शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

जिल्ह्याचा दहावीचा ९९.९४ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST

सांगली : जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.९४ टक्के लागला. कोल्हापूर विभागात सांगली अव्वल असून, जिल्ह्यातील ३९ हजार ६३१ विद्यार्थ्यांचे अंतर्गत ...

सांगली : जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.९४ टक्के लागला. कोल्हापूर विभागात सांगली अव्वल असून, जिल्ह्यातील ३९ हजार ६३१ विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन केले असून त्यापैकी ३९ हजार ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा मात्र मुलींपेक्षा मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे.

राज्यात कोरोनाची लाट असल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा घेता आली नाही. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला. बोर्डाच्या संकेतस्थळावर निकाल पहाता न आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. यंदा टक्केवारीत अडीच टक्क्यांनी वाढ झाली. कोल्हापूर विभागात सांगली जिल्ह्याचा सर्वाधिक ९९.९४ टक्के निकाल लागला.

जिल्ह्यातील ६४९ शाळांतील ३९ हजार ६३१ विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. त्यापैकी ३९ हजार ६३१ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन झाले. नववी आणि दहावीतील अभ्यासक्रमांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापनानुसार ३९ हजार ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील काही वर्षांपासून दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली आघाडीवर होत्या. मात्र, यंदा मुलांनी बाजी मारल्याचे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर झाले. जिल्ह्यातील २१ हजार ७०१ मुलांपैकी २१ हजार ६९३ उत्तीर्ण झाले. त्याचे प्रमाण ९९.९६ टक्के आहे. १७ हजार ९३० मुलींपैकी १७ हजार ९१८ उत्तीर्ण झाले. मुलींची पास होण्याचे टक्केवारी ९०.९३ टक्के आहे.

चौकट

पुनर्परीक्षार्थीचा निकाल ८४.९४ टक्के

जिल्ह्यातून २८६७ पुनर्परीक्षार्थीची नोंदणी झाली होती. त्यापैकी १४४१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १४४१ विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले असून १२२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८४.९४ आहे.

चौकट

असे केले मूल्यमापन

दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुण दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर ५० टक्के गुण नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन अंतर्गत मूल्यमापन केले आहे. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे शंभर गुणांचे मूल्यमापन केले. अंतर्गत मूल्यमापनासाठी ३० टक्के गुण, प्रात्यक्षिकांसाठी २० गुण आणि नववीत मिळालेल्या गुणांसाठी ५० टक्क्यांनुसार मूल्यमापन करून दहावीवा निकाल जाहीर केला आहे.