शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

जिल्ह्याला डाळिंब विमाभरपाईचे २९.५८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:49 IST

केंद्र सरकारच्या मदतीने पीकविमा योजनेंतर्गत खरीप आणि रब्बी पिकांचा विमा उतरविला जातो. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात ...

केंद्र सरकारच्या मदतीने पीकविमा योजनेंतर्गत खरीप आणि रब्बी पिकांचा विमा उतरविला जातो. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचा विमा उतरविण्याकडे कल वाढला आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळपिकांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंचनामे केले होते. मात्र दीड वर्षे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित होते.

जिल्ह्यात डाळिंब विमा योजनेसाठी सहा हजार १९१ शेतकऱ्यांनी दोन कोटी ६३ लाख ८८ हजार ६७७ रुपयांचा विमा भरला होता. त्यांच्यासाठी एकूण विमा संरक्षित रक्कम ५२ कोटी ७७ लाख ७३ हजार ३५४ रुपये होती. शेतकऱ्यांना या रक्कमेच्या ५२ टक्के विमा रक्कम मंजूर आहे. हवामानावर आधारित विमा योजनेंतर्गत सहा हजार १५९ शेतकऱ्यांना २९ कोटी ५८ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली आहे. जत तालुक्यातील सर्वाधिक चार हजार ४८ शेतकऱ्यांना मदत मिळाली. माडग्याळ मंडलमध्ये एक हजार ४०१ शेतकऱ्यांना एक कोटी २१ लाख रुपये भरपाई मिळाली. आटपाडी तालुक्यातील दोन हजार दहा शेतकऱ्यांना चार कोटी १७ लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली.

दहा हजार ४५१ द्राक्षबागायतदारांनी ९७ लाख ७२ हजार रुपयांचा विमा भरला होता. नुकसान झालेल्या सहा हजार ५१५ शेतकऱ्यांना ९ कोटी २१ लाख ५४ हजारांची मदत मिळाली. आटपाडी तालुक्यातील ४६८ शेतकऱ्यांना एक कोटी ८३ लाख, जत तालुक्यातील एक हजार ४५३ शेतकऱ्यांना दोन कोटी १४ लाख, कडेगावमधील ९५ शेतकऱ्यांना ७४ लाख पाच हजार, कवठेमहांकाळमधील दोन हजार २४७ शेतकऱ्यांना दोन कोटी ९८ लाखांची भरपाई मिळाली. खानापूर, मिरज, पलूस, तासगाव, वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनाही भरपाई मिळाली आहे.

चौकट

जिल्ह्यातील आंबा उत्पादक १७६ शेतकऱ्यांनी सहा लाख ३६ हजार रुपये विमा भरला होता, त्यापैकी १२० शेतकऱ्यांना २० लाख ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई बँक खात्यावर जमा झाली.