शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’च्या कामांसाठी २0१७ ची ‘डेडलाईन’

By admin | Updated: May 17, 2016 01:47 IST

मुंबईत बैठक : निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री

सांगली : टेंभू उपसा जलसिंचन योजनेची प्रस्तावित कामे मार्च २0१७ पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. उर्वरित कामे करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. टेंभूच्या उर्वरित कामांमधील अडचणींवर चर्चा करण्यासाठी मुंबईच्या सह्याद्री अतिथिगृहात सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी खासदार संजय पाटील, आ. गणपतराव देशमुख व सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकरी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, टेंभू योजनेवर आजअखेर एक हजार ९३५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. २0१६-१७ साठी ८0 कोटींची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. टप्पा क्र. १ (अ), १ (ब), ३ (अ), ३ (ब) पूर्णपणे कार्यान्वित करणे बाकी आहे. टप्पा क्र. ४ आणि ५ ची उर्वरित कामेही पूर्ण करावीत. मुख्य कालव्याची ६५ किलोमीटर लांबी पूर्ण करण्यासाठी नियोजन झाले आहे. टेंभू येथे कृष्णा नदीवर धरण बांधून कृष्णा नदीतील पाणी पाच वेगवेगळ्या टप्प्यांद्वारे उचलून, सातारा जिल्ह्यातील ६00 हेक्टर, सांगली जिल्ह्यातील ५९ हजार ८७२ हेक्टर आणि सोलापूर जिल्ह्यातील २0 हजार हेक्टर, अशा एकूण ८0 हजार ४७२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. या योजनेअंतर्गत ३५0 किलोमीटरचे कालवे असून, २0८ किलोमीटरपर्यंतची कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या योजनेचा लाभ सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील २१३ गावांना झाला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी कार्यकारी संचालक एम. व्ही. पानसे, मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, कार्यकारी अभियंता अ. ल. नाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)या कामांना मंजुरीमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सुरुवातीला टेंभू योजनेअंतर्गत असलेली इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल कामे प्राधान्याने केली जातील. त्यासाठी ३0 कोटी रुपयांची तजवीज केली आहे. यातून पंप, मोटारी व अन्य बंद पडलेली यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर उर्वरित निधीतून प्राधान्याने मुख्य कालव्यांची कामे करायची आहेत. त्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी २0१७ पर्यंतची मुदत दिली आहे.शेतकऱ्यांकडून दुष्काळी मदत सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी जमविलेल्या एक लाखाच्या निधीचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.