शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

जलसंपदा मंत्र्यांकडून ४२ गावांची फसवणूक

By admin | Updated: August 20, 2015 21:52 IST

शिवसेनेचा आरोप : मुंबईत बैठक

सांगली : जत तालुक्यातील ४२ गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ३२ कोटींचा निधी मंजूर केल्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते, पण हा निधी म्हैसाळ योजनेसाठी फिरविला आहे. त्यामुळे ४२ गावांना एक रुपयाही मिळणार नाही. मंत्री महाजन यांनी दिलेले आश्वासन न पाळता ४२ गावांची फसवणूक केली आहे, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार व उप जिल्हाप्रमुख अजिंक्य पाटील यांनी केला आहे.ते म्हणाले की, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी ४२ गावांचा पाणीप्रश्न निकालात काढण्याची हमी दिली आहे. असे असताना खासदार व आमदार यांनी पाणी संघर्ष समितीच्या पदयात्रा सांगता समारंभात भाषणे करून जणू काही हा प्रश्न भाजपच सोडविणार असल्याच्या वल्गना केल्या. महाजन यांच्या उपस्थितीत बैठक घडवून आणली. महाजन यांनी ३२ कोटींचा प्रस्तावित कामाला खर्च न करता ४२ गावांसाठी खर्च करू, असे आश्वासन दिले होते. परंतु हा निधी अर्थसंकल्पातील तरतुदीतील होता. त्याचा ४२ गावांशी संबंध नाही. हा निधी म्हैसाळ योजनेसाठी दिला आहे. श्रेयवादासाठी झपाटलेल्या भाजपने राजकारण आणून फटाके फोडले आहेत. महाजन यांनी ४२ गावांची फसवणूक केली आहे. शिवसेनेचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी याप्रश्नी बैठक बोलाविण्याचे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)