शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

जिल्ह्यात ३ वर्षांत ४४ मुलांचे अपहरण

By admin | Updated: January 26, 2015 00:37 IST

गतीने तपास : स्वतंत्र पोलीस पथकाची नियुक्ती; बेपत्तावरून गुन्हे दाखल

सचिन लाड / सांगलीजिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलांच्या प्रकरणात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. जिल्ह्यातील २४ पोलीस ठाण्यात आतापर्यंत ४४ मुलांचे अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अपहरण प्रकरणाचा तपास तातडीने होण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. गेल्या काही वर्षांत अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलांपेक्षा मुली बेपत्ता होण्याची संख्या मोठी आहे. काही मुले अभ्यास न केल्याने, आई, वडील रागावल्यामुळे बेपत्ता होतात. मुलींना लग्नाच्या आमिषाने पळविले जाते. मात्र सुरुवातीला ही मुले बेपत्ता असल्याची नोंद केली जाते. पोलिसांकडून या मुलांचे छायाचित्र व माहिती राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कळविली जाते. चार-आठ दिवस गतीने तपास केला जातो. परंतु कुठेच सुगावा लागत नसल्याचे लक्षात येताच पोलीस तपास थांबतो. त्यानंतर पालक स्वत: मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे हे प्रयत्न अपुरे पडतात. मुले बेपत्ता होणे आणि ती न सापडणे, हा विषय पालकांच्यादृष्टीने चिंतेचा बनला आहे. पालक चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तपास अधिकारी फारशी दखल घेत नाहीत. काय कुठं सुगावा लागला का? असा पालकांनाच प्रश्न विचारतात.सहा महिन्यांतून एकदा पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून या मुलांचे काय झाले? ती सापडली का? याची पोलिसांकडून चौकशी केली जाते. यासंदर्भात जबाबही नोंदवून घेतला जातो. मुलांपेक्षा मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. तीन-तीन वर्षे होऊन गेली तरी, मुली सापडत नसल्याने पालकांना चिंता लागून राहिली आहे. त्यांचा पोलीस तपासावरील विश्वास उडून गेला आहे. पोलीस मात्र लग्नाच्या आमिषाने पळून गेली आहे, म्हणजे तिचं त्या मुलाबरोबर प्रेमप्रकरण होतं, आज ना उद्या ती येईल, असे सांगून पालकांना पिटाळून लावतात. यामुळे वर्षानुवर्षे या मुलींचा तपास लागत नाही. या मुली जिवंत आहे का नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पळवून नेणारे ‘आॅनरेकॉर्ड’लग्नाच्या आमिषाने मुलींना पळवून नेले जाते. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होते; मात्र मुलींना पळवून नेणारे तरुण बेपत्ता आहेत, म्हणून त्यांची तक्रार दाखल होताना दिसत नाही. तरुणांचे नातेवाईक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. यावरून त्यांना हा तरुण कुठे आहे, याची माहिती असावी, हे स्पष्ट होते. पोलिसांनी याचा विचार करून त्यादृष्टीने तपास करण्याची गरज आहे.पित्यांच्या डोळ्यात अश्रू!सहा महिन्यांतून एकदा पोलीस मुलींच्या पित्यांना जबाब घेण्यासाठी तपास करणारे पोलीस कर्मचारी ठाण्यात बोलावून घेतात. साहेबांसमोर त्यांना हजर करतात. त्यावेळी साहेब या पित्याला, काय झालं मुलीचं? याची चौकशी करतात. त्यावेळी पित्याच्या डोळ्यात अश्रू उभारत आहेत. ‘साहेब मी नाद सोडला आहे. मुलीला शोधताना मी कर्जबाजारी झालो आहे? आता तिला शोधा, नाही तर राहू दे’, असे उत्तर ते देतात. बेपत्तावरून आता अपहरणपूर्वी अल्पवयीन मुले घरातून निघून गेल्यानंतर पोलीस बेपत्ताची नोंद करून घेत होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून १ ते १७ वयोगटातील मुलगा किंवा मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आली तर, पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याची नवीन नियमावली अमलात आली आहे. पूर्वी ज्या अल्पवयीन मुला-मुलींची बेपत्ताची नोंद आहे, यामध्ये आता पालकांना बोलावून त्यांची तक्रार घेऊन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत अपहरणाचे ४४ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये २४ मुली, तर २० मुलांचा समावेश आहे.