शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ७१ कोटी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST

जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू झाले आहेत. गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले, तरीही ...

जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू झाले आहेत. गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले, तरीही कारखानदारांनी एकरकमी एफआरपी दिलीच नाही. शुगरकेन कंट्रोल कायदा १९६६ नुसार शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे, अन्यथा कारखाना व्यवस्थापनाने संबंधित शेतकऱ्यास व्याजासह रक्कम देण्याचे बंधनकारक आहे. एकरकमी एफआरपी देण्याची कायदेशीर तरतूद असतानाही बड्या राज्यकर्त्यांच्या ११ कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दोन महिन्यांत दिली नाही. सोनहिरा, उदगिरी शुगर, दालमिया आणि निनाईदेवी-दालमिया या कारखान्यांनीच गाळपास गेलेल्या ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी दिली आहे. उर्वरित राजारामबापू साखराळे, वाटेगाव, सर्वोदय आणि डफळे या चारही युनिटकडून एकरकमी एफआरपी दिली नाही. वसंतदादा-दत्त इंडिया, क्रांती, हुतात्मा, विश्वास, तासगाव, यशवंत या कारखाना व्यवस्थापनानेही शेतकऱ्यांना पहिला हप्ताच दिला आहे. उर्वरित दुसरा हप्ता देण्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. या अकरा कारखान्यांकडे शिल्लक एफआरपीचे ७१ कोटी १५ लाख ७७ हजार २५० रुपये थकीत आहेत. या शेतकऱ्यांनी एकरकमीची एफआरपी मागणी केली असून, स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यासाठी आक्रमक झाली आहे.

चौकट

जिल्ह्यातील कारखान्यांनी गाळप केलेला ऊस

कारखाने गाळप साखर पोती उतारा

वसंतदादा-दत्त इंडिया ४१७५३० ४७५४७० ११.३९

राजारामबापू साखराळे ४३५४७० ५११८०० ११.७५

विश्वास-चिखली ३१६८२० ३३००२० १०.४२

हुतात्मा-वाळवा २६२०३० २८८०२५ १०.९९

राजारामबापू-वाटेगाव २६११४० ३०८३०० ११.८१

तासगाव-तूरची ३६२७१ ३४२०० ९.४३

राजारामबापू-डफळे ९४०७० ८७७७० ९.३३

सोनहिरा-वांगी ४४१८४५ ४९४२२० ११.१९

क्रांती-कुंडल ४३८२४० ४८७५९० ११.१३

सर्वोदय-राजारामबापू १९७६७० २२७७१० ११.५२

मोहनराव शिंदे-आरग १५६५९० १७११५० १०.९३

निनाईदेवी-दालमिया १८१९४५ २१२९५० ११.७१

यशवंत-खानापूर ६१३८२ ६४३५० १०.४८

उदगिरी शुगर २८३९१० ३१०००० १०.९२

सद्गुरू श्री श्री राजेवाडी ३२५६९५ ३५००३९ १०.७५

एकूण ३९१०६०८ ४३५३५९४ ११.१३