शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

जत तालुक्यातील ४२ गावांचा कर्नाटकात जाण्याचा इशारा

By admin | Updated: June 16, 2015 01:34 IST

पाणी पेटणार : शासनाकडे नाहरकत प्रमाणपत्राची मागणी

जत : जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांना म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेतून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळावे, अशी मागणी गेल्या पाच वर्षापासून केली जात आहे. याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याने या ४२ गावांना कर्नाटकात जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नाहरकत प्रमाणपत्र (एन. ओ. सी) द्यावे, अशी मागणी पाणी संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे.जत तालुका सांगली जिल्ह्यात भौगोलिक विस्ताराने मोठा आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आले आहे. पूर्व आणि दक्षिण भागात पाणी आलेले नाही. पश्चिम भागात पाणी आल्यामुळे पूर्व भागातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शेती व पिण्यासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी ४२ गावांतील नागरिकांनी पाणी संघर्ष समितीची स्थापना करून शासनदरबारी या मागणीचा पाठपुरावा सुरु ठेवला. याशिवाय वेळोवेळी उपोषण, मोर्चा, रास्ता रोको आंदोलन, चर्चासत्र, पदयात्रा काढून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी त्यांनी लोकवर्गणी जमा केली आहे. लोकसभा निवडणुकीत पाणी संघर्ष समितीने खा. संजय पाटील यांना पाठिंबा देऊन समितीच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे त्यांचा प्रचार केला होता. त्यावेळी पाणी देण्याचे आश्वासन संजय पाटील यांनी दिले होते. विधानसभा निवडणुकीत समितीने आमदार विलासराव जगताप यांना पाठिंबा दिला होता. त्यांनीही ४२ गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करु व पाणी देऊ, असे आश्वासन दिले होते. लोकसभा निवडणुका होऊन एक वर्ष, तर विधानसभा निवडणुका होऊन सहा महिने झाले आहेत. परंतु पाणी संघर्ष समितीला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे पूर्व भागातील नागरिक आक्रमक झाले आहेत. महाजन आयोगाच्या अहवालात पूर्व भागातील ४२ गावांना कर्नाटक राज्यास जोडण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी संघर्ष समितीने उमदी, संख, दरीबडची या तीन जिल्हा परिषद मतदार संघातील ४२ गावांचा कर्नाटकात समावेश करावा, अशी मागणी केली आहे. प्रत्येक निवडणुकीत पाणी संघर्ष समितीने आपली भूमिका बदलली आहे. आगामी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती स्टंट करत आहे काय? असा प्रश्न आता नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)‘म्हैसाळ’पेक्षा ‘तुबची-बबलेश्वर’ सोयीचीजत तालुका महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे. सीमाभागापासून यात सुमारे दोन किलोमीटर आत कर्नाटक राज्यातून तुबची - बबलेश्वर योजनेचा कालवा गेला आहे. तेथून सायफन (उताराने) पध्दतीने पाणी जत तालुक्यातील बोर नदीच्या पात्रात व तेथून संख (ता. जत) मध्यम प्रकल्पात येणार आहे. जत तालुक्यातील आठ-दहा साठवण तलाव भरुन झाल्यानंतर हे पाणी परत चडचण (कर्नाटक) येथे जाणार आहे. त्यामुळे जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४२ गावांना ‘म्हैसाळ’ऐवजी कर्नाटकातून पाणी देणे सोयीचे होणार आहे.जगतापांकडून जनतेची फसवणूकआमदार जगताप यांनी पूर्व भागात शेती आणि पिण्यासाठी पाणी देतो, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीत जनतेला दिले होते. त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे, अशी टीका जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विक्रम सावंत व बाजार समिती माजी सभापती सुरेश शिंदे यांनी केली आहे.