शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

जिल्ह्यात दररोज एकाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: January 15, 2017 23:34 IST

प्रमाण चिंताजनक : वर्षभरात ८०३ अपघात, ४०३ जणांचा बळी; तीन वर्षात दीडशे घटना वाढल्या

सचिन लाड ल्ल सांगलीजिल्ह्यात दररोज एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०१६ मध्ये ८०३ अपघात झाले आहेत. यामध्ये ४०३ जणांचा मृत्यू झाला, तर ८४१ जखमी झाले आहेत. अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. गेल्या तीन वर्षांत अपघातांमध्ये बळी गेलेल्यांच्या संख्येत दीडशेने वाढ झाली आहे. आरटीओ व पोलिसांकडून अपघातांना आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याचेच चित्र आहे.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्यातील कणेगाव ते कासेगाव ही २८ किलोमीटरची हद्द येते. मिरज-पंढरपूर असे दोन राष्ट्रीय, तर सांगली ते तासगाव, मिरज-विजापूर, वसगडेमार्गे कऱ्हाड, सांगली ते पेठ, सांगली ते कोल्हापूर असे पाच राज्य महामार्ग आहेत. या प्रत्येक महामार्गावर नेहमी अपघात होतात. घरापासून हाकेच्या अंतरावर बाजारात खरेदीसाठी जातानाही आता वाहनांचा वापर होऊ लागला आहे. रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. वाहने वापरण्याकडे कल वाढला असला तरी, वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे वाहनचालकांचा फारसा कल दिसत नाही. जिल्ह्यात दरवर्षी सहाशेहून अधिक अपघात होत आहेत. यामध्ये तीनशे ते सव्वातीनशे लोकांचा बळी जात आहे. कासेगाव-कणेगाव, सांगली-इस्लामपूर, सांगली-तासगाव, विटा-पलूस-कऱ्हाड, अंकली-मिरज, मिरज- पंढरपूर या मार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. रस्ता खराब असल्याने अपघात होण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. पोलिसांची संख्या अपुरीजिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. ७०५ गावे आणि २८ लाख २0 हजार ५७५ इतकी लोकसंख्या आहे. आज प्रत्येक घरात दुचाकी आहे. वाहनांची संख्या वाढत असताना, रस्त्यांची लांबी-रुंदी मात्र अपवाद वगळता तेवढीच राहिली आहे. सांगली, मिरज, कुपवाड ही तीन प्रमुख शहरे वगळली, तर दहा तालुक्यांच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवताना या विभागाची कसरत सुरू असते. वाहनधारकांना स्वयंशिस्त असणे महत्त्वाचे असले तरी, ती लागत नसल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांची संख्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून वाढविण्याची गरजही आता निर्माण झाली आहे. अपघाताला मानवी चुकाच अधिक कारणीभूतगेल्या तीन वर्षांत साधारणपणे अडीचशे ते तीनशे लोकांचा अपघातात बळी गेल्याची सरासरी आकडेवारी आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक अपघात हे मानवी चुकांमुळे झालेले आहेत. पोलिस व आरटीओंनी कारवाईची मोहीम उघडली, अपघाताला आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या; पण तरीही २०१६ मध्ये तीन वर्षाच्या तुलनेत अपघातांची संख्या वाढल्याचेच आकडेवारीवरून दिसून येते. हे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करूनही, मानवी चुकांमुळे त्यात वाढच झाली आहे. पुढे धोका आहे... सावकाश...सांगली-कोल्हापूर, मिरज-पंढरपूर, सांगली-पुणे यासह पाचही महामार्गावर वेडीवाकडी वळणे आहेत. रस्त्याकडेला शाळा, महाविद्यालये आहेत. या सर्व ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘पुढे धोका आहे’, अशी माहिती दर्शविणारे फलक लावून ‘वाहने सावकाश चालवा’, असे फलक लावले आहेत. मात्र या फलकांकडे पाहण्यास कुणालाही वेळ नाही. प्रत्येकाला पुढे जाण्याची असणारी घाई मृत्यूच्या दाढेत नेत आहे. यातून जिल्ह्यात कुठे ना कुठे लहान-मोठे अपघात होतच आहेत. सांगली-माधवनगर रस्त्यावरील रेल्वे पुलावरही ओव्हरटेक न करण्याची स्पष्ट सूचना असतानाही, हा नियम सर्रास डावलला जातो. त्यामुळे या रस्त्यावरही गेल्या दोन वर्षात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.जिल्ह्यात अपघाताची एकूण ४0 ठिकाणेसांगली-इस्लामपूर रस्त्यावरील कारंदवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा, आटपाडी तालुक्यातील भिवघाट, सांगलीतील चिंतामणीनगर रेल्वे पूल, मिरज रस्ता सांगली-तासगाव रस्ता यासह ६४ अपघाताची ठिकाणे असल्याचे सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे.