शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

‘टेंभू’च्या कामांसाठी २0१७ ची ‘डेडलाईन’

By admin | Updated: May 17, 2016 01:47 IST

मुंबईत बैठक : निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री

सांगली : टेंभू उपसा जलसिंचन योजनेची प्रस्तावित कामे मार्च २0१७ पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. उर्वरित कामे करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. टेंभूच्या उर्वरित कामांमधील अडचणींवर चर्चा करण्यासाठी मुंबईच्या सह्याद्री अतिथिगृहात सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी खासदार संजय पाटील, आ. गणपतराव देशमुख व सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकरी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, टेंभू योजनेवर आजअखेर एक हजार ९३५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. २0१६-१७ साठी ८0 कोटींची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. टप्पा क्र. १ (अ), १ (ब), ३ (अ), ३ (ब) पूर्णपणे कार्यान्वित करणे बाकी आहे. टप्पा क्र. ४ आणि ५ ची उर्वरित कामेही पूर्ण करावीत. मुख्य कालव्याची ६५ किलोमीटर लांबी पूर्ण करण्यासाठी नियोजन झाले आहे. टेंभू येथे कृष्णा नदीवर धरण बांधून कृष्णा नदीतील पाणी पाच वेगवेगळ्या टप्प्यांद्वारे उचलून, सातारा जिल्ह्यातील ६00 हेक्टर, सांगली जिल्ह्यातील ५९ हजार ८७२ हेक्टर आणि सोलापूर जिल्ह्यातील २0 हजार हेक्टर, अशा एकूण ८0 हजार ४७२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेअंतर्गत ३५0 किलोमीटरचे कालवे असून, २0८ किलोमीटरपर्यंतची कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेचा लाभ सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील २१३ गावांना झाला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी कार्यकारी संचालक एम. व्ही. पानसे, मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, कार्यकारी अभियंता अ. ल. नाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)या कामांना मंजुरीमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सुरुवातीला टेंभू योजनेअंतर्गत असलेली इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल कामे प्राधान्याने केली जातील. त्यासाठी ३0 कोटी रुपयांची तजवीज केली आहे. यातून पंप, मोटारी व अन्य बंद पडलेली यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर उर्वरित निधीतून प्राधान्याने मुख्य कालव्यांची कामे करायची आहेत. त्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी २0१७ पर्यंतची मुदत दिली आहे.शेतकऱ्यांकडून दुष्काळी मदत सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी जमविलेल्या एक लाखाच्या निधीचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.