शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

सामाजिक न्याय विभागामार्फत ९९ टक्के निधी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST

सांगली : सामाजिक न्याय विभागाने कोरोनाकाळासह मागील पाच वर्षांत उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरिता २०२०-२१ ...

सांगली : सामाजिक न्याय विभागाने कोरोनाकाळासह मागील पाच वर्षांत उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरिता २०२०-२१ या आर्थिक वर्षात ९९.१५ टक्के निधी खर्च केला आहे. त्यामुळे या विभागाचा निधी खर्च न झाल्याबद्दल होत असलेली तक्रार अयोग्य आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

सांगलीतील रिपब्लिकन स्टुडंट युनियनने सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा ३० जिल्ह्यांतील १०५ कोटींचा निधी अखर्चित राहिल्याने परत गेल्याची टीका केली होती. याबाबत त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. याबाबत मुंडे यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, समाज कल्याण आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय योजनांसाठीदेखील मागील पाच वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक निधी विनियोग करत प्राप्त निधीतील ९०.५६ टक्के निधी खर्च केला आहे.

जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत २०१६-१७ मध्ये ८५.४३ टक्के, २०१७-१८ मध्ये ९८.२२ टक्के, २०१८-१९ मध्ये ९२.८० टक्के, २०१९-२० मध्ये ९२.२६ टक्के निधी खर्च केला आहे, तर २०२१ मध्ये मागील तरतुदीच्या तुलनेत अधिक असलेल्या २ हजार ७२८ कोटी ६४ लाख इतक्या प्राप्त निधीपैकी २ हजार ७१५ कोटी म्हणजेच ९९.५३ निधी खर्च केला आहे.

समाज कल्याण आयुक्तालय स्तरावरील योजनांमध्ये २०१६-१७ मध्ये ८०.९३ टक्के, २०१७-१८ मध्ये ८५.४९ टक्के, २०१८-१९ मध्ये ८७.२० टक्के, २०१९-२० मध्ये ८६.३१ टक्के निधी खर्च केला होता. २०२०-२१ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या निधीपैकी ९०.५६ टक्के निधी खर्च केला असून, मागील पाच वर्षांच्या तुलनेत ही टक्केवारी सर्वाधिक आहे.

या निधीचा तळागाळातील घटकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा तसेच कोरोनाकाळात दिलासा मिळावा यासाठी उपयोग केला आहे. त्यामुळे निधी विनियोगाबद्दल होत असलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत, असे मुंडे यांनी म्हटले आहे.