शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

कर्ज वाटपात २00 कोटींची भर

By admin | Updated: October 21, 2015 23:32 IST

नव्या धोरणाचा परिणाम : पीक कर्जात १0१ कोटींची वाढ

सांगली : जिल्हा बँकेने २0१६-१७ या आर्थिक वर्षात पीक कर्जांच्या मर्यादेत वाढ केल्यामुळे कर्ज वाटपात एकूण १९७ कोटी ८६ लाख ९१ हजार रुपयांची भर पडणार आहे. गतवर्षाच्या पीककर्ज वाटपाच्या आकडेवारीवरून हा अंदाज काढण्यात आला असल्याने, यात आणखी वाढ होऊ शकते. चालू वर्षाच्या तुलनेत २0१६-१७ साठीच्या कर्जमर्यादेत मोठी वाढ केली आहे. अनेक पिकांच्या कर्ज मर्यादेत दुप्पट, दीडपट वाढ झाली आहे. ज्या पिकांचा समावेश कर्जवाटप धोरणात नव्हता, त्या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीला प्रोत्साहन व बळ देण्याचा प्रयत्न या योजनांच्या माध्यमातून होणार आहे. पिकांच्या यादीत वाढ झाली असून पुढील आर्थिक वर्षापासून झेंडू, शेवगा, संत्री, मोसंबी या पिकांनाही बँक कर्जपुरवठा करणार आहे. वाहन कर्जाच्या मर्यादेतही मोठी वाढ केली आहे. एकूण कर्ज वाटपात उसाचे कर्ज ६५ टक्के, द्राक्षासाठी ३१ टक्के, तर उर्वरित कर्जवाटप अन्य पिकांसाठी केले जाते. उसाला यापूर्वी आडसाली, लागण, खोडवा, निडवा अशा पीक पद्धतीवर कर्जाची मर्यादा आखून दिली होती. संपर्क अभियानात शेतकऱ्यांनी गटनिहाय कर्जमर्यादेबद्दल तक्रारी केल्या. पिकाची पद्धत न पाहता उसाला सरसकट कर्जमर्यादा निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हेक्टरी १ लाख २५ हजार कर्ज दिले जाणार आहे. त्यामुळे उसाच्या माध्यमातून आगामी वर्षात १0१ कोटी ५७ लाख ५६ हजार रुपये वाढ होणार आहे. सध्या निर्यातक्षम द्राक्षांसाठी २ लाख २५ हजार, तर सर्वसाधारण द्राक्षासाठी २ लाख रुपये हेक्टरी कर्जवाटप केले जात होते. आता निर्यातक्षम द्र्राक्षासाठी ३ लाख २५ हजार, तर सर्वसाधारण द्राक्षासाठी ३ लाख रुपये हेक्टरी कर्जवाटप केले जाणार आहे. त्यामुळे द्राक्ष व इतर फळांच्या माध्यमातून आगामी वर्षात ९२ कोटी २६ लाख ४८ हजार रुपयांची वाढ शक्य आहे. चालू वर्षांच्या आकडेवारीवर वाढीचे गणित आखण्यात आले आहे. यात आणखी वाढ झाली, तर अडीचशे कोटींच्या वाढीचीही चिन्हे आहेत. कर्जवाटपात वाढ झाल्याने बँकेच्या उत्पन्नातही मोठी वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)