शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

महापालिकेत सात कोटीच्या निधीचा खेळखंडोबा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:28 IST

सांगली : जिल्हा नियोजन समितीतून महापालिकेला मंजूर सात कोटी निधीच्या वाटपाचे कवित्व अजून संपलेले नाही. आता जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या ...

सांगली : जिल्हा नियोजन समितीतून महापालिकेला मंजूर सात कोटी निधीच्या वाटपाचे कवित्व अजून संपलेले नाही. आता जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या एका पत्राच्याआधारे पूर्वीचा ठराव रद्द करून नव्याने ठराव करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तत्कालीन सत्ताधारी भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादीने फेरठरावाचा घाट घातल्याने महापालिकेत पुन्हा संघर्ष पेटणार आहे. हा नवा ठराव कायद्याच्या कचाट्यात अडकला, तर सात कोटीची विकासकामे रखडण्याची चिन्हे आहेत.

भाजपच्या सत्ताकाळात जिल्हा नियोजन समितीतून सात कोटीचा निधी मंजूर झाला. तत्कालीन महापौर गीता सुतार यांनी या निधीतून ६७ कामे मंजूर केली. तसा ठराव जानेवारीच्या महासभेत करण्यात आला. काही नगरसेवकांची कामे वगळल्याने वाद चिघळला. स्थायी सभापती पांडुरंग कोरे यांनी मध्यस्थी करीत कामे वगळलेल्या नगरसेवकांना बजेटमधून निधी देत वादावर पडदा टाकला. आता जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या एका पत्राच्याआधारे फेरनिधी वाटपाचा घाट घातला आहे. तशा हालचाली महापालिकेत सुरू आहेत. महासभेकडे लवकरच निधी वाटपाबाबतचे विषयपत्र पाठविले जाणार आहे. त्यातून सत्ताधाऱ्यांनी निधी वाटपाचा नवा ठराव केला तर भविष्यात न्यायप्रवीष्ट बाब होऊन विकासकामे रखडण्याची शक्यता आहे.

चौकट

काय आहे ते पत्र...

जिल्हा प्रशासन अधिकारी अतुल पाटील यांनी २५ मार्च रोजी महापालिकेला पाठविलेल्या पत्रात महासभा ठरावाने ७ कोटी ४६ हजाराची ६७ कामे व वाढीव निधीसाठी प्रस्ताव दिला आहे. मंजूर निधीतून शिल्लक राहणाऱ्या रकमेतून कोणत्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करायची आहे, त्या कामांची प्राधान्यक्रम यादी, अंदाजपत्रके सादर करावीत, असे म्हटले आहे.

चौकट

भाजपला शह की राष्ट्रवादीचे नुकसान

जिल्हा प्रशासनाने कामांची प्राधान्यक्रम यादी मागविली असताना महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीकडून संपूर्ण ठरावच बदलून नवीन कामे समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे पूर्वीच्या ठरावात ज्या नगरसेवकांना जादा निधी मिळाला, ते नव्या ठरावाचे समर्थन करणार का? हा खरा प्रश्न आहे. राष्ट्रवादीने भाजपचा काटा काढण्याचा डाव आखण्यात आला असला तरी, यात त्यांच्याच नगरसेवकांचेच जादा नुकसान होणार आहे.

चौकट

निधी गतवर्षीचा, ठराव चालू वर्षाचा

जिल्हा नियोजनमधून २०२०-२१ साठी सात कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्याचा ठराव करून तो ३१ मार्चपूर्वी जिल्हा प्रशासनाकडेही पाठविला आहे. आता नवीन ठराव केल्यास तो २०२१-२२ चा असेल. गतवर्षीच्या निधीसाठी चालू वर्षातील ठराव प्रशासनाला मान्य होईल का, हाही प्रश्न अनुत्तरीतच आहे.