शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जिल्ह्यात ५२ टक्के जलसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:26 IST

सांगली : थंडीची हुडहुडी कमी होत आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अजून झळांची तीव्रता वाढली नसली तरी टंचाईची चाहूल ...

सांगली : थंडीची हुडहुडी कमी होत आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अजून झळांची तीव्रता वाढली नसली तरी टंचाईची चाहूल मात्र, जिल्ह्यात दिसून येत आहे. यंदा चांगले पाऊसमान झाल्याने जिल्ह्यातील सर्व जलसाठे समाधानकारक भरले होते. मात्र, त्यानंतर आता मात्र, ५२ टक्क्यांहून अधिक साठे हे मृतसंचयाखाली गेल्याने पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्याच्या पूर्व भागात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होते. गेल्या काही वर्षांपासून या भागातही पाणी योजनांची आवर्तने होत असल्याने या भागातही जलसाठे भरलेले असतात. यंदा परतीच्या मान्सूनने चांगली हजेरी लावल्याने तलाव अद्याप तरी भरलेले आहेत. सध्या जिल्ह्यातील ४ तलावांतील पाणीसाठा मृतसंचयाखाली गेला आहे, तर ३२ तलावांमध्ये २५ ते ५० टक्के साठा उपलब्ध आहे. जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील तलावांत अद्यापही २५ टक्के जलसाठा आहे.

दोन दिवसांपूर्वी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाले आहे. त्यामुळे मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, तासगाव, जत तालुक्याला त्याचा लाभ मिळणार आहे. यासह टेंभूच्या पाण्याची प्रतीक्षा असणार आहे.

यावर्षी विशेष म्हणजे दरवर्षी सर्वाधिक टंचाई भासणाऱ्या आटपाडी, कवठेमहांकाळ, जत तालुक्यात समाधानकारक जलसाठे उपलब्ध आहेत. आटपाडी तालुक्यात अद्यापही ६८ टक्के साठा उपलब्ध आहे, तर कवठेमहांकाळ तालुक्यातही ६४ टक्के साठा आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

चौकट

...तर विहिरींचे अधिग्रहण होणार

जिल्हा प्रशासनाने मात्र, टंचाई आराखडा तयार केला असून, ज्या भागात पाण्याची टंचाई जाणवणार आहे, त्या भागातील ग्रामस्थांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी तहसील पातळीवर नियोजन करण्यात येत आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन, विहिरी व कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात येत आहे. यंदा उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यास अधिग्रहण लवकर केले जाणार आहे.

चौकट

तालुका प्रकल्प संख्या उपयुक्त साठा टक्केवारी

तासगाव ७ ६०

खानापूर ८ ५४

कडेगाव ७ ५२

शिराळा ५ ४४

आटपाडी १३ ६८

जत २८ ४५

कवठेमहांकाळ ११ ६४

मिरज ३ ४६

वाळवा २ ३६

पलूस ० ०

एकूण ८४ ५२ टक्के