शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

जिल्ह्यात महापुरामुळे ६०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक नुकसान शेतीचे झाले असून, त्यानंतर इमारती, महावितरण, रस्ते, पाणीपुरवठा योजनांना हानी पोहोचली आहे. प्रशासनाने तयार केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, सुमारे ६०० कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज असून, पुराचे पाणी ओसरल्यानंतर पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा आकडा वाढण्याचीच शक्यता आहे.

महापुराची कोणतीही शक्यता नसताना, गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली; शिवाय पाणलोट क्षेत्रातील विक्रमी पावसामुळे महापूरही आला. सध्या पाणी नदीपात्रात जात असून, हळूहळू परिस्थिती सुरळीत होत असली तरी, २०१९ पाठाेपाठ यावर्षीही पुन्हा एकदा महापुराचा फटका सहन करावा लागला आहे. यंदा १०३ गावांतील ४१ हजार ८४ कुटुंबांना महापुराचा फटका सहन करावा लागला. यात सर्वाधिक नुकसान शेतीचे झाले असून, त्यात ४२ हजार हेक्टरवरील क्षेत्राला नुकसान पोेहोचले आहे.

जिल्ह्यातील अनेक गावे व शहरांच्या पाणी योजना नदीवर अवलंबून आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १३२ पाणी योजनांना याचा फटका बसला. या योजनांच्या दुरुस्तीसाठी आता २ कोटी ७ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. महापालिका क्षेत्रातील इमारतींची पडझड, पाणीपुरवठा यंत्रणांच्या दुरुस्तीसाठी १५० कोटींची आवश्यकता आहे.

शेतीपाठोपाठ सर्वाधिक नुकसान रस्ते, पूल व महावितरणचे झाले आहे. त्यात रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसाठी ४६६ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी लागणार असून, महावितरणचे ३४ कोटी ४९ लाखांचे नुकसान झाले आहे. शिवाय महापूर कालावधीत यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी २८ कोटी ७० लाखांच्या निधीची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

महापुराचे पाणी ओसरू लागले असले तरी, अद्यापही स्वच्छतेची कामे सुरूच आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांना वेळ लागणार आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार सध्या ६०० कोटींच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी, अंतिम पंचनाम्यानंतर नुकसानीचा आकडा वाढून एक हजार कोटींवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चौकट

दोन दिवसातील महापुरात पशुधनाचेही मोठे नुकसान झाले असून, त्यात १८ पशुपालकांची १६ जनावरे, तर १९ हजार ३६० कोंबड्या मृत झाल्या आहेत. पशुधनासह जनावरांच्या गोठ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतीसह जनावरे, गोठा नुकसानीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

कोट

जिल्ह्यात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक अहवालानुसार झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी मागणी केली आहे.

- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी