शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यामध्ये २२,८४७ टीसीएम पाणीसाठा

By admin | Updated: August 24, 2016 23:44 IST

दुष्काळातून जलसंवर्धनाकडे : शेतकऱ्यांना फायदा

अशोक डोंबाळे --सांगली --जिल्ह्यात या वर्षात जलयुक्त शिवार अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून १४१ गावांमध्ये पाझर तलाव, सिमेंट बंधारे, तलावातील गाळ काढणे, ओढे-नदीचे रूंदीकरण आदी ४०८१ कामे झाली आहेत. या कामांवर ६९ कोटी ९४ लाखांचा निधी खर्च झाला आहे. जून, जुलै, आॅगस्टमधील पावसामुळे तलाव, बंधाऱ्यांमध्ये २२ हजार ८४७.२२ टीसीएम पाणीसाठा झाला आहे. त्यातून २२ हजार ५४५.०७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे.दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने पावसाचे पाणी गावामध्येच अडविण्यासाठी ‘जलयुक्त शिवार अभियान’ ही महत्त्वपूर्ण योजना आखली आहे. यासाठी जिल्ह्यातील १४१ गावांची निवड केली होती. या गावांमध्ये सिमेंट बंधारे, पाझर तलाव, जुन्या पाझर तलावांमधील गाळ काढणे अशी चार हजार ८१ कामे पूर्ण झाली. या कामांसाठी शासनाने १४३ कोटी ७१ लाखांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी जलसंधारणाच्या कामावर ६९ कोटी ९४ लाखांचा खर्च झाला आहे. याशिवाय, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही जलसंधारणाची कामे झाली. लोकसहभाग आणि शासनाच्या मदतीतून जत, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, कडेगाव या तालुक्यांमध्ये ७४९ विहिरीमधील गाळ काढण्यात यश आले आहे. चाळीस ते पन्नास वर्षांत अनेक विहिरींमधील गाळही काढला नव्हता. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या विहिरीतील गाळ काढण्यात प्रशासनास यश आल्यामुळे पाणीसाठा झाला आहे. विहिरीतील गाळ काढण्यावर नऊ कोटी २१ लाखांचा निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात मोठ्याप्रमाणात जलसंधारणाची कामे झाल्यामुळे तेथे मोठ्याप्रमाणात पाणीसाठा झाल्याचे दिसून येत आहे. काही कामांचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे वळवाच्या पहिल्या पावसातच बंधाऱ्यांना गळती लागली आहे. मात्र काही निकृष्ट कामे सोडली तर, अग्रणी नदीवरील बेणापूर (ता. खानापूर) येथील सिमेंट बंधाऱ्यांची कामे पाहण्यासारखी आहेत. बहुतांशी सिमेंट बंधारे पाण्याने तुडूंब भरले आहेत. खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील काही बंधारे मान्सूनच्या पावसामुळे भरले आहेत. जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या बंधाऱ्यांसह तलावामध्ये २२ हजार ८४५ टीसीएम (हजार चौरस मीटर) पाणीसाठा झाला आहे.लोकसहभागही वाढला : लाखो रूपयांची कामेवाळवा व शिराळा तालुक्यातील तीस वर्षापूर्वीच्या तिळगंगा नदीचे सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव पवार यांच्या प्रयत्नातून पुनरुज्जीवन झाले. नदी पात्रातील पाणी अडविण्यासाठी बंधारे बांधले असून, त्यास ‘कर्मयोगी बाबासाहेब आमटे स्मृती बंधारा’ असे नावही देण्यात आले. यासह कुंडल येथेही अ‍ॅड्. दीपक लाड आणि त्यांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून ओढ्याचे पुनरुज्जीवन केले. हे उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहेत.जलयुक्त शिवार योजनेतील पूर्ण झालेली कामेतालुकागावांची संख्यापूर्ण कामेआटपाडी३०६०२कडेगाव९४१२क़ महांकाळ८१८१खानापूर१५६२९जत४२११९३तासगाव२४४९७मिरज१३७६२एकूण१४१४२७६जलयुक्त शिवार योजनेतून खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या अग्रणी नदीचे प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने पुनरुज्जीवन केले. अनेक सिमेंट बंधारे बांधले असून, तेथे मुबलक पाणीसाठा झाला आहे. जत, आटपाडीसह दुष्काळी तालुक्यातही जलसंधारणाची चांगली कामे झाली आहेत. पाणीसाठा झाल्यामुळे सिंचन क्षेत्रही वाढले आहे. - सुचिता भिकाणे, उपजिल्हाधिकारी, सांगली.