शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यातील ४२ गावांचा कर्नाटकात जाण्याचा इशारा

By admin | Updated: June 16, 2015 01:34 IST

पाणी पेटणार : शासनाकडे नाहरकत प्रमाणपत्राची मागणी

जत : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांना म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेतून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळावे, अशी मागणी गेल्या पाच वर्षापासून केली जात आहे. याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याने या ४२ गावांना कर्नाटकात जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नाहरकत प्रमाणपत्र (एन. ओ. सी) द्यावे, अशी मागणी पाणी संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे.जत तालुका सांगली जिल्ह्यात भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आले आहे. पूर्व आणि दक्षिण भागात पाणी आलेले नाही. पश्चिम भागात पाणी आल्यामुळे पूर्व भागातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शेती व पिण्यासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी ४२ गावांतील नागरिकांनी पाणी संघर्ष समितीची स्थापना करून शासनदरबारी या मागणीचा पाठपुरावा सुरु ठेवला. याशिवाय वेळोवेळी उपोषण, मोर्चा, रास्ता रोको आंदोलन, चर्चासत्र, पदयात्रा काढून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी त्यांनी लोकवर्गणी जमा केली आहे. लोकसभा निवडणुकीत पाणी संघर्ष समितीने खा. संजय पाटील यांना पाठिंबा देऊन समितीच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे त्यांचा प्रचार केला होता. त्यावेळी पाणी देण्याचे आश्वासन संजय पाटील यांनी दिले होते. विधानसभा निवडणुकीत समितीने आमदार विलासराव जगताप यांना पाठिंबा दिला होता. त्यांनीही ४२ गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करु व पाणी देऊ, असे आश्वासन दिले होते. लोकसभा निवडणुका होऊन एक वर्ष, तर विधानसभा निवडणुका होऊन सहा महिने झाले आहेत. परंतु पाणी संघर्ष समितीला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे पूर्व भागातील नागरिक आक्रमक झाले आहेत. महाजन आयोगाच्या अहवालात पूर्व भागातील ४२ गावांना कर्नाटक राज्यास जोडण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी संघर्ष समितीने उमदी, संख, दरीबडची या तीन जिल्हा परिषद मतदार संघातील ४२ गावांचा कर्नाटकात समावेश करावा, अशी मागणी केली आहे. प्रत्येक निवडणुकीत पाणी संघर्ष समितीने आपली भूमिका बदलली आहे. आगामी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती स्टंट करत आहे काय? असा प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)‘म्हैसाळ’पेक्षा ‘तुबची-बबलेश्वर’ सोयीचीजत तालुका महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे. सीमाभागापासून यात सुमारे दोन किलोमीटर आत कर्नाटक राज्यातून तुबची - बबलेश्वर योजनेचा कालवा गेला आहे. तेथून सायफन (उताराने) पध्दतीने पाणी जत तालुक्यातील बोर नदीच्या पात्रात व तेथून संख (ता. जत) मध्यम प्रकल्पात येणार आहे. जत तालुक्यातील आठ-दहा साठवण तलाव भरुन झाल्यानंतर हे पाणी परत चडचण (कर्नाटक) येथे जाणार आहे. त्यामुळे जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांना ‘म्हैसाळ’ऐवजी कर्नाटकातून पाणी देणे सोयीचे होणार आहे.जगतापांकडून जनतेची फसवणूकआमदार जगताप यांनी पूर्व भागात शेती आणि पिण्यासाठी पाणी देतो, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीत जनतेला दिले होते. त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे, अशी टीका जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विक्रम सावंत व बाजार समिती माजी सभापती सुरेश शिंदे यांनी केली आहे.