शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शासकीय दूध योजनेच्या कंत्राटी कामगारांचे २५ कोटी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST

शासकीय दूध योजनेचा सुवर्ण काळ असताना राज्यात दुधाची आयात, निर्यात व दूध पावडरीच्या उत्पादनामुळे योजना नफ्यात होती. येथे कंत्राटी ...

शासकीय दूध योजनेचा सुवर्ण काळ असताना राज्यात दुधाची आयात, निर्यात व दूध पावडरीच्या उत्पादनामुळे योजना नफ्यात होती. येथे कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांची १९८६ पासून २०२१ पर्यंत फंड, वेतन आयोग व पेन्शन असे तब्बल २५ कोटींची रक्कम अडकली आहे. त्या काळात ४६ कंत्राटी कामगारांनी दूध योजनेची कामे अनेक वर्षे केल्यानंतर त्यांना नोकरीत कायम करण्याच्या मागणीस नकार दिला. या कर्मचाऱ्यांनी १९८६ मध्ये लाल बावटा कामगार युनियनतर्फे न्यायालयात याचिका दाखल केली.

जुलै १९९१ मध्ये औद्योगिक न्यायालयाने आदेश देऊन ४६ कामगारांना दूध योजनेत सामावून घेऊन शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्याचे आदेश दिले. या निकालाविरुद्ध शासकीय दूध योजनेने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले. उच्च न्यायालयानेही औद्योगिक न्यायालयाचा निकाल ग्राह्य ठरविला. मात्र, शासकीय दूध योजना व्यवस्थापनाने न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी केली नाही. त्यानंतर १६ वर्षांपूर्वी शासकीय दूध योजना बंद पडल्याने ४६ कर्मचाऱ्यांचे भविष्य उद्‌ध्वस्त झाले.

चाैकट

अहवाल सादर करण्याचे आदेश

३० वर्षांपूर्वी निकाल होऊन कर्मचाऱ्यांना काही मिळाले नाही. ४६ कर्मचाऱ्यांपैकी आज २८ जण हयात आहेत. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची अवस्था बिकट असल्याने २५ कोटी रुपये रक्कम त्यांना मिळावी व त्यांच्या वारसदारांना नोकरी मिळावी, अशी मागणी संकल्प फाउंडेशनचे विवेक जिरनाळे यांनी केली आहे. याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दुग्धविकास विभागाच्या सचिवांना कामगारांच्या प्रलंबित देयकांबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.