शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

जिल्ह्यात ५२ टक्के जलसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:26 IST

सांगली : थंडीची हुडहुडी कमी होत आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अजून झळांची तीव्रता वाढली नसली तरी टंचाईची चाहूल ...

सांगली : थंडीची हुडहुडी कमी होत आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अजून झळांची तीव्रता वाढली नसली तरी टंचाईची चाहूल मात्र, जिल्ह्यात दिसून येत आहे. यंदा चांगले पाऊसमान झाल्याने जिल्ह्यातील सर्व जलसाठे समाधानकारक भरले होते. मात्र, त्यानंतर आता मात्र, ५२ टक्क्यांहून अधिक साठे हे मृतसंचयाखाली गेल्याने पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्याच्या पूर्व भागात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होते. गेल्या काही वर्षांपासून या भागातही पाणी योजनांची आवर्तने होत असल्याने या भागातही जलसाठे भरलेले असतात. यंदा परतीच्या मान्सूनने चांगली हजेरी लावल्याने तलाव अद्याप तरी भरलेले आहेत. सध्या जिल्ह्यातील ४ तलावांतील पाणीसाठा मृतसंचयाखाली गेला आहे, तर ३२ तलावांमध्ये २५ ते ५० टक्के साठा उपलब्ध आहे. जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यातील तलावांत अद्यापही २५ टक्के जलसाठा आहे.

दोन दिवसांपूर्वी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाले आहे. त्यामुळे मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, तासगाव, जत तालुक्याला त्याचा लाभ मिळणार आहे. यासह टेंभूच्या पाण्याची प्रतीक्षा असणार आहे.

यावर्षी विशेष म्हणजे दरवर्षी सर्वाधिक टंचाई भासणाऱ्या आटपाडी, कवठेमहांकाळ, जत तालुक्यात समाधानकारक जलसाठे उपलब्ध आहेत. आटपाडी तालुक्यात अद्यापही ६८ टक्के साठा उपलब्ध आहे, तर कवठेमहांकाळ तालुक्यातही ६४ टक्के साठा आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

चौकट

...तर विहिरींचे अधिग्रहण होणार

जिल्हा प्रशासनाने मात्र, टंचाई आराखडा तयार केला असून, ज्या भागात पाण्याची टंचाई जाणवणार आहे, त्या भागातील ग्रामस्थांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी तहसील पातळीवर नियोजन करण्यात येत आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन, विहिरी व कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात येत आहे. यंदा उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यास अधिग्रहण लवकर केले जाणार आहे.

चौकट

तालुका प्रकल्प संख्या उपयुक्त साठा टक्केवारी

तासगाव ७ ६०

खानापूर ८ ५४

कडेगाव ७ ५२

शिराळा ५ ४४

आटपाडी १३ ६८

जत २८ ४५

कवठेमहांकाळ ११ ६४

मिरज ३ ४६

वाळवा २ ३६

पलूस ० ०

एकूण ८४ ५२ टक्के