शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

जिल्ह्यात दररोज एकाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: January 15, 2017 23:34 IST

प्रमाण चिंताजनक : वर्षभरात ८०३ अपघात, ४०३ जणांचा बळी; तीन वर्षात दीडशे घटना वाढल्या

सचिन लाड ल्ल सांगलीजिल्ह्यात दररोज एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून दिसून येते. २०१६ मध्ये ८०३ अपघात झाले आहेत. यामध्ये ४०३ जणांचा मृत्यू झाला, तर ८४१ जखमी झाले आहेत. अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. गेल्या तीन वर्षांत अपघातांमध्ये बळी गेलेल्यांच्या संख्येत दीडशेने वाढ झाली आहे. आरटीओ व पोलिसांकडून अपघातांना आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याचेच चित्र आहे.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्यातील कणेगाव ते कासेगाव ही २८ किलोमीटरची हद्द येते. मिरज-पंढरपूर असे दोन राष्ट्रीय, तर सांगली ते तासगाव, मिरज-विजापूर, वसगडेमार्गे कऱ्हाड, सांगली ते पेठ, सांगली ते कोल्हापूर असे पाच राज्य महामार्ग आहेत. या प्रत्येक महामार्गावर नेहमी अपघात होतात. घरापासून हाकेच्या अंतरावर बाजारात खरेदीसाठी जातानाही आता वाहनांचा वापर होऊ लागला आहे. रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. वाहने वापरण्याकडे कल वाढला असला तरी, वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे वाहनचालकांचा फारसा कल दिसत नाही. जिल्ह्यात दरवर्षी सहाशेहून अधिक अपघात होत आहेत. यामध्ये तीनशे ते सव्वातीनशे लोकांचा बळी जात आहे. कासेगाव-कणेगाव, सांगली-इस्लामपूर, सांगली-तासगाव, विटा-पलूस-कऱ्हाड, अंकली-मिरज, मिरज- पंढरपूर या मार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त आहे. रस्ता खराब असल्याने अपघात होण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. पोलिसांची संख्या अपुरीजिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. ७०५ गावे आणि २८ लाख २0 हजार ५७५ इतकी लोकसंख्या आहे. आज प्रत्येक घरात दुचाकी आहे. वाहनांची संख्या वाढत असताना, रस्त्यांची लांबी-रुंदी मात्र अपवाद वगळता तेवढीच राहिली आहे. सांगली, मिरज, कुपवाड ही तीन प्रमुख शहरे वगळली, तर दहा तालुक्यांच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवताना या विभागाची कसरत सुरू असते. वाहनधारकांना स्वयंशिस्त असणे महत्त्वाचे असले तरी, ती लागत नसल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांची संख्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून वाढविण्याची गरजही आता निर्माण झाली आहे. अपघाताला मानवी चुकाच अधिक कारणीभूतगेल्या तीन वर्षांत साधारणपणे अडीचशे ते तीनशे लोकांचा अपघातात बळी गेल्याची सरासरी आकडेवारी आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक अपघात हे मानवी चुकांमुळे झालेले आहेत. पोलिस व आरटीओंनी कारवाईची मोहीम उघडली, अपघाताला आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या; पण तरीही २०१६ मध्ये तीन वर्षाच्या तुलनेत अपघातांची संख्या वाढल्याचेच आकडेवारीवरून दिसून येते. हे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करूनही, मानवी चुकांमुळे त्यात वाढच झाली आहे. पुढे धोका आहे... सावकाश...सांगली-कोल्हापूर, मिरज-पंढरपूर, सांगली-पुणे यासह पाचही महामार्गावर वेडीवाकडी वळणे आहेत. रस्त्याकडेला शाळा, महाविद्यालये आहेत. या सर्व ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘पुढे धोका आहे’, अशी माहिती दर्शविणारे फलक लावून ‘वाहने सावकाश चालवा’, असे फलक लावले आहेत. मात्र या फलकांकडे पाहण्यास कुणालाही वेळ नाही. प्रत्येकाला पुढे जाण्याची असणारी घाई मृत्यूच्या दाढेत नेत आहे. यातून जिल्ह्यात कुठे ना कुठे लहान-मोठे अपघात होतच आहेत. सांगली-माधवनगर रस्त्यावरील रेल्वे पुलावरही ओव्हरटेक न करण्याची स्पष्ट सूचना असतानाही, हा नियम सर्रास डावलला जातो. त्यामुळे या रस्त्यावरही गेल्या दोन वर्षात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.जिल्ह्यात अपघाताची एकूण ४0 ठिकाणेसांगली-इस्लामपूर रस्त्यावरील कारंदवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा, आटपाडी तालुक्यातील भिवघाट, सांगलीतील चिंतामणीनगर रेल्वे पूल, मिरज रस्ता सांगली-तासगाव रस्ता यासह ६४ अपघाताची ठिकाणे असल्याचे सर्व्हेत नमूद करण्यात आले आहे.