शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात महापुरामुळे ६०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक नुकसान शेतीचे झाले असून, त्यानंतर इमारती, महावितरण, रस्ते, पाणीपुरवठा योजनांना हानी पोहोचली आहे. प्रशासनाने तयार केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, सुमारे ६०० कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज असून, पुराचे पाणी ओसरल्यानंतर पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा आकडा वाढण्याचीच शक्यता आहे.

महापुराची कोणतीही शक्यता नसताना, गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली; शिवाय पाणलोट क्षेत्रातील विक्रमी पावसामुळे महापूरही आला. सध्या पाणी नदीपात्रात जात असून, हळूहळू परिस्थिती सुरळीत होत असली तरी, २०१९ पाठाेपाठ यावर्षीही पुन्हा एकदा महापुराचा फटका सहन करावा लागला आहे. यंदा १०३ गावांतील ४१ हजार ८४ कुटुंबांना महापुराचा फटका सहन करावा लागला. यात सर्वाधिक नुकसान शेतीचे झाले असून, त्यात ४२ हजार हेक्टरवरील क्षेत्राला नुकसान पोेहोचले आहे.

जिल्ह्यातील अनेक गावे व शहरांच्या पाणी योजना नदीवर अवलंबून आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील १३२ पाणी योजनांना याचा फटका बसला. या योजनांच्या दुरुस्तीसाठी आता २ कोटी ७ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. महापालिका क्षेत्रातील इमारतींची पडझड, पाणीपुरवठा यंत्रणांच्या दुरुस्तीसाठी १५० कोटींची आवश्यकता आहे.

शेतीपाठोपाठ सर्वाधिक नुकसान रस्ते, पूल व महावितरणचे झाले आहे. त्यात रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसाठी ४६६ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी लागणार असून, महावितरणचे ३४ कोटी ४९ लाखांचे नुकसान झाले आहे. शिवाय महापूर कालावधीत यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी २८ कोटी ७० लाखांच्या निधीची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

महापुराचे पाणी ओसरू लागले असले तरी, अद्यापही स्वच्छतेची कामे सुरूच आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांना वेळ लागणार आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार सध्या ६०० कोटींच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी, अंतिम पंचनाम्यानंतर नुकसानीचा आकडा वाढून एक हजार कोटींवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चौकट

दोन दिवसातील महापुरात पशुधनाचेही मोठे नुकसान झाले असून, त्यात १८ पशुपालकांची १६ जनावरे, तर १९ हजार ३६० कोंबड्या मृत झाल्या आहेत. पशुधनासह जनावरांच्या गोठ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतीसह जनावरे, गोठा नुकसानीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

कोट

जिल्ह्यात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक अहवालानुसार झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी मागणी केली आहे.

- डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी