शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

जिल्ह्यात ३ वर्षांत ४४ मुलांचे अपहरण

By admin | Updated: January 26, 2015 00:37 IST

गतीने तपास : स्वतंत्र पोलीस पथकाची नियुक्ती; बेपत्तावरून गुन्हे दाखल

सचिन लाड / सांगलीजिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलांच्या प्रकरणात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. जिल्ह्यातील २४ पोलीस ठाण्यात आतापर्यंत ४४ मुलांचे अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अपहरण प्रकरणाचा तपास तातडीने होण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. गेल्या काही वर्षांत अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलांपेक्षा मुली बेपत्ता होण्याची संख्या मोठी आहे. काही मुले अभ्यास न केल्याने, आई, वडील रागावल्यामुळे बेपत्ता होतात. मुलींना लग्नाच्या आमिषाने पळविले जाते. मात्र सुरुवातीला ही मुले बेपत्ता असल्याची नोंद केली जाते. पोलिसांकडून या मुलांचे छायाचित्र व माहिती राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कळविली जाते. चार-आठ दिवस गतीने तपास केला जातो. परंतु कुठेच सुगावा लागत नसल्याचे लक्षात येताच पोलीस तपास थांबतो. त्यानंतर पालक स्वत: मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे हे प्रयत्न अपुरे पडतात. मुले बेपत्ता होणे आणि ती न सापडणे, हा विषय पालकांच्यादृष्टीने चिंतेचा बनला आहे. पालक चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तपास अधिकारी फारशी दखल घेत नाहीत. काय कुठं सुगावा लागला का? असा पालकांनाच प्रश्न विचारतात.सहा महिन्यांतून एकदा पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून या मुलांचे काय झाले? ती सापडली का? याची पोलिसांकडून चौकशी केली जाते. यासंदर्भात जबाबही नोंदवून घेतला जातो. मुलांपेक्षा मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. तीन-तीन वर्षे होऊन गेली तरी, मुली सापडत नसल्याने पालकांना चिंता लागून राहिली आहे. त्यांचा पोलीस तपासावरील विश्वास उडून गेला आहे. पोलीस मात्र लग्नाच्या आमिषाने पळून गेली आहे, म्हणजे तिचं त्या मुलाबरोबर प्रेमप्रकरण होतं, आज ना उद्या ती येईल, असे सांगून पालकांना पिटाळून लावतात. यामुळे वर्षानुवर्षे या मुलींचा तपास लागत नाही. या मुली जिवंत आहे का नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पळवून नेणारे ‘आॅनरेकॉर्ड’लग्नाच्या आमिषाने मुलींना पळवून नेले जाते. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होते; मात्र मुलींना पळवून नेणारे तरुण बेपत्ता आहेत, म्हणून त्यांची तक्रार दाखल होताना दिसत नाही. तरुणांचे नातेवाईक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. यावरून त्यांना हा तरुण कुठे आहे, याची माहिती असावी, हे स्पष्ट होते. पोलिसांनी याचा विचार करून त्यादृष्टीने तपास करण्याची गरज आहे.पित्यांच्या डोळ्यात अश्रू!सहा महिन्यांतून एकदा पोलीस मुलींच्या पित्यांना जबाब घेण्यासाठी तपास करणारे पोलीस कर्मचारी ठाण्यात बोलावून घेतात. साहेबांसमोर त्यांना हजर करतात. त्यावेळी साहेब या पित्याला, काय झालं मुलीचं? याची चौकशी करतात. त्यावेळी पित्याच्या डोळ्यात अश्रू उभारत आहेत. ‘साहेब मी नाद सोडला आहे. मुलीला शोधताना मी कर्जबाजारी झालो आहे? आता तिला शोधा, नाही तर राहू दे’, असे उत्तर ते देतात. बेपत्तावरून आता अपहरणपूर्वी अल्पवयीन मुले घरातून निघून गेल्यानंतर पोलीस बेपत्ताची नोंद करून घेत होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून १ ते १७ वयोगटातील मुलगा किंवा मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आली तर, पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याची नवीन नियमावली अमलात आली आहे. पूर्वी ज्या अल्पवयीन मुला-मुलींची बेपत्ताची नोंद आहे, यामध्ये आता पालकांना बोलावून त्यांची तक्रार घेऊन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत अपहरणाचे ४४ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये २४ मुली, तर २० मुलांचा समावेश आहे.