शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

जगतापांच्या ३२ कोटींचा फुगा फुटला

By admin | Updated: July 29, 2016 23:52 IST

विक्रम सावंत : आमदार-खासदारांच्या राजीनाम्याची मागणी

जत : आमदार विलासराव जगताप यांनी म्हैसाळ योजनेच्या कामासाठी ३२ कोटी रूपये आणले आहेत, म्हणून फसवी घोषणा केली होती. त्यांचा फुगा आता फुटला आहे. त्यांनी स्वत:च औचित्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करून शासनावर नाराजी व्यक्त केली आहे. औचित्याचा मुद्दा उपस्थित केला म्हणजे प्रश्न सुटत नाहीत. फसवी घोेषणा करून त्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदार व खासदार संजय पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केली आहे. २२ पैकी फक्त वीस कोटी रूपये आले आहेत. ही वीस कोटी रूपयांची मागणी आघाडी शासनाने केली होती. त्याची पूर्तता झाली आहे. उमदी (ता. जत) येथील पाणी संघर्ष समितीने उमदी ते सांगली पदयात्रा काढली. त्यावेळी ३२ कोटी रूपये मिळाले, म्हणून फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली. आमदार व खासदार यांचा सत्कारही करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात निधी आला नाही. या वीस कोटी रूपयांतून ठेकेदारांची थकीत बिले देण्यात आली. मात्र नवीन कोणतेच काम करण्यात आले नाही. परंतु आमदार विलासराव जगताप मात्र डांगोरा पिटत होते, असे सांगून विक्रम सावंत म्हणाले की, म्हैसाळ योजनेची पूर्तता व जत तालुक्याचे विभाजन या मुख्य प्रश्नावर येथील जनतेने भाजपला मतदान केले होते. परंतु मागील दोन वर्षात यातील एकही प्रश्न सुटला नाही. जगताप यांना तालुक्यातील रस्त्यांच्या कामात जादा रस आहे. रस्त्यांसाठी आलेले ७२ कोटी रूपये हे आघाडी शासनाच्या कालावधीतील प्रस्ताव होते. त्याची पूर्तता फक्त आता झाली आहे. आमदारांचे समर्थक कार्यकर्ते एस.आर.ई.सी.एस.ची सर्वच कामे यंत्रामार्फत करत आहेत. यासंदर्भात तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. राजकीय दबावाखाली तक्रार दाबून ठेवली जात आहे. आसंगी (जत) ते गुड्डापूर रस्त्यावर वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून माती नालाबांध घालण्यात आला आहे. भाजप आमदार समर्थक कार्यकर्ते पंचायत समितीमध्ये एजंट म्हणून काम करत आहेत. पं. स.कडील सर्वच कामांची चौकशी झाल्यास त्यातील गौडबंगाल बाहेर पडणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जनतेच्या प्रश्नासाठी ते आमदार म्हणून काम करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत दौऱ्यात मुख्य प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात प्रश्न सुटले नाहीत. त्यांचे आश्वासन हे केवळ आश्वासनच राहिले आहे. जत येथे दोन महिन्यात तीन पोलिस निरीक्षक झाले आहेत. तालुका विभाजनाचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला नाही. जनावरांचा गोठा मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांकडून प्रत्येकी पाच ते दहा हजार रूपये घेतले जात आहेत, असा आरोपही यावेळी करण्यात आला. बाबासाहेब कोडग, आप्पू बिराजदार, पी. एम. पाटील, सुजय शिंदे, योगेश व्हनमाने, अ‍ॅड. बाळ निकम, संतोष भोसले आदी उपस्थित होते. (वार्ताहर)