शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ८५० कोटींची एफआरपी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:27 IST

जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी हंगामास सुरुवात केली होती. ऊसक्षेत्र जास्त असले तरी कर्नाटक सीमाभागासह कोल्हापूर जिल्ह्यात कारखान्यांची संख्या वाढल्यामुळे ...

जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी हंगामास सुरुवात केली होती. ऊसक्षेत्र जास्त असले तरी कर्नाटक सीमाभागासह कोल्हापूर जिल्ह्यात कारखान्यांची संख्या वाढल्यामुळे बहुतांशी ऊसगाळप झाले आहे. किरकोळ ऊस शिल्लक असल्यामुळे राजारामबापू कारखान्याचे साखराळे व वाटेगाव हे दोन युनिट चालू आहेत. येत्या आठवडाभरात तेही बंद होणार आहेत. राजारामबापू कारखान्याचे कारंदवाडी आणि तिप्पेहळ्ळी युनिट बंद झाले आहे. त्यांच्या चार युनिटने २० लाख १९ हजार ५७२ टन ऊस गाळप करून २३ लाख ५० हजार ९५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या कारखान्यानेही एकरकमी एफआरपी दिली नाही.

वसंतदादा कारखाना चालवत असलेल्या दत्त इंडिया कारखान्यानेही एकरकमी एफआरपीची घोषणा केली. पण, प्रत्यक्षात दिलीच नाही. त्यांनी आठ लाख ७७ हजार ४७० टन ऊस गाळप करून दहा लाख ३२ हजार ६८० क्विंटल साखरेचे उत्पादन घेऊन हंगाम बंद केला आहे. हुतात्मा, क्रांती, विश्वास, यशवंत शुगर, तासगाव या कारखान्यांचे गळीत हंगाम येत्या आठ दिवसांत बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या कारखान्यांनीही शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीपासून दूरच ठेवले आहे.

जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांकडे फेब्रुवारीपर्यंतचे ८५० कोटी रुपये थकीत आहेत. यामध्ये मार्च महिन्यातील दीडशे कोटींच्या थकबाकीची भर पडणार आहे. थकीत एफआरपी सर्वच कारखाने दोन टप्प्यांमध्ये देण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

साेनहिरा, उदगिरी शुगर, मोहनराव शिंदे, दालमिया या चार कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.