शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

‘सिव्हिल’च्या दुरुस्तीसाठी आठ कोटींचा प्रस्ताव सादर

By admin | Updated: January 18, 2016 23:30 IST

इमारतीची रंगरंगोटी : दरवाजे, खिडक्या बदलणार

सचिन लाड --सांगली ,येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हिल) इमारत दुरुस्तीसाठी सुमारे आठ कोटी रुपयांची गरज आहे. तसा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य शासनाला सादर केला आहे. पण त्याला अजूनही मंजुरी मिळालेली नाही. रुग्णालयाच्या इमारतीची रंगरंगोटी, दरवाजे व खिडक्या बदलल्या जाणार आहेत. जलवाहिनी खराब झाल्याने तीही बदलण्याची गरज असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. शासकीय रुग्णालयाच्या इमारतीस पन्नास वर्षे होऊन गेली आहेत. जुनी इमारत सुस्थितीत आहे. पण त्याच्याभोवती भाजलेल्या रुग्णांचा कक्ष, रक्तपेढी, शवविच्छेदन विभाग, क्षयरोग, संसर्गजन्य विभाग, रुग्णांचे स्वतंत्र वॉर्ड, धोबीघाट या विभागांच्या इमारती आहेत, त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. शवविच्छेदन विभाग रुग्णालयाच्या मागे आहे. हा विभाग आतून स्वच्छ आहे. दुर्गंधीही येत नाही. पण त्याच्या खिडक्या, दरवाजे गंजले आहेत. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे आत काय सुरू आहे, हे सहजपणे दिसून येते. दररोज दोन- तीन मृतदेहांची विच्छेदन तपासणी केली जाते. मृतदेहांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या विभागाची दुरुस्ती महत्त्वाची आहे. रुग्णांच्या वॉर्ड विभागाचीही अशीच अवस्था आहे. पाठीमागील बाजूच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. भिंतींना तडे गेले आहेत. पाणीपुरवठ्याची वाहिनी फुटल्याने पाणी मुरून भिंती शेवाळल्या आहेत.संसर्गजन्य विभाग व रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय असलेल्या धर्मशाळेची इमारतही जुनी दिसू लागली आहे. इमारतीचा रंग उडाला आहे. फरशा फुटलेल्या आहेत. छताला गळती लागल्याने पावसाळ्यात पाणी आत पडते. परिसरात झाडेझुडपे वाढली आहेत. भाजलेल्या रुग्ण कक्षाच्या खिडक्या फुटल्या आहेत. भिंतीत केवळ खिडकीचा आकार उरला आहे. नातेवाईक या खिडकीतूनच रुग्णांची भेट घेतात. रुग्णालयाकडे स्वतंत्र पाण्याची सोय आहे. यासाठी मोठी टाकीही बांधलेली आहे. पण ही टाकी व जलवाहिनी जुनी झाली आहे. सातत्याने गळती होत असल्याने पाणी पसरून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रुग्णांच्या सुरक्षेचाही प्रश्न...रुग्णांच्या वॉर्डात शौचालयाचे दरवाजे मोडले आहेत. खिडक्यांचा सांगाडाच शिल्लक आहे. पावसाळ्यात या खिडक्यांतूनही पाणी आत येते. इचलकरंजीतील एका रुग्णाने शौचालयाच्या खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केली होती. तत्पूर्वी एका रुग्णाच्या आत्महत्येचा प्रयत्न फसला होता. आणखी एकाने शौचालयाच्या खिडकीच्या गजाला टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रुग्णांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ही इमारत धोक्याची ठरू लागली आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.