शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

ऑनड्युटी ४२५ दिवस - संडे स्पेशल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST

डॉ. संजय साळुंखे दहा महिन्यांच्या मणिकर्णिकेसोबत डॉ. संजय साळुंखे - ऑनड्युटी ४२५ दिवस आरोग्य विभागाला गेल्या किमान ५० वर्षांत ...

डॉ. संजय साळुंखे दहा महिन्यांच्या मणिकर्णिकेसोबत

डॉ. संजय साळुंखे - ऑनड्युटी ४२५ दिवस

आरोग्य विभागाला गेल्या किमान ५० वर्षांत सर्वाधिक ताण देणारी म्हणून २०२० आणि २०२१ ही दोन वर्षे स्मरणात राहतील. या विभागाचा मुख्य खांब म्हणून सर्वाधिक जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यावर आहे. गेल्यावर्षी २२ मार्चला पहिला कोरोना रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतच्या ४२५ दिवसांत एकही दिवस सुटी न घेता त्यांचा कोरोनाशी लढा सुरू आहे.

सकाळपासून वाजणारा मोबाईल मध्यरात्रीपर्यंत थांबत नाही. अखंड चालणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्स, सतत धडधडणारे मेल, बेड, अैाषधे, इंजेक्शनसाठी खणखणारा फोन, लागोपाठ बैठका, मंत्र्यांचे दौरे यामुळे कोरोनाचे सव्वा वर्ष अक्षरश: तिसरे महायुद्धच ठरले आहे. सेनापती रणांगणावर पाय रोवून उभारला तरच सैन्यदेखील डटके लढत राहते. याची पक्की जाण ठेवून डॉक्टर निर्धारपूर्वक लढत आहेत. मानसिकदृष्ट्या सदैव खंबीर राहिले आहेत. ही मन:शांती मिळवली अवघ्या दहा महिन्यांच्या मणिकर्णिकापासून. मणिकर्णिका म्हणजे डॉक्टरांची नात, मुलाची मुलगी. मुलगा बेळगावला व सून पुण्याला दोघेही वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी गेलेले. त्यामुळे मणिकर्णिकेची जबाबदारी डॉक्टरांवरच. पण कोरोना काळात ती जबाबदारी न ठरता डॉक्टरांसाठी मानसोपचारतज्ज्ञच ठरली. घरी जाईपर्यंत डोळे टक्क उघडे ठेवून जागी असणारी मणिकर्णिका त्यांच्यासाठी ऊर्जेचा स्त्रोत आहे. तिच्या सान्निध्यात ताणतणाव गायब होतात. गेले सव्वा वर्ष मणिकर्णिका म्हणजे डॉक्टरांच्या मन:शांतीचे अैाषध ठरली आहे.

डॉक्टरकीचे शिक्षण घेत असल्यापासूनच त्यांना लिखाणाचा नाद. कोरोना काळात त्याला धुमारे फुटले. दिसामाजी एक-दोन पाने लिहितातच. मनातल्या भावभावनांच्या निचऱ्यासाठी लिखाणासारखा मार्ग नाही, हा त्यांचा विश्वास आहे. अर्थात, लिखाणामध्ये प्रशासकीय कामकाजाचा भाग नसतो. ललित स्वरुपाचे लिखाण जीवनानुभव सांगते. अलंकार, उपमा, हितोपदेश आणि रंजकतेने भरलेले लिखाण वाचनीय असल्याचे कौतुक मित्रमंडळी तसेच प्रशासकीय सहकारी करतात.

कोरोनाला खंबीरपणे भिडताना नात्यातील प्रेमभावना आणि लेखनातून व्यक्त होण्याची सवय कामी आल्याचे डॉक्टर सांगतात. रणांगणातून पळ काढण्याची सवय नसलेले डॉक्टर याच ऊर्जेवर कोरोनाशीही दोन हात करताहेत.