शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

ऑनड्युटी ४२५ दिवस - संडे स्पेशल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST

डॉ. संजय साळुंखे दहा महिन्यांच्या मणिकर्णिकेसोबत डॉ. संजय साळुंखे - ऑनड्युटी ४२५ दिवस आरोग्य विभागाला गेल्या किमान ५० वर्षांत ...

डॉ. संजय साळुंखे दहा महिन्यांच्या मणिकर्णिकेसोबत

डॉ. संजय साळुंखे - ऑनड्युटी ४२५ दिवस

आरोग्य विभागाला गेल्या किमान ५० वर्षांत सर्वाधिक ताण देणारी म्हणून २०२० आणि २०२१ ही दोन वर्षे स्मरणात राहतील. या विभागाचा मुख्य खांब म्हणून सर्वाधिक जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यावर आहे. गेल्यावर्षी २२ मार्चला पहिला कोरोना रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतच्या ४२५ दिवसांत एकही दिवस सुटी न घेता त्यांचा कोरोनाशी लढा सुरू आहे.

सकाळपासून वाजणारा मोबाईल मध्यरात्रीपर्यंत थांबत नाही. अखंड चालणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्स, सतत धडधडणारे मेल, बेड, अैाषधे, इंजेक्शनसाठी खणखणारा फोन, लागोपाठ बैठका, मंत्र्यांचे दौरे यामुळे कोरोनाचे सव्वा वर्ष अक्षरश: तिसरे महायुद्धच ठरले आहे. सेनापती रणांगणावर पाय रोवून उभारला तरच सैन्यदेखील डटके लढत राहते. याची पक्की जाण ठेवून डॉक्टर निर्धारपूर्वक लढत आहेत. मानसिकदृष्ट्या सदैव खंबीर राहिले आहेत. ही मन:शांती मिळवली अवघ्या दहा महिन्यांच्या मणिकर्णिकापासून. मणिकर्णिका म्हणजे डॉक्टरांची नात, मुलाची मुलगी. मुलगा बेळगावला व सून पुण्याला दोघेही वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी गेलेले. त्यामुळे मणिकर्णिकेची जबाबदारी डॉक्टरांवरच. पण कोरोना काळात ती जबाबदारी न ठरता डॉक्टरांसाठी मानसोपचारतज्ज्ञच ठरली. घरी जाईपर्यंत डोळे टक्क उघडे ठेवून जागी असणारी मणिकर्णिका त्यांच्यासाठी ऊर्जेचा स्त्रोत आहे. तिच्या सान्निध्यात ताणतणाव गायब होतात. गेले सव्वा वर्ष मणिकर्णिका म्हणजे डॉक्टरांच्या मन:शांतीचे अैाषध ठरली आहे.

डॉक्टरकीचे शिक्षण घेत असल्यापासूनच त्यांना लिखाणाचा नाद. कोरोना काळात त्याला धुमारे फुटले. दिसामाजी एक-दोन पाने लिहितातच. मनातल्या भावभावनांच्या निचऱ्यासाठी लिखाणासारखा मार्ग नाही, हा त्यांचा विश्वास आहे. अर्थात, लिखाणामध्ये प्रशासकीय कामकाजाचा भाग नसतो. ललित स्वरुपाचे लिखाण जीवनानुभव सांगते. अलंकार, उपमा, हितोपदेश आणि रंजकतेने भरलेले लिखाण वाचनीय असल्याचे कौतुक मित्रमंडळी तसेच प्रशासकीय सहकारी करतात.

कोरोनाला खंबीरपणे भिडताना नात्यातील प्रेमभावना आणि लेखनातून व्यक्त होण्याची सवय कामी आल्याचे डॉक्टर सांगतात. रणांगणातून पळ काढण्याची सवय नसलेले डॉक्टर याच ऊर्जेवर कोरोनाशीही दोन हात करताहेत.