शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

५२८ ग्रामपंचायतीत नियमबाह्य भरती

By admin | Updated: August 23, 2014 00:05 IST

नियमही डावलला : २४०० कामगार अतिरिक्त

अशोक डोंबाळे - सांगली -शासकीय आकृतीबंधाचा आदेश धाब्यावर बसवून जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींपैकी ५२८ ग्रामपंचायतींमध्ये नियमबाह्य नोकरभरती करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींकडील २४०० कामगारांना किमान वेतन मिळत नसून ते अडीच ते तीन हजारांच्या तुटपुंज्या वेतनावर राबत आहेत. किमान वेतनासह अनेक मागण्यांसाठी वारंवार शासनाशी लढा देऊनही या कामगारांना हक्काचे वेतन मिळत नसल्यामुळे ते आक्रमक झाले आहेत.कामगार न्यायालयाने सर्वच कामगारांना किमान वेतन ५१०० ते ७१०० अधिक राहणीमान भत्ता १४७५ रुपये द्यावा, असा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने ७ आॅगस्ट २०१३ रोजी शासकीय कार्यालये, सहकारी संस्था, खासगी कारखान्यांना, सर्व कामगारांना किमान वेतन देण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार खासगी आणि सहकारी संस्थांनी कामगारांना किमान वेतन देण्यास सुरुवात केली आहे. परंतु, राज्य शासनाच्या ताब्यातील ग्रामपंचायतींमधील कामगारांना मात्र आजही किमान वेतन मिळत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यात ७०४ ग्रामपंचायती असून तब्बल ५२८ ग्रामपंचायतींमधील कामगारांना किमान वेतन मिळत नाही. येथील कामगार सध्या अडीच ते तीन हजार रुपयांवर राबत आहेत. येथील कामगारांनी किमान वेतन मिळत नसल्याबद्दल जिल्हा परिषद आणि राज्य शासनाकडे तक्रार केली आहे. यावेळी या कामगारांना ‘भीक नको, पण कुत्रे आवर’ म्हणण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायतींनी किती कामगार नियुक्त करावेत, हे ठरविणारा आकृतीबंध शासनाने निश्चित केला आहे. त्यानुसार एक हजार लोकसंख्येला एक कामगार याप्रमाणे ग्रामपंचायतींनी कामगार नियुक्त करावा. शासनाच्या या आदेशानुसार जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींमध्ये १८०० कामगार नियुक्त असले पाहिजेत. परंतु, प्रत्यक्षात सध्या ७०४ ग्रामपंचायतींमध्ये ४२०० कामगार कार्यरत आहेत. ५२८ ग्रामपंचायतींमध्ये २४०० कामगार अतिरिक्त आहेत.