाचही महामार्गावर वेडीवाकडी वळणे आहेत. रस्त्याकडेला शाळा, महाविद्यालये आहेत. या सर्व ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘पुढे धोका आहे’, अशी माहिती दर्शविणारे फलक लावून ‘वाहने सावकाश चालवा’, असे फलक लावले आहेत. मात्र या फलकांकडे पाहण्यास कुणालाही वेळ नाही. प्रत्येकाला पुढे जाण्याची असणारी घाई मृत्यूच्या दाढेत नेत आहे. यातून जिल्ह्यात कुठे ना कुठे लहान-मोठे अपघात होतच आहेत. सांगली-माधवनगर रस्त्यावरील रेल्वे पुलावरही ओव्हरटेक न करण्याची स्पष्ट सूचना असतानाही, हा नियम सर्रास डावलला जातो. त्यामुळे या रस्त्यावरही गेल्या दोन वर्षात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.जिल्ह्यात अपघाताची एकूण ४0 ठिकाणेसांगली-इस्लामपूर रस्त्यावरील कारंदवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा, आटपाडी तालुक्यातील भिवघाट, सांगलीतील चिंतामणीनगर रेल्वे पूल, मिरज रस्ता सांगली-तासगाव रस्ता यासह ६४ अपघाताची ठिकाणे असल्याचे सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे.