शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

कर्ज वाटपात २00 कोटींची भर

By admin | Updated: October 22, 2015 00:52 IST

नव्या धोरणाचा परिणाम : पीक कर्जात १0१ कोटींची वाढ

सांगली : जिल्हा बँकेने २0१६-१७ या आर्थिक वर्षात पीक कर्जांच्या मर्यादेत वाढ केल्यामुळे कर्ज वाटपात एकूण १९७ कोटी ८६ लाख ९१ हजार रुपयांची भर पडणार आहे. गतवर्षाच्या पीककर्ज वाटपाच्या आकडेवारीवरून हा अंदाज काढण्यात आला असल्याने, यात आणखी वाढ होऊ शकते. चालू वर्षाच्या तुलनेत २0१६-१७ साठीच्या कर्जमर्यादेत मोठी वाढ केली आहे. अनेक पिकांच्या कर्ज मर्यादेत दुप्पट, दीडपट वाढ झाली आहे. ज्या पिकांचा समावेश कर्जवाटप धोरणात नव्हता, त्या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीला प्रोत्साहन व बळ देण्याचा प्रयत्न या योजनांच्या माध्यमातून होणार आहे. पिकांच्या यादीत वाढ झाली असून पुढील आर्थिक वर्षापासून झेंडू, शेवगा, संत्री, मोसंबी या पिकांनाही बँक कर्जपुरवठा करणार आहे. वाहन कर्जाच्या मर्यादेतही मोठी वाढ केली आहे. एकूण कर्ज वाटपात उसाचे कर्ज ६५ टक्के, द्राक्षासाठी ३१ टक्के, तर उर्वरित कर्जवाटप अन्य पिकांसाठी केले जाते. उसाला यापूर्वी आडसाली, लागण, खोडवा, निडवा अशा पीक पद्धतीवर कर्जाची मर्यादा आखून दिली होती. संपर्क अभियानात शेतकऱ्यांनी गटनिहाय कर्जमर्यादेबद्दल तक्रारी केल्या. पिकाची पद्धत न पाहता उसाला सरसकट कर्जमर्यादा निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हेक्टरी १ लाख २५ हजार कर्ज दिले जाणार आहे. त्यामुळे उसाच्या माध्यमातून आगामी वर्षात १0१ कोटी ५७ लाख ५६ हजार रुपये वाढ होणार आहे. सध्या निर्यातक्षम द्राक्षांसाठी २ लाख २५ हजार, तर सर्वसाधारण द्राक्षासाठी २ लाख रुपये हेक्टरी कर्जवाटप केले जात होते. आता निर्यातक्षम द्र्राक्षासाठी ३ लाख २५ हजार, तर सर्वसाधारण द्राक्षासाठी ३ लाख रुपये हेक्टरी कर्जवाटप केले जाणार आहे. त्यामुळे द्राक्ष व इतर फळांच्या माध्यमातून आगामी वर्षात ९२ कोटी २६ लाख ४८ हजार रुपयांची वाढ शक्य आहे. चालू वर्षांच्या आकडेवारीवर वाढीचे गणित आखण्यात आले आहे. यात आणखी वाढ झाली, तर अडीचशे कोटींच्या वाढीचीही चिन्हे आहेत. कर्जवाटपात वाढ झाल्याने बँकेच्या उत्पन्नातही मोठी वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)