शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
3
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
4
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
5
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
6
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
7
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
8
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
9
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
10
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
11
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
12
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
13
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
14
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
15
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
16
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
17
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
18
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
19
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
20
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो

जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ८५० कोटींची एफआरपी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:27 IST

जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी हंगामास सुरुवात केली होती. ऊसक्षेत्र जास्त असले तरी कर्नाटक सीमाभागासह कोल्हापूर जिल्ह्यात कारखान्यांची संख्या वाढल्यामुळे ...

जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी हंगामास सुरुवात केली होती. ऊसक्षेत्र जास्त असले तरी कर्नाटक सीमाभागासह कोल्हापूर जिल्ह्यात कारखान्यांची संख्या वाढल्यामुळे बहुतांशी ऊसगाळप झाले आहे. किरकोळ ऊस शिल्लक असल्यामुळे राजारामबापू कारखान्याचे साखराळे व वाटेगाव हे दोन युनिट चालू आहेत. येत्या आठवडाभरात तेही बंद होणार आहेत. राजारामबापू कारखान्याचे कारंदवाडी आणि तिप्पेहळ्ळी युनिट बंद झाले आहे. त्यांच्या चार युनिटने २० लाख १९ हजार ५७२ टन ऊस गाळप करून २३ लाख ५० हजार ९५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या कारखान्यानेही एकरकमी एफआरपी दिली नाही.

वसंतदादा कारखाना चालवत असलेल्या दत्त इंडिया कारखान्यानेही एकरकमी एफआरपीची घोषणा केली. पण, प्रत्यक्षात दिलीच नाही. त्यांनी आठ लाख ७७ हजार ४७० टन ऊस गाळप करून दहा लाख ३२ हजार ६८० क्विंटल साखरेचे उत्पादन घेऊन हंगाम बंद केला आहे. हुतात्मा, क्रांती, विश्वास, यशवंत शुगर, तासगाव या कारखान्यांचे गळीत हंगाम येत्या आठ दिवसांत बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या कारखान्यांनीही शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपीपासून दूरच ठेवले आहे.

जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांकडे फेब्रुवारीपर्यंतचे ८५० कोटी रुपये थकीत आहेत. यामध्ये मार्च महिन्यातील दीडशे कोटींच्या थकबाकीची भर पडणार आहे. थकीत एफआरपी सर्वच कारखाने दोन टप्प्यांमध्ये देण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र एकरकमी एफआरपीसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

साेनहिरा, उदगिरी शुगर, मोहनराव शिंदे, दालमिया या चार कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.