शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांकडे ३० कोटींची मागणी

By admin | Updated: May 19, 2016 00:24 IST

संजयकाका पाटील : ‘टेंभू’चे पाणी पूर्ण क्षमतेने उचलण्यासाठी प्रयत्नशील

विटा : बाष्पीभवन व पाझर यामुळे होणारी पाण्याची तूट लक्षात घेता, टेंभू योजनेद्वारे प्रत्यक्ष तलावात पोहोचलेल्या पाण्याचे बिल शेतकऱ्यांकडून घ्यावे, असा प्रस्ताव आपण ठेवला असून, टेंभूच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ३० कोटीची मागणी केली असल्याची माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.खासदार पाटील म्हणाले की, दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू योजनेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीला सांगोल्याचे ज्येष्ठ आ. गणपतराव देशमुख, माजी आ. दीपक साळुंखे उपस्थित होते. त्यापूर्वी केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. त्यावेळीही आम्ही विदर्भ व मराठवाड्याच्या धर्तीवर टेंभू योजनेचा अवर्षणप्रवण भागातील योजना म्हणून विचार व्हावा, अशी मागणी केली होती. आता ‘टेंभू’चे पाणी केवळ ५० टक्के क्षमतेने उचलण्यात येत आहे. ते १०० टक्के क्षमतेने उचलण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यासाठी इलेक्ट्रीकल व मॅकेनिकल विभागाची अपूर्ण कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. टेंभू योजना ही दुष्काळग्रस्तांना मोठा आधार देणारी योजना असल्याने, ती पूर्ण क्षमतेने सुरू झाली पाहिजे. या योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी या योजनेचा पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे सांगून खा. पाटील म्हणाले, टेंभू योजनेचा समावेश पथदर्शी प्रकल्प म्हणून ठिबक सिंचनात झाला आहे. त्यामुळे आता टेंभूचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे देऊन तलाव भरून घ्यायचे व तलावातील पाणी ठिबक सिंचन करून शेतीला द्यायचे, असा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे कमी पाण्यात जास्त जमीन ओलिताखाली येणार आहे.यावेळी नगराध्यक्ष वैभव पाटील, उपनगराध्यक्ष अ‍ॅड. सचिन जाधव उपस्थित होते. (वार्ताहर)प्रत्यक्ष मिळालेल्या पाण्याचेच बिलटेंभू योजनेचे सर्व पंप पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी मेकॅनिकल व इलेक्ट्रीकलची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. त्या कामासाठी ३० कोटी रुपये अपेक्षित आहेत. हा निधी देण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सध्या खानापूर, आटपाडी व सांगोला या दुष्काळी तालुक्यांना टेंभूचे पाणी मिळत आहे. मात्र हे पाणी पाझर व बाष्पीभवन होत असल्याने पाण्याची तूट होत आहे. तरीही या पाण्याचे बिल शेतकऱ्यांना भरावे लागत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष तलावात आलेल्या पाण्याचेच बिल शेतकऱ्यांकडून घ्यावे, असा प्रस्ताव ठेवला असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले.