शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

जिल्ह्यात दररोज एकाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: January 15, 2017 23:34 IST

प्रमाण चिंताजनक : वर्षभरात ८०३ अपघात, ४०३ जणांचा बळी; तीन वर्षात दीडशे घटना वाढल्या

सचिन लाड ल्ल सांगलीजिल्ह्यात दररोज एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०१६ मध्ये ८०३ अपघात झाले आहेत. यामध्ये ४०३ जणांचा मृत्यू झाला, तर ८४१ जखमी झाले आहेत. अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. गेल्या तीन वर्षांत अपघातांमध्ये बळी गेलेल्यांच्या संख्येत दीडशेने वाढ झाली आहे. आरटीओ व पोलिसांकडून अपघातांना आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याचेच चित्र आहे.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्यातील कणेगाव ते कासेगाव ही २८ किलोमीटरची हद्द येते. मिरज-पंढरपूर असे दोन राष्ट्रीय, तर सांगली ते तासगाव, मिरज-विजापूर, वसगडेमार्गे कऱ्हाड, सांगली ते पेठ, सांगली ते कोल्हापूर असे पाच राज्य महामार्ग आहेत. या प्रत्येक महामार्गावर नेहमी अपघात होतात. घरापासून हाकेच्या अंतरावर बाजारात खरेदीसाठी जातानाही आता वाहनांचा वापर होऊ लागला आहे. रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. वाहने वापरण्याकडे कल वाढला असला तरी, वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे वाहनचालकांचा फारसा कल दिसत नाही. जिल्ह्यात दरवर्षी सहाशेहून अधिक अपघात होत आहेत. यामध्ये तीनशे ते सव्वातीनशे लोकांचा बळी जात आहे. कासेगाव-कणेगाव, सांगली-इस्लामपूर, सांगली-तासगाव, विटा-पलूस-कऱ्हाड, अंकली-मिरज, मिरज- पंढरपूर या मार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. रस्ता खराब असल्याने अपघात होण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. पोलिसांची संख्या अपुरीजिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. ७०५ गावे आणि २८ लाख २0 हजार ५७५ इतकी लोकसंख्या आहे. आज प्रत्येक घरात दुचाकी आहे. वाहनांची संख्या वाढत असताना, रस्त्यांची लांबी-रुंदी मात्र अपवाद वगळता तेवढीच राहिली आहे. सांगली, मिरज, कुपवाड ही तीन प्रमुख शहरे वगळली, तर दहा तालुक्यांच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवताना या विभागाची कसरत सुरू असते. वाहनधारकांना स्वयंशिस्त असणे महत्त्वाचे असले तरी, ती लागत नसल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांची संख्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून वाढविण्याची गरजही आता निर्माण झाली आहे. अपघाताला मानवी चुकाच अधिक कारणीभूतगेल्या तीन वर्षांत साधारणपणे अडीचशे ते तीनशे लोकांचा अपघातात बळी गेल्याची सरासरी आकडेवारी आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक अपघात हे मानवी चुकांमुळे झालेले आहेत. पोलिस व आरटीओंनी कारवाईची मोहीम उघडली, अपघाताला आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या; पण तरीही २०१६ मध्ये तीन वर्षाच्या तुलनेत अपघातांची संख्या वाढल्याचेच आकडेवारीवरून दिसून येते. हे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करूनही, मानवी चुकांमुळे त्यात वाढच झाली आहे. पुढे धोका आहे... सावकाश...सांगली-कोल्हापूर, मिरज-पंढरपूर, सांगली-पुणे यासह पाचही महामार्गावर वेडीवाकडी वळणे आहेत. रस्त्याकडेला शाळा, महाविद्यालये आहेत. या सर्व ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘पुढे धोका आहे’, अशी माहिती दर्शविणारे फलक लावून ‘वाहने सावकाश चालवा’, असे फलक लावले आहेत. मात्र या फलकांकडे पाहण्यास कुणालाही वेळ नाही. प्रत्येकाला पुढे जाण्याची असणारी घाई मृत्यूच्या दाढेत नेत आहे. यातून जिल्ह्यात कुठे ना कुठे लहान-मोठे अपघात होतच आहेत. सांगली-माधवनगर रस्त्यावरील रेल्वे पुलावरही ओव्हरटेक न करण्याची स्पष्ट सूचना असतानाही, हा नियम सर्रास डावलला जातो. त्यामुळे या रस्त्यावरही गेल्या दोन वर्षात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.जिल्ह्यात अपघाताची एकूण ४0 ठिकाणेसांगली-इस्लामपूर रस्त्यावरील कारंदवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा, आटपाडी तालुक्यातील भिवघाट, सांगलीतील चिंतामणीनगर रेल्वे पूल, मिरज रस्ता सांगली-तासगाव रस्ता यासह ६४ अपघाताची ठिकाणे असल्याचे सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे.